शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

उपक्रमशील शिक्षकांचे अनुभव कथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 01:06 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे विद्यार्थ्यांची गळती होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास व प्रगती साधण्यासाठी झटणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांनी गुरुवारी आपले अनुभव कथन करताना येणाºया अडचणीही पदाधिकारी, प्रशासन प्रमुखांसमोर मांडल्या. निमित्त होते शिक्षण विभागाच्या ‘कट्टा शिक्षणाचा’ उपक्रमाचे. यावेळी शिक्षकांची उपक्रमशीलता वाढविण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षण कट्टा : अडचणी सोडविण्याचे आश्वासन

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे विद्यार्थ्यांची गळती होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास व प्रगती साधण्यासाठी झटणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांनी गुरुवारी आपले अनुभव कथन करताना येणाºया अडचणीही पदाधिकारी, प्रशासन प्रमुखांसमोर मांडल्या. निमित्त होते शिक्षण विभागाच्या ‘कट्टा शिक्षणाचा’ उपक्रमाचे. यावेळी शिक्षकांची उपक्रमशीलता वाढविण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वार्षिक नियोजनांचा आराखडा तयार केला असून, त्यानुसार गुरुवारपासून ‘कट्टा शिक्षणाचा’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्णातील ग्रामीण भागात विद्यादानाचे काम करणाºया काही शिक्षकांनी कोणतेही पाठबळ नसताना स्वत:च्या हिमतीवर शाळांमध्ये बदल घडवून आणतानाच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. अशा उपक्रमशील शिक्षकांना महिन्यातून एकवेळा जिल्हा परिषदेत बोलावून शिक्षण क्षेत्रात काम करणाºया व्यक्ती, संस्था, शिक्षकांसमोर त्यांचे अनुभव, गुणवत्ता वाढीसाठी केले प्रयत्न, आलेले अनुभव व साधलेल्या शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण केले जाणार आहे. त्याची सुरुवात केशव गावित (हिवाळी, त्र्यंबकेश्वर), प्रकाश चव्हाण (करंजवण, दिंडोरी) व नंदलाल अहिरे (पिंपळगाव गरुडेश्वर, नाशिक) या शिक्षकांपासून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, शिक्षण सभापती यतिन पगार, ‘सकाळ’चे संपादक श्रीमंत माने, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर उपस्थित होते.केशव गावित हे वर्षातील ३६५ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत शाळा भरवितात. तसेच त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शाळेचा कायापालट केला आहे, तर प्रकाश चव्हाण यांनी बोरस्तेवाडी येथील वस्तीशाळेची दुरुस्ती स्वत:च्या बळावर केली, त्याचबरोबर शेतमजुरांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. नंदलाल अहिरे यांनीदेखील पटवाढीसाठी विविध उपक्रम राबविले त्याचबरोबर स्वयंअध्ययनासाठी साहित्याची निर्मिती केली आहे. तिघा शिक्षकांनी आपले सादरीकरण केले. त्यावर उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करून, त्याची व्याप्ती वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन समग्र शिक्षणाचे दराडे यांनी केले. अधिकाधिक शिक्षकांना माहिती देणारजिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संख्या पाहता, अधिकाधिक शिक्षकांना या उपक्रमशीलतेची माहिती दिली जावी जेणेकरून त्यांनाही प्रोत्साहन मिळू शकते, असे आवाहन केले. शाळा व शिक्षकांना भेडसाविणारे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.