शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

निर्यातक्षम द्राक्षे तोडून टाकली बागेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 22:07 IST

निफाड/खेडलेझुंगे : कोरोनाच्या संकटामुळे कवडीमोल दरामुळे धास्तावलेल्या निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकºयाने सुमारे २५० क्ंिवटल द्राक्ष बागेतच तोडून टाकत संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देकवडीमोल दर । कोरोनाच्या संकटाने उत्पादक धास्तावले; पंचनामे करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड/खेडलेझुंगे : कोरोनाच्या संकटामुळे कवडीमोल दरामुळे धास्तावलेल्या निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकºयाने सुमारे २५० क्ंिवटल द्राक्ष बागेतच तोडून टाकत संताप व्यक्त केला.कोरोनामुळे निर्यातबंदी असल्याने द्राक्षबागांना कमी भाव मिळत आहे. शासनाने शेतकऱ्यांकडून हमीभावाने द्राक्षांची खरेदी करणे गरजेचे वाटत आहे. कारण बांधावर व्यापारी शेतकºयांकडून कमी दराने द्राक्ष खरेदी करत आहेत. शेतकºयांनी स्वत:च्या कुटुंबाचा घास हिसकावून द्राक्षबागांसाठी खर्च करून द्राक्षबागा वाचविलेल्या आहेत. वाचविलेल्या बागांमधून अत्यल्प उत्पादन मिळणार आहे. परतीच्या पावसातून वाचविलेल्या बागांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे. एक एकर बागांसाठी तीन लाखांच्यावर खर्च झालेला आहे.निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकरी प्रवीण उफाडे यांनी ३५ गुंठेमधील निर्यातक्षम असलेले सुमारे २५० क्विंटल द्राक्षांना योग्य भाव न मिळाल्याने कटिंग करून द्राक्षबागेच्या गल्ल्यांमध्ये टाकून दिलेले आहेत. निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी सुमारे तीन लाखांपर्यंतचा खर्च झालेला आहे. स्थानिक व्यापारी आणि निर्यात करणाºया व्यापाºयांकडून अवघा २-३ रुपये किलोने मागणी झाल्याने उफाडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परतीच्या पावसामध्ये याआधी एक एकर बागाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या उर्वरित ३५ गुंठेच्या बागेतून किमान खर्च तरी वसूल होईल, अशी आशा बाळगून उफाडे यांनी कुटुंबीयांसोबत मेहनत घेत निर्यातक्षम द्राक्ष तयार केली होती. शेतकºयांचा अपेक्षाभंगद्राक्षबागेकडून त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु कोरोनामुळे ती धुळीस मिळाळी आहे. यावर्षी या बागांवर झालेला खर्चही न मिळाल्याने कुटुंब कर्जाच्या खायीत गेलेले आहे. व्यापाºयांकडून कवडीमोलाने निर्याक्षम द्राक्षांची मागणी झाल्याने हतबल झालेल्या उफाडे यांनी सदरचा माल हा तोडून जमिनीवरचअंथरूण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना या द्राक्षांपासून मनुका तयार करण्याचा सल्ला अनेकांनी दिला आहे.निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी सुमारे तीन लाखापर्यंतचा खर्च करण्यात आला आहे. त्यातच द्राक्षांची पूर्णत: साखर रिटर्न झालेली आहे. त्यामुळे हे द्राक्ष उन्हाने वाळवूूनही विक्र ी लायक असा मनुका तयार होणार नाही. त्यामुळे ग्राहकांकडून अशा मनुका खरेदी होणे अत्यंत जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे द्राक्ष तोडून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे उफाडे यांनी सांगितले. शेतीमाल विक्रीसाठी शासन स्तरावर योग्य धोरण ठरविणे गरजेचे आहे. माझा पहिला एक एकर बाग परतीच्या पावसात सापडल्याने पूर्णत: नष्ट झालेला आहे. त्यामुळे आम्ही उर्वरित नवीन पाच वर्षाचा सुमारे ३५ गुंठे जमिनीवरील बागेसाठी जीवतोड मेहनत घेतली. कुटुंबीयांच्या तोंडाला घास कमी करून या बागेसाठी औषधे, मशागतीसाठी खर्च केला. परंतु दोन ते तीन रु पये किलोने द्राक्षाची मागणी झाल्याने आमची भ्रमनिराशा झालेली आहे.-प्रवीण उफाडे, महादेवनगर

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटFarmerशेतकरी