शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

जुने वाडे करणार निर्मनुष्य :  धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:37 IST

जुन्या तांबट आळीतील वाडा कोसळून दोन जण ठार झाल्याने महापालिकेने आता मिशन वाडे हाती घेतले असून, पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात ३९७ धोकादायक वाडे असून, त्यातील केवळ न्यायालयातील दावे असलेल्या मिळकती वगळून ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

नाशिक : जुन्या तांबट आळीतील वाडा कोसळून दोन जण ठार झाल्याने महापालिकेने आता मिशन वाडे हाती घेतले असून, पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात ३९७ धोकादायक वाडे असून, त्यातील केवळ न्यायालयातील दावे असलेल्या मिळकती वगळून ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.  दरवर्षी महापालिकेच्या वतीने शहरातील गावठाण भागातील धोकादायक वाड्यांना नोटिसा बजावल्या जातात. आपल्या मिळकतीचा धोकादायक भाग उतरवून घ्यावा अन्यथा होणाऱ्या आपत्तीस संबंधित नागरिकच जबाबदार राहतील, अशा आशयाच्या या नोटिसा असल्या तरी संबंधित वाडेमालक धोकादायक भाग उतरवून घेत नाही. त्यातच रविवारी जुन्या तांबट आळीतील काळे यांचा वाडा पडल्याने दोन जण ठार झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी ही भूमिका घेतली आहे. महापालिका हद्दीत ३९७ धोकादायक वाडे आहेत. महापालिका त्यांना पारंपरिक पद्धतीने नोटिसा बजावत असते. परंतु तरीही नागरिक घर सोडत नाहीत. एप्रिल-मे महिन्यात होणाºया धोकादायक घरांच्या सर्वेक्षणानंतर बांधकाम विभाग नोटिसा देण्यास विभागीय अधिकाºयांना कळवत असते. परंतु तरीही नागरिक हटत नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून हाच प्रकार सुरू आहे. धोकादायक घरांना डागडुजी करूनही नागरिक राहात नाहीत, असे सांगून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता यातील घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणे असतील तर ती सोडून ही कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता पोलिसांच्या मदतीनेच धोकादायक घरातील नागरिकांना बाहेर काढण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेच्या इतिहासात धोकादायक घरांच्या बाबतीत प्रथमच इतकी कठोर भूमिका घेतली जात आहे. तथापि, बहुतांशी नगरसेवकांनीदेखील या मोहिमेचे स्वागत केले आहे. जीव गमविण्यापेक्षा महापालिकेच्या कार्यवाहीच्या निमित्ताने घर रिकामे होणे महत्त्वाचे असल्याचे मत नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी व्यक्त केले.काजीगढीच्या रहिवाशांनादेखील सूचनामहापालिकेच्या वतीने विविध धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची मोहीम राबविण्यात येणार असली तरी धोकादायक काजीच्या गढीबाबत नागरिकांनी स्वत:हून बाहेर पडण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. काजीगढी दर पावसाळ्यात घसरत असते. गेल्या तीन ते चार वर्षांत अशाप्रकारे काजीगढी अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे आता तेथेदेखील कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका