शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

द्राक्ष पिकासाठी विमा योजनेची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 18:18 IST

शेतकऱ्यांची मागणी : ७ नोव्हेंबरला संपली मुदत

ठळक मुद्देमका, सोयाबीन पीकांसंदर्भात काढलेल्या विमा संरक्षणाची रक्कम मिळण्यासाठी आणि पंचनाम्यात अडकलेले शेतकरी या वर्षी विमा काढण्यापासुन वंचित राहणार असल्याचे चिन्ह निर्माण झालेले आहे.

खेडलेझुंगे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत द्राक्ष, मोसंबी, केळी, संत्री, काजू डाळिंब आणि आंबा आदी फळपिकांचा समावेश आहे. द्राक्षे, केळी व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेतील सहभागासाठी ७ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, परतीच्या पावसामुळे द्राक्षांसह डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने सदर योजनेची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे. त्यामुळे द्राक्ष व डाळींब उत्पादकांमध्ये मोठ्याप्रमाणावर नाराजगी व्यक्त केली जात आहे.मका, सोयाबीन पीकांसंदर्भात काढलेल्या विमा संरक्षणाची रक्कम मिळण्यासाठी आणि पंचनाम्यात अडकलेले शेतकरी या वर्षी विमा काढण्यापासुन वंचित राहणार असल्याचे चिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आधीच सदरच्या विम्याबाबतची माहिती आणि मार्गदर्शक सुचना शासनाकडुन एक महिना उशिराने देण्यात आल्या. त्यातच विम्याचे संरक्षण असलेल्या कालावधीत परतीच्या पावसाने फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. सध्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात ग्रामविकास विभाग, महसुल विभाग, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी आणि शेतकरीवर्ग गुंतलेला आहे. त्यामुळे विमा काढण्यासाठी मागीलप्रमाणे शेतकरी प्रोत्साहीत झाल्याचे दिसुन येत नाही. द्राक्ष बागांच्या विमा काढण्यासाठी ७ नोव्हेंबर २०१९ ही शेवटची तारीख होती परंतु शेतकरी वर्गास याची माहीती ऐनवेळेस मिळाल्याने आणि ब-याच ठिकाणी इंटरनेट, विज व साईटच्या अडचणी असल्याने शेतकरी त्यापासून वंचित राहीलेले आहेत. त्यामुळे द्राक्ष पिकासाठी विमा योजनेची मुदत वाढविण्याची मागणी शेतक-यांकडून होत आहे.सरकारकडून एक महिन्याचा विलंबपंतप्रधान पीकविमा योजनेची यंदाची मार्गदर्शक सूचना जारी करण्यास सरकारकडून एक महिन्याचा विलंब झाला आहे. त्यामुळे विम्याचे संरक्षण असलेल्या कालावधीत अवकाळी पावसाने फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्याचा रोष शेतक-यांमध्ये आहे. त्यातच योजनेतील सहभागाची मुदत वाढविण्याची मागणी द्राक्ष उत्पादकांनी करु नही ती न वाढविल्याने योजनेतील शेतक-यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. द्राक्ष पिकासाठी मुदत वाढ होणे गरजेचे आहे.- विलास गिते, द्राक्ष बागायतदार, खेडलेझुंगे. 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस