शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

निर्यातक्षम द्राक्षे तोडून टाकली बागेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 22:07 IST

निफाड/खेडलेझुंगे : कोरोनाच्या संकटामुळे कवडीमोल दरामुळे धास्तावलेल्या निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकºयाने सुमारे २५० क्ंिवटल द्राक्ष बागेतच तोडून टाकत संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देकवडीमोल दर । कोरोनाच्या संकटाने उत्पादक धास्तावले; पंचनामे करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड/खेडलेझुंगे : कोरोनाच्या संकटामुळे कवडीमोल दरामुळे धास्तावलेल्या निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकºयाने सुमारे २५० क्ंिवटल द्राक्ष बागेतच तोडून टाकत संताप व्यक्त केला.कोरोनामुळे निर्यातबंदी असल्याने द्राक्षबागांना कमी भाव मिळत आहे. शासनाने शेतकऱ्यांकडून हमीभावाने द्राक्षांची खरेदी करणे गरजेचे वाटत आहे. कारण बांधावर व्यापारी शेतकºयांकडून कमी दराने द्राक्ष खरेदी करत आहेत. शेतकºयांनी स्वत:च्या कुटुंबाचा घास हिसकावून द्राक्षबागांसाठी खर्च करून द्राक्षबागा वाचविलेल्या आहेत. वाचविलेल्या बागांमधून अत्यल्प उत्पादन मिळणार आहे. परतीच्या पावसातून वाचविलेल्या बागांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे. एक एकर बागांसाठी तीन लाखांच्यावर खर्च झालेला आहे.निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकरी प्रवीण उफाडे यांनी ३५ गुंठेमधील निर्यातक्षम असलेले सुमारे २५० क्विंटल द्राक्षांना योग्य भाव न मिळाल्याने कटिंग करून द्राक्षबागेच्या गल्ल्यांमध्ये टाकून दिलेले आहेत. निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी सुमारे तीन लाखांपर्यंतचा खर्च झालेला आहे. स्थानिक व्यापारी आणि निर्यात करणाºया व्यापाºयांकडून अवघा २-३ रुपये किलोने मागणी झाल्याने उफाडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परतीच्या पावसामध्ये याआधी एक एकर बागाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या उर्वरित ३५ गुंठेच्या बागेतून किमान खर्च तरी वसूल होईल, अशी आशा बाळगून उफाडे यांनी कुटुंबीयांसोबत मेहनत घेत निर्यातक्षम द्राक्ष तयार केली होती. शेतकºयांचा अपेक्षाभंगद्राक्षबागेकडून त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु कोरोनामुळे ती धुळीस मिळाळी आहे. यावर्षी या बागांवर झालेला खर्चही न मिळाल्याने कुटुंब कर्जाच्या खायीत गेलेले आहे. व्यापाºयांकडून कवडीमोलाने निर्याक्षम द्राक्षांची मागणी झाल्याने हतबल झालेल्या उफाडे यांनी सदरचा माल हा तोडून जमिनीवरचअंथरूण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना या द्राक्षांपासून मनुका तयार करण्याचा सल्ला अनेकांनी दिला आहे.निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी सुमारे तीन लाखापर्यंतचा खर्च करण्यात आला आहे. त्यातच द्राक्षांची पूर्णत: साखर रिटर्न झालेली आहे. त्यामुळे हे द्राक्ष उन्हाने वाळवूूनही विक्र ी लायक असा मनुका तयार होणार नाही. त्यामुळे ग्राहकांकडून अशा मनुका खरेदी होणे अत्यंत जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे द्राक्ष तोडून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे उफाडे यांनी सांगितले. शेतीमाल विक्रीसाठी शासन स्तरावर योग्य धोरण ठरविणे गरजेचे आहे. माझा पहिला एक एकर बाग परतीच्या पावसात सापडल्याने पूर्णत: नष्ट झालेला आहे. त्यामुळे आम्ही उर्वरित नवीन पाच वर्षाचा सुमारे ३५ गुंठे जमिनीवरील बागेसाठी जीवतोड मेहनत घेतली. कुटुंबीयांच्या तोंडाला घास कमी करून या बागेसाठी औषधे, मशागतीसाठी खर्च केला. परंतु दोन ते तीन रु पये किलोने द्राक्षाची मागणी झाल्याने आमची भ्रमनिराशा झालेली आहे.-प्रवीण उफाडे, महादेवनगर

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटFarmerशेतकरी