शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

अतिमहत्त्वाकांक्षा वाईट मार्ग दाखविते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:02 IST

महत्त्वाकांक्षी असणे हे चांगले जरी असले तरी त्याचा जास्त अतिरेक होता कामा नये, कारण महत्त्वाकांक्षेचा अतिरेक हा वाईटच असतो हे ‘अश्वमेध’ नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.२४) राज्य नाट्य स्पर्धेत करण्यात आला.

नाशिक : महत्त्वाकांक्षी असणे हे चांगले जरी असले तरी त्याचा जास्त अतिरेक होता कामा नये, कारण महत्त्वाकांक्षेचा अतिरेक हा वाईटच असतो हे ‘अश्वमेध’ नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.२४) राज्य नाट्य स्पर्धेत करण्यात आला.ओम साई श्री सच्चिदानंद बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. सोनाली कुलकर्णी-गायकवाड लिखित व अरुण भावसार दिग्दर्शित ‘अश्वमेध’ नाटक परशुराम साईखेडकर सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत सादर करण्यात आले. हे एक काल्पनिक नाटक असून ‘निषाद’ साम्राज्याची महाराणी नीलाक्षी महत्त्वाकांक्षी असते; मात्र तिच्याकडून महत्त्वाकांक्षेचा अतिरेक होतो याभोवती ‘अश्वमेध’चे कथानक फिरत जाते. नीलाक्षीला पुत्रप्राप्ती होत नसल्यामुळे राजा तिच्यावर नाराज असतो.त्यामुळे नीलाक्षी वैद्याकडून तपासणी करून घेते. अपत्यप्राप्तीसाठी गर्भाशय योग्य असल्याचे वैद्य सांगतात. त्यामुळे नीलाक्षी जास्त महत्त्वाकांक्षी बनते. अश्वसहायक अश्विनद्वारे ती मातृत्व प्राप्त करून घेत राजा कृतसेनचा अश्विनच्या माध्यमातून विष देऊन खून करते. त्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात अश्विनचाही ती बळी देते. महापराक्रमी सम्राज्ञी महाराणी बनण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न नीलाक्षी पूर्ण करते. या नाटकात डॉ. सोनाली कुलकर्णी, आदित्य भोंबे, श्रुती कापसे, हरिकृष्ण डिडवाणी, राहुल काकड, मदुरा सोनवणे, सचिन दलाल, हरीश परदेशी, राजेश टाकेकण यांनी भूमिका साकारल्या. नेपथ्य अविनाश देशपांडे यांचे तर प्रकाशयोजना विनोद राठोड यांची होती.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक