शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
Kolhapur Mahadevi Elephant : अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
3
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
4
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
5
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
6
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
7
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
8
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
9
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
10
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
11
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
12
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
13
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
14
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
15
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
16
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
17
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
18
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
19
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
20
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

निर्यातक्षम द्राक्षे तोडून टाकली बागेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 22:07 IST

निफाड/खेडलेझुंगे : कोरोनाच्या संकटामुळे कवडीमोल दरामुळे धास्तावलेल्या निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकºयाने सुमारे २५० क्ंिवटल द्राक्ष बागेतच तोडून टाकत संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देकवडीमोल दर । कोरोनाच्या संकटाने उत्पादक धास्तावले; पंचनामे करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड/खेडलेझुंगे : कोरोनाच्या संकटामुळे कवडीमोल दरामुळे धास्तावलेल्या निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकºयाने सुमारे २५० क्ंिवटल द्राक्ष बागेतच तोडून टाकत संताप व्यक्त केला.कोरोनामुळे निर्यातबंदी असल्याने द्राक्षबागांना कमी भाव मिळत आहे. शासनाने शेतकऱ्यांकडून हमीभावाने द्राक्षांची खरेदी करणे गरजेचे वाटत आहे. कारण बांधावर व्यापारी शेतकºयांकडून कमी दराने द्राक्ष खरेदी करत आहेत. शेतकºयांनी स्वत:च्या कुटुंबाचा घास हिसकावून द्राक्षबागांसाठी खर्च करून द्राक्षबागा वाचविलेल्या आहेत. वाचविलेल्या बागांमधून अत्यल्प उत्पादन मिळणार आहे. परतीच्या पावसातून वाचविलेल्या बागांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे. एक एकर बागांसाठी तीन लाखांच्यावर खर्च झालेला आहे.निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकरी प्रवीण उफाडे यांनी ३५ गुंठेमधील निर्यातक्षम असलेले सुमारे २५० क्विंटल द्राक्षांना योग्य भाव न मिळाल्याने कटिंग करून द्राक्षबागेच्या गल्ल्यांमध्ये टाकून दिलेले आहेत. निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी सुमारे तीन लाखांपर्यंतचा खर्च झालेला आहे. स्थानिक व्यापारी आणि निर्यात करणाºया व्यापाºयांकडून अवघा २-३ रुपये किलोने मागणी झाल्याने उफाडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परतीच्या पावसामध्ये याआधी एक एकर बागाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या उर्वरित ३५ गुंठेच्या बागेतून किमान खर्च तरी वसूल होईल, अशी आशा बाळगून उफाडे यांनी कुटुंबीयांसोबत मेहनत घेत निर्यातक्षम द्राक्ष तयार केली होती. शेतकºयांचा अपेक्षाभंगद्राक्षबागेकडून त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु कोरोनामुळे ती धुळीस मिळाळी आहे. यावर्षी या बागांवर झालेला खर्चही न मिळाल्याने कुटुंब कर्जाच्या खायीत गेलेले आहे. व्यापाºयांकडून कवडीमोलाने निर्याक्षम द्राक्षांची मागणी झाल्याने हतबल झालेल्या उफाडे यांनी सदरचा माल हा तोडून जमिनीवरचअंथरूण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना या द्राक्षांपासून मनुका तयार करण्याचा सल्ला अनेकांनी दिला आहे.निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी सुमारे तीन लाखापर्यंतचा खर्च करण्यात आला आहे. त्यातच द्राक्षांची पूर्णत: साखर रिटर्न झालेली आहे. त्यामुळे हे द्राक्ष उन्हाने वाळवूूनही विक्र ी लायक असा मनुका तयार होणार नाही. त्यामुळे ग्राहकांकडून अशा मनुका खरेदी होणे अत्यंत जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे द्राक्ष तोडून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे उफाडे यांनी सांगितले. शेतीमाल विक्रीसाठी शासन स्तरावर योग्य धोरण ठरविणे गरजेचे आहे. माझा पहिला एक एकर बाग परतीच्या पावसात सापडल्याने पूर्णत: नष्ट झालेला आहे. त्यामुळे आम्ही उर्वरित नवीन पाच वर्षाचा सुमारे ३५ गुंठे जमिनीवरील बागेसाठी जीवतोड मेहनत घेतली. कुटुंबीयांच्या तोंडाला घास कमी करून या बागेसाठी औषधे, मशागतीसाठी खर्च केला. परंतु दोन ते तीन रु पये किलोने द्राक्षाची मागणी झाल्याने आमची भ्रमनिराशा झालेली आहे.-प्रवीण उफाडे, महादेवनगर

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटFarmerशेतकरी