शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
2
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
3
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
4
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
6
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
7
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
8
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
9
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
10
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
11
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
12
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
13
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
14
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
15
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
16
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
17
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
18
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
19
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
20
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड येथे दीक्षा सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:21 IST

शहरातील नाशिकरोड येथे सुरू असलेल्या उपधान तपामध्ये रविवारी गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षा सोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला.

नाशिक : शहरातील नाशिकरोड येथे सुरू असलेल्या उपधान तपामध्ये रविवारी गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षा सोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला. उपधान तपातील साधकांची मंगळवारी  (दि. २६) नाशिकरोड येथे शोभायात्रा काढण्यात येणार असून, बुधवारी (दि.२७) मोक्षमाळ कार्यक्रमाने उपधान तपाची सांगता होणार आहे.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाममध्ये गेल्या ४७ दिवसांपासून गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्यासह आचार्य, साधू-संत, साध्वी यांच्या उपस्थितीत उपधान तप सुरू आहे. मुंबई येथील ६३ वर्षांच्या मंजुलाबेन नेमावत व सुरत येथील १३ वर्षांची मोक्षाबेन शाह यांच्या दीक्षा समारंभानिमित्त शनिवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती. रविवारी (दि.२४) गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज, आचार्य भव्यभूषण सुरीश्वरजी महाराज, आचार्य भवनभूषण सुरीश्वरजी महाराज, आचार्य वज्रभूषण सुरीश्वरजी महाराज यांच्यासह जैन साधू, साध्वी यांच्या उपस्थितीत मंजुलाबेन व मोक्षाबेन यांचा दीक्षा सोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला. दीक्षा समारंभानंतर मंजुलाबेन यांचे नाव मार्गदर्क्षिताश्रीजी म.सा. व मोक्षाबेन यांचे कारण्युप्रिया श्रीजी म. सा. असे करण्यात आले. यावेळी जैनबांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आज नाशिकरोडला साधकांची शोभायात्राउपधान तपात सहभागी झालेल्या साधकांची शोभायात्रा मंगळवारी (दि.२६) सकाळी साडेआठ वाजता आर्टिलरी सेंटररोड जैन मंदिरापासून निघणार आहे. शोभायात्रा अनुराधा चौक, बिटको, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, अनुराधा चौकमार्गे आर्टिलरी सेंटररोड, गाडेकर मळा येथील मनपाच्या मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे.सायंकाळी ६ वाजता कलापूर्णम तीर्थधाममध्ये संध्या महापूजा, स्त्रोत भक्ती कार्यक्रम होऊन त्यानंतर आयोजक व साधक कुटुंबीयांचा सत्कार केला जाणार आहे. बुधवारी मोक्षमाळ कार्यक्रमाने उपधान तपाची समाप्ती होणार आहे.जैन समाजामध्ये ज्या कोणास दीक्षा घ्यायची असेल त्यास एक ते दीड वर्ष जैन साधू, साध्वी यांच्या सोबत राहून साधू जीवन नियमाप्रमाणे जगावे लागते. दीक्षा घेणाऱ्यांची गुरू परीक्षा घेतात. योग्यता वाटली तर संबंधिताच्या कुटुंबाची व दीक्षार्थीची परवानगी घेऊनच धार्मिक विधीप्रमाणे दीक्षा दिली जाते. दीक्षा घेतल्यानंतर पुढील संपूर्ण जीवन कुटुंब, नातेवाईक, संसारी जीवन आदी सर्वांचा त्याग करून गुरू सान्निध्यात राहून पवित्र आचार-विचार व तप, त्यागमय जीवन जगावे लागते. अहिंसेच्या पायावर आधारित या दीक्षा जीवनात स्वत:ला जगण्यासाठी एकाही व्यक्ती किंवा जीव-जंतूला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही, हा दीक्षा जीवनाचा मूलमंत्र आहे.- मुक्तिभूषणजी विजयजी महाराज

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमJain Templeजैन मंदीर