शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष पिकासाठी विमा योजनेची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 18:18 IST

शेतकऱ्यांची मागणी : ७ नोव्हेंबरला संपली मुदत

ठळक मुद्देमका, सोयाबीन पीकांसंदर्भात काढलेल्या विमा संरक्षणाची रक्कम मिळण्यासाठी आणि पंचनाम्यात अडकलेले शेतकरी या वर्षी विमा काढण्यापासुन वंचित राहणार असल्याचे चिन्ह निर्माण झालेले आहे.

खेडलेझुंगे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत द्राक्ष, मोसंबी, केळी, संत्री, काजू डाळिंब आणि आंबा आदी फळपिकांचा समावेश आहे. द्राक्षे, केळी व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेतील सहभागासाठी ७ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, परतीच्या पावसामुळे द्राक्षांसह डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने सदर योजनेची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे. त्यामुळे द्राक्ष व डाळींब उत्पादकांमध्ये मोठ्याप्रमाणावर नाराजगी व्यक्त केली जात आहे.मका, सोयाबीन पीकांसंदर्भात काढलेल्या विमा संरक्षणाची रक्कम मिळण्यासाठी आणि पंचनाम्यात अडकलेले शेतकरी या वर्षी विमा काढण्यापासुन वंचित राहणार असल्याचे चिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आधीच सदरच्या विम्याबाबतची माहिती आणि मार्गदर्शक सुचना शासनाकडुन एक महिना उशिराने देण्यात आल्या. त्यातच विम्याचे संरक्षण असलेल्या कालावधीत परतीच्या पावसाने फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. सध्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात ग्रामविकास विभाग, महसुल विभाग, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी आणि शेतकरीवर्ग गुंतलेला आहे. त्यामुळे विमा काढण्यासाठी मागीलप्रमाणे शेतकरी प्रोत्साहीत झाल्याचे दिसुन येत नाही. द्राक्ष बागांच्या विमा काढण्यासाठी ७ नोव्हेंबर २०१९ ही शेवटची तारीख होती परंतु शेतकरी वर्गास याची माहीती ऐनवेळेस मिळाल्याने आणि ब-याच ठिकाणी इंटरनेट, विज व साईटच्या अडचणी असल्याने शेतकरी त्यापासून वंचित राहीलेले आहेत. त्यामुळे द्राक्ष पिकासाठी विमा योजनेची मुदत वाढविण्याची मागणी शेतक-यांकडून होत आहे.सरकारकडून एक महिन्याचा विलंबपंतप्रधान पीकविमा योजनेची यंदाची मार्गदर्शक सूचना जारी करण्यास सरकारकडून एक महिन्याचा विलंब झाला आहे. त्यामुळे विम्याचे संरक्षण असलेल्या कालावधीत अवकाळी पावसाने फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्याचा रोष शेतक-यांमध्ये आहे. त्यातच योजनेतील सहभागाची मुदत वाढविण्याची मागणी द्राक्ष उत्पादकांनी करु नही ती न वाढविल्याने योजनेतील शेतक-यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. द्राक्ष पिकासाठी मुदत वाढ होणे गरजेचे आहे.- विलास गिते, द्राक्ष बागायतदार, खेडलेझुंगे. 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस