शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

जुने वाडे करणार निर्मनुष्य :  धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 01:37 IST

जुन्या तांबट आळीतील वाडा कोसळून दोन जण ठार झाल्याने महापालिकेने आता मिशन वाडे हाती घेतले असून, पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात ३९७ धोकादायक वाडे असून, त्यातील केवळ न्यायालयातील दावे असलेल्या मिळकती वगळून ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

नाशिक : जुन्या तांबट आळीतील वाडा कोसळून दोन जण ठार झाल्याने महापालिकेने आता मिशन वाडे हाती घेतले असून, पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात ३९७ धोकादायक वाडे असून, त्यातील केवळ न्यायालयातील दावे असलेल्या मिळकती वगळून ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.  दरवर्षी महापालिकेच्या वतीने शहरातील गावठाण भागातील धोकादायक वाड्यांना नोटिसा बजावल्या जातात. आपल्या मिळकतीचा धोकादायक भाग उतरवून घ्यावा अन्यथा होणाऱ्या आपत्तीस संबंधित नागरिकच जबाबदार राहतील, अशा आशयाच्या या नोटिसा असल्या तरी संबंधित वाडेमालक धोकादायक भाग उतरवून घेत नाही. त्यातच रविवारी जुन्या तांबट आळीतील काळे यांचा वाडा पडल्याने दोन जण ठार झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी ही भूमिका घेतली आहे. महापालिका हद्दीत ३९७ धोकादायक वाडे आहेत. महापालिका त्यांना पारंपरिक पद्धतीने नोटिसा बजावत असते. परंतु तरीही नागरिक घर सोडत नाहीत. एप्रिल-मे महिन्यात होणाºया धोकादायक घरांच्या सर्वेक्षणानंतर बांधकाम विभाग नोटिसा देण्यास विभागीय अधिकाºयांना कळवत असते. परंतु तरीही नागरिक हटत नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून हाच प्रकार सुरू आहे. धोकादायक घरांना डागडुजी करूनही नागरिक राहात नाहीत, असे सांगून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता यातील घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणे असतील तर ती सोडून ही कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता पोलिसांच्या मदतीनेच धोकादायक घरातील नागरिकांना बाहेर काढण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेच्या इतिहासात धोकादायक घरांच्या बाबतीत प्रथमच इतकी कठोर भूमिका घेतली जात आहे. तथापि, बहुतांशी नगरसेवकांनीदेखील या मोहिमेचे स्वागत केले आहे. जीव गमविण्यापेक्षा महापालिकेच्या कार्यवाहीच्या निमित्ताने घर रिकामे होणे महत्त्वाचे असल्याचे मत नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी व्यक्त केले.काजीगढीच्या रहिवाशांनादेखील सूचनामहापालिकेच्या वतीने विविध धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची मोहीम राबविण्यात येणार असली तरी धोकादायक काजीच्या गढीबाबत नागरिकांनी स्वत:हून बाहेर पडण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. काजीगढी दर पावसाळ्यात घसरत असते. गेल्या तीन ते चार वर्षांत अशाप्रकारे काजीगढी अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे आता तेथेदेखील कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका