शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

उपक्रमशील शिक्षकांचे अनुभव कथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 01:06 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे विद्यार्थ्यांची गळती होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास व प्रगती साधण्यासाठी झटणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांनी गुरुवारी आपले अनुभव कथन करताना येणाºया अडचणीही पदाधिकारी, प्रशासन प्रमुखांसमोर मांडल्या. निमित्त होते शिक्षण विभागाच्या ‘कट्टा शिक्षणाचा’ उपक्रमाचे. यावेळी शिक्षकांची उपक्रमशीलता वाढविण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षण कट्टा : अडचणी सोडविण्याचे आश्वासन

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे विद्यार्थ्यांची गळती होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास व प्रगती साधण्यासाठी झटणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांनी गुरुवारी आपले अनुभव कथन करताना येणाºया अडचणीही पदाधिकारी, प्रशासन प्रमुखांसमोर मांडल्या. निमित्त होते शिक्षण विभागाच्या ‘कट्टा शिक्षणाचा’ उपक्रमाचे. यावेळी शिक्षकांची उपक्रमशीलता वाढविण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वार्षिक नियोजनांचा आराखडा तयार केला असून, त्यानुसार गुरुवारपासून ‘कट्टा शिक्षणाचा’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्णातील ग्रामीण भागात विद्यादानाचे काम करणाºया काही शिक्षकांनी कोणतेही पाठबळ नसताना स्वत:च्या हिमतीवर शाळांमध्ये बदल घडवून आणतानाच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. अशा उपक्रमशील शिक्षकांना महिन्यातून एकवेळा जिल्हा परिषदेत बोलावून शिक्षण क्षेत्रात काम करणाºया व्यक्ती, संस्था, शिक्षकांसमोर त्यांचे अनुभव, गुणवत्ता वाढीसाठी केले प्रयत्न, आलेले अनुभव व साधलेल्या शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण केले जाणार आहे. त्याची सुरुवात केशव गावित (हिवाळी, त्र्यंबकेश्वर), प्रकाश चव्हाण (करंजवण, दिंडोरी) व नंदलाल अहिरे (पिंपळगाव गरुडेश्वर, नाशिक) या शिक्षकांपासून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, शिक्षण सभापती यतिन पगार, ‘सकाळ’चे संपादक श्रीमंत माने, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर उपस्थित होते.केशव गावित हे वर्षातील ३६५ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत शाळा भरवितात. तसेच त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शाळेचा कायापालट केला आहे, तर प्रकाश चव्हाण यांनी बोरस्तेवाडी येथील वस्तीशाळेची दुरुस्ती स्वत:च्या बळावर केली, त्याचबरोबर शेतमजुरांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. नंदलाल अहिरे यांनीदेखील पटवाढीसाठी विविध उपक्रम राबविले त्याचबरोबर स्वयंअध्ययनासाठी साहित्याची निर्मिती केली आहे. तिघा शिक्षकांनी आपले सादरीकरण केले. त्यावर उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करून, त्याची व्याप्ती वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन समग्र शिक्षणाचे दराडे यांनी केले. अधिकाधिक शिक्षकांना माहिती देणारजिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संख्या पाहता, अधिकाधिक शिक्षकांना या उपक्रमशीलतेची माहिती दिली जावी जेणेकरून त्यांनाही प्रोत्साहन मिळू शकते, असे आवाहन केले. शाळा व शिक्षकांना भेडसाविणारे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.