शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

अक्षय पसायदानासाठी एक तरी वारी अनुभवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:33 IST

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल... विठ्ठलाला पहाणं म्हणजे वारी. विठ्ठल बोलणं म्हणजेही वारी. विठ्ठलाशी बोलणं म्हणजे वारी. विठ्ठलाबाबत बोलणंही वारीच. आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार करीत रहाणे म्हणजे वारी करणे. वारी वारी जन्म मरणाने वारी. ती ही वारी. एकदा दर्शन देऊन जी संपत नाही ती वारी. एकदा आषाढी देवशयनी एकादशीला विठ्ठल झोपला की कार्तिकीलाच उठतो. मग वारकरी पंढरपुरात जातो म्हणजे देवदर्शन घेऊन नांगरणी, पेरणी करून तृप्त होतो.

किशोर पाठकबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल... विठ्ठलाला पहाणं म्हणजे वारी. विठ्ठल बोलणं म्हणजेही वारी. विठ्ठलाशी बोलणं म्हणजे वारी. विठ्ठलाबाबत बोलणंही वारीच. आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार करीत रहाणे म्हणजे वारी करणे. वारी वारी जन्म मरणाने वारी. ती ही वारी. एकदा दर्शन देऊन जी संपत नाही ती वारी. एकदा आषाढी देवशयनी एकादशीला विठ्ठल झोपला की कार्तिकीलाच उठतो. मग वारकरी पंढरपुरात जातो म्हणजे देवदर्शन घेऊन नांगरणी, पेरणी करून तृप्त होतो. बाबांनो देव नाही झोपत तो तडक पंढरीतून निघून सरळ आपल्या घरात, शेतात राबायला येतो. तो दळण दळतो, शेतातल्या बियांना अंकुर फोडतो. तो पाऊस होऊन पावसातून बरसतो. आपलं धान्य पिकवतो. फळा-फुलांनी संसार पिकवतो. म्हणून आपण निश्चिंत वारी करायला.स्वत:चं घर, संसार न सोडणाऱ्या सावता माळ्याच्या शेतात तो भेटायला येतो. कांदा मुळा भाजी म्हणत तीच अवघी विठाई माझी म्हणणारा भक्त परमेश्वराला साकडं घालतो. म्हणून पुढची एकादशीची यात्रा सावत्याकडे. ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या एकत्र येतात. तो क्षण अवर्णनीय. दोघांची गळाभेट सोबत निवृत्ती, सोपान, मुक्ताई आहेच नाथ आहेत. ज्ञानोबा मामाच्या घरी विसाव्याला थांबून पुढे येतात. दोघांचे मार्ग भिन्न. दिवेघाट चढताना एरवीचा धापा टाकणारा म्हातारा सहज जमिनीचं पाणी आढ्याला लागलं म्हणत दिवेघाट चढतो. एकदा घाट चढला की विसावा. मग माउली पावली शरीर टाळ-मृदंग होतो. अंतरात घुमत राहतो. दिंडीत प्रत्येक व्यक्ती माउलीच. एखादा पुढे जातो मधे अडखळतो ‘माउली’ हाक दिली की रस्ता तयार. काय ही शिस्त. प्रत्येकाला एकच ध्यास विठ्ठलाचा. येथे जात धर्म पंथ नाहीत. सगळेच भागवत संप्रदायी. वारीला गेलो तेव्हाची गोष्ट. चालण्याची फार सवय नसल्याने पायाला फोड आले. वरती टळटळीत ऊन, पावसाची वाट पहाणे, बाजूला झाडाखाली विसावलो. सोबतचे मित्र एकमेकांचे पायाचे फोड चाचपत होते. तोच एक म्हातारा, अनवाणी शेजारी येऊन बसला. म्हटलं माउली कुठून आलात. परतूर म्हणाला. म्हटलं पायात काही नाही. फोड येतील. म्हाताºयाने पाय दाखवला. एकही फोड नाही. आम्ही आश्चर्यचकित. म्हटलं, माउली वय किती? पंचाहत्तर. माउली बोलावते, ती घेऊन जाते. आमचे पायाचे फोड आपोआप बरे झाले. माउली खाऊ-पिऊ घालते. वेलापूरपर्यंत सारेच वारकरी थकलेले पण तो धाव्याचा क्षण येताच सगळे वारकरी जीव घेऊन उतारावर पळत सुटतात. जणू तुकोबासारखे झाले आपल्यालाही विठ्ठलदर्शन. माता, माउली डोक्यावर कळशा, हंडे, तुळशीवृंदावन घेऊन पळत सुटतात. विठ्ठलमय होतात. असा विठ्ठल बोलावा, बोलवावा. आयुष्यात एक तरी वारी (ओवी) अनुभवावी. मानवता, सात्त्विकता, अथांग भक्ती काय आहे हे कळतं. निदान ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीसोबत आळंदी-पुणे, देहू-पुणे, पुणे-सासवड मोठ्ठा टप्पा पार करावा. मग माउली पाठीवरून प्रेमाचा हात फिरवते. आपल्याला अक्षय पसायदान देते.(लेखक साहित्याचे अभ्यासकव कवी आहेत.)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम