शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

अति आत्मविश्वासाने झाला अवसान घात

By admin | Updated: February 26, 2017 00:01 IST

अति आत्मविश्वासाने झाला अवसान घात

नाशिक : युद्धाला सामोरे जाण्यापूर्वीच प्रतिस्पर्ध्याला दुबळा समजून एकहाती ते जिंकल्याचा अति आत्मविश्वास बाळगणे व चोहोबाजूंनी गाफील राहून स्वत:च्या पराभवास कारणीभूत ठरणे, असा अनुभव नाशिक महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेना घेत आहे. राज्यात व केंद्रात भाजपाप्रमाणेच सत्तेवर असतानाही महापालिका निवडणुकीत त्याचा उपयोग करून घेण्यापेक्षा आपल्याच सत्तेला दुषणे देण्याची सेनेची भूमिका जशी मतदारांच्या पचनी पडली नाही, तसेच सत्तेच्या मागे धावताना पदाधिकाऱ्यांनी नात्यागोत्यांमध्ये अडकून पडल्याच्या परिणामांनाही सामोरे जावे लागले आहे.  पक्षीय पातळीवर शिवसेनेच्या पराभवाचे विश्लेषण करायचे झाल्यास सेनेच्या या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीचा विचार करावा लागेल. कोणतेही मुद्दे हाती नसताना निव्वळ भाजपा विरोध असा एकमेव अजेंडा घेऊन सेनेने सरकार विरोधात नाशकातून लाखोचा मोर्चा काढून प्रचाराचा शुभारंभ केला व तेथून सेनेत ‘ओपन भरती’ सुरू झाली. जो येईल तो आमचा, अशी भूमिका घेत दररोज मातोश्रीच्या दरबारी प्रवेश सोहळे रंगल्यामुळे सेनेची सूज वाढली व वाढलेली सूज हीच आपली ताकद असल्याचे सेनेने समजले व नेमके येथेच त्यांची चूक झाली. महापालिकेत २२ संख्याबळ असताना सर्वपक्षीय आयात नगरसेवकांमुळे ही संख्या ४६ च्या घरात पोहोचल्याने जणू निवडणुकीपूर्वीच महापालिकेवर ‘भगवा’ फडकल्याच्या व अंगात महापौरपदाचा अंगरखा चढल्याच्या आविर्भावात स्थानिक नेते वावरले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सत्ता हस्तगत केल्याचा अति आत्मविश्वास व या सत्तेचा लाभ आपल्याच कुटुंबीयांना मिळावा म्हणून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतली. उपनेते बबन घोलप यांचा दोन कन्यांमध्ये जीव अडकला, बडगुजर पती-पत्नी रिंगणात तर उतरले, पण त्यांना सुपुत्राच्या काळजीने ग्रासले. विनायक पांडे यांनाही स्वत:सह मुलाच्या भविष्याची चिंता भेडसावू लागली. नाशिकचे खासदार असलेले हेमंत गोडसे यांनाही पुत्राच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा वाटला. त्यामुळे ज्यांच्या अंगाखांद्यावर पक्षाची जबाबदारी विश्वासाने सोपवावी असे वाटावे त्यांचे खांदे अगोदरच नातेवाइकांच्या ओझ्याने निखळलेले असताना निव्वळ सैनिकांच्या भरवशावर लढाई कशी लढली जाणार? त्यातही निष्ठावान सैनिक व आयता आलेला सैनिक यांच्यातील भेदाभेद पराकोटीला पोहोचलेला असताना, कोण कोणाशी लढणार? त्यामुळेच की काय उमेदवारी वाटपावरून झालेली हाणामारी समस्त मतदारांनी उघड्या डोळ्यांनी अनुभवली. निवडणुकीपूर्वी पक्षाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू होती याबाबत वरिष्ठ नेत्यांनीही गांभीर्याने घेतले नाही. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सेनेने निव्वळ भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली व स्थानिक प्रश्नांना दुय्यम स्थान दिले, यातून अखेर जे व्हायचे तेच झाले.