शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अति आत्मविश्वासाने झाला अवसान घात

By admin | Updated: February 26, 2017 00:01 IST

अति आत्मविश्वासाने झाला अवसान घात

नाशिक : युद्धाला सामोरे जाण्यापूर्वीच प्रतिस्पर्ध्याला दुबळा समजून एकहाती ते जिंकल्याचा अति आत्मविश्वास बाळगणे व चोहोबाजूंनी गाफील राहून स्वत:च्या पराभवास कारणीभूत ठरणे, असा अनुभव नाशिक महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेना घेत आहे. राज्यात व केंद्रात भाजपाप्रमाणेच सत्तेवर असतानाही महापालिका निवडणुकीत त्याचा उपयोग करून घेण्यापेक्षा आपल्याच सत्तेला दुषणे देण्याची सेनेची भूमिका जशी मतदारांच्या पचनी पडली नाही, तसेच सत्तेच्या मागे धावताना पदाधिकाऱ्यांनी नात्यागोत्यांमध्ये अडकून पडल्याच्या परिणामांनाही सामोरे जावे लागले आहे.  पक्षीय पातळीवर शिवसेनेच्या पराभवाचे विश्लेषण करायचे झाल्यास सेनेच्या या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीचा विचार करावा लागेल. कोणतेही मुद्दे हाती नसताना निव्वळ भाजपा विरोध असा एकमेव अजेंडा घेऊन सेनेने सरकार विरोधात नाशकातून लाखोचा मोर्चा काढून प्रचाराचा शुभारंभ केला व तेथून सेनेत ‘ओपन भरती’ सुरू झाली. जो येईल तो आमचा, अशी भूमिका घेत दररोज मातोश्रीच्या दरबारी प्रवेश सोहळे रंगल्यामुळे सेनेची सूज वाढली व वाढलेली सूज हीच आपली ताकद असल्याचे सेनेने समजले व नेमके येथेच त्यांची चूक झाली. महापालिकेत २२ संख्याबळ असताना सर्वपक्षीय आयात नगरसेवकांमुळे ही संख्या ४६ च्या घरात पोहोचल्याने जणू निवडणुकीपूर्वीच महापालिकेवर ‘भगवा’ फडकल्याच्या व अंगात महापौरपदाचा अंगरखा चढल्याच्या आविर्भावात स्थानिक नेते वावरले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सत्ता हस्तगत केल्याचा अति आत्मविश्वास व या सत्तेचा लाभ आपल्याच कुटुंबीयांना मिळावा म्हणून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतली. उपनेते बबन घोलप यांचा दोन कन्यांमध्ये जीव अडकला, बडगुजर पती-पत्नी रिंगणात तर उतरले, पण त्यांना सुपुत्राच्या काळजीने ग्रासले. विनायक पांडे यांनाही स्वत:सह मुलाच्या भविष्याची चिंता भेडसावू लागली. नाशिकचे खासदार असलेले हेमंत गोडसे यांनाही पुत्राच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा वाटला. त्यामुळे ज्यांच्या अंगाखांद्यावर पक्षाची जबाबदारी विश्वासाने सोपवावी असे वाटावे त्यांचे खांदे अगोदरच नातेवाइकांच्या ओझ्याने निखळलेले असताना निव्वळ सैनिकांच्या भरवशावर लढाई कशी लढली जाणार? त्यातही निष्ठावान सैनिक व आयता आलेला सैनिक यांच्यातील भेदाभेद पराकोटीला पोहोचलेला असताना, कोण कोणाशी लढणार? त्यामुळेच की काय उमेदवारी वाटपावरून झालेली हाणामारी समस्त मतदारांनी उघड्या डोळ्यांनी अनुभवली. निवडणुकीपूर्वी पक्षाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू होती याबाबत वरिष्ठ नेत्यांनीही गांभीर्याने घेतले नाही. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सेनेने निव्वळ भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली व स्थानिक प्रश्नांना दुय्यम स्थान दिले, यातून अखेर जे व्हायचे तेच झाले.