शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
4
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
6
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
7
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
8
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
9
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
10
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
11
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
12
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
13
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
14
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
15
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
16
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
17
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
18
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
19
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

नाशिकरोड येथे दीक्षा सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:21 IST

शहरातील नाशिकरोड येथे सुरू असलेल्या उपधान तपामध्ये रविवारी गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षा सोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला.

नाशिक : शहरातील नाशिकरोड येथे सुरू असलेल्या उपधान तपामध्ये रविवारी गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षा सोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला. उपधान तपातील साधकांची मंगळवारी  (दि. २६) नाशिकरोड येथे शोभायात्रा काढण्यात येणार असून, बुधवारी (दि.२७) मोक्षमाळ कार्यक्रमाने उपधान तपाची सांगता होणार आहे.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाममध्ये गेल्या ४७ दिवसांपासून गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्यासह आचार्य, साधू-संत, साध्वी यांच्या उपस्थितीत उपधान तप सुरू आहे. मुंबई येथील ६३ वर्षांच्या मंजुलाबेन नेमावत व सुरत येथील १३ वर्षांची मोक्षाबेन शाह यांच्या दीक्षा समारंभानिमित्त शनिवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती. रविवारी (दि.२४) गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज, आचार्य भव्यभूषण सुरीश्वरजी महाराज, आचार्य भवनभूषण सुरीश्वरजी महाराज, आचार्य वज्रभूषण सुरीश्वरजी महाराज यांच्यासह जैन साधू, साध्वी यांच्या उपस्थितीत मंजुलाबेन व मोक्षाबेन यांचा दीक्षा सोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला. दीक्षा समारंभानंतर मंजुलाबेन यांचे नाव मार्गदर्क्षिताश्रीजी म.सा. व मोक्षाबेन यांचे कारण्युप्रिया श्रीजी म. सा. असे करण्यात आले. यावेळी जैनबांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आज नाशिकरोडला साधकांची शोभायात्राउपधान तपात सहभागी झालेल्या साधकांची शोभायात्रा मंगळवारी (दि.२६) सकाळी साडेआठ वाजता आर्टिलरी सेंटररोड जैन मंदिरापासून निघणार आहे. शोभायात्रा अनुराधा चौक, बिटको, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, अनुराधा चौकमार्गे आर्टिलरी सेंटररोड, गाडेकर मळा येथील मनपाच्या मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे.सायंकाळी ६ वाजता कलापूर्णम तीर्थधाममध्ये संध्या महापूजा, स्त्रोत भक्ती कार्यक्रम होऊन त्यानंतर आयोजक व साधक कुटुंबीयांचा सत्कार केला जाणार आहे. बुधवारी मोक्षमाळ कार्यक्रमाने उपधान तपाची समाप्ती होणार आहे.जैन समाजामध्ये ज्या कोणास दीक्षा घ्यायची असेल त्यास एक ते दीड वर्ष जैन साधू, साध्वी यांच्या सोबत राहून साधू जीवन नियमाप्रमाणे जगावे लागते. दीक्षा घेणाऱ्यांची गुरू परीक्षा घेतात. योग्यता वाटली तर संबंधिताच्या कुटुंबाची व दीक्षार्थीची परवानगी घेऊनच धार्मिक विधीप्रमाणे दीक्षा दिली जाते. दीक्षा घेतल्यानंतर पुढील संपूर्ण जीवन कुटुंब, नातेवाईक, संसारी जीवन आदी सर्वांचा त्याग करून गुरू सान्निध्यात राहून पवित्र आचार-विचार व तप, त्यागमय जीवन जगावे लागते. अहिंसेच्या पायावर आधारित या दीक्षा जीवनात स्वत:ला जगण्यासाठी एकाही व्यक्ती किंवा जीव-जंतूला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही, हा दीक्षा जीवनाचा मूलमंत्र आहे.- मुक्तिभूषणजी विजयजी महाराज

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमJain Templeजैन मंदीर