शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

द्राक्ष पिकासाठी विमा योजनेची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 18:18 IST

शेतकऱ्यांची मागणी : ७ नोव्हेंबरला संपली मुदत

ठळक मुद्देमका, सोयाबीन पीकांसंदर्भात काढलेल्या विमा संरक्षणाची रक्कम मिळण्यासाठी आणि पंचनाम्यात अडकलेले शेतकरी या वर्षी विमा काढण्यापासुन वंचित राहणार असल्याचे चिन्ह निर्माण झालेले आहे.

खेडलेझुंगे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत द्राक्ष, मोसंबी, केळी, संत्री, काजू डाळिंब आणि आंबा आदी फळपिकांचा समावेश आहे. द्राक्षे, केळी व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेतील सहभागासाठी ७ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, परतीच्या पावसामुळे द्राक्षांसह डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने सदर योजनेची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे. त्यामुळे द्राक्ष व डाळींब उत्पादकांमध्ये मोठ्याप्रमाणावर नाराजगी व्यक्त केली जात आहे.मका, सोयाबीन पीकांसंदर्भात काढलेल्या विमा संरक्षणाची रक्कम मिळण्यासाठी आणि पंचनाम्यात अडकलेले शेतकरी या वर्षी विमा काढण्यापासुन वंचित राहणार असल्याचे चिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आधीच सदरच्या विम्याबाबतची माहिती आणि मार्गदर्शक सुचना शासनाकडुन एक महिना उशिराने देण्यात आल्या. त्यातच विम्याचे संरक्षण असलेल्या कालावधीत परतीच्या पावसाने फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. सध्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात ग्रामविकास विभाग, महसुल विभाग, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी आणि शेतकरीवर्ग गुंतलेला आहे. त्यामुळे विमा काढण्यासाठी मागीलप्रमाणे शेतकरी प्रोत्साहीत झाल्याचे दिसुन येत नाही. द्राक्ष बागांच्या विमा काढण्यासाठी ७ नोव्हेंबर २०१९ ही शेवटची तारीख होती परंतु शेतकरी वर्गास याची माहीती ऐनवेळेस मिळाल्याने आणि ब-याच ठिकाणी इंटरनेट, विज व साईटच्या अडचणी असल्याने शेतकरी त्यापासून वंचित राहीलेले आहेत. त्यामुळे द्राक्ष पिकासाठी विमा योजनेची मुदत वाढविण्याची मागणी शेतक-यांकडून होत आहे.सरकारकडून एक महिन्याचा विलंबपंतप्रधान पीकविमा योजनेची यंदाची मार्गदर्शक सूचना जारी करण्यास सरकारकडून एक महिन्याचा विलंब झाला आहे. त्यामुळे विम्याचे संरक्षण असलेल्या कालावधीत अवकाळी पावसाने फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्याचा रोष शेतक-यांमध्ये आहे. त्यातच योजनेतील सहभागाची मुदत वाढविण्याची मागणी द्राक्ष उत्पादकांनी करु नही ती न वाढविल्याने योजनेतील शेतक-यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. द्राक्ष पिकासाठी मुदत वाढ होणे गरजेचे आहे.- विलास गिते, द्राक्ष बागायतदार, खेडलेझुंगे. 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस