शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

शासकीय तलावात खोदल्या विहिरी

By admin | Updated: December 12, 2015 23:59 IST

कारवाईची मागणी : परिसरातील शेतकरी संतप्त

येवला : सुरेगाव शिवारात शासकीय मालकीच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या सुमारे ५० एकर क्षेत्रातील तलावात काही शेतकरी दांडगाईने विहिरी खोदत असून, या विहिरी तत्काळ बुजवाव्यात, अशी मागणी येथील सुमारे ५० शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, तलाठी पातळीवर तात्पुरते काम बंद केले असले तरी पुन्हा दांडगाईने काम सुरू केले जाण्याची शक्यता निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने तळे राखावे आणि आमच्या जनावरांना पाणी चाखायला राहू द्यावे, असे आवाहन करून या तलावात असलेल्या विहिरी कायमस्वरूपी बुजवून टाकाव्यात आणि बेकायदेशीर विहिरी खोदणाऱ्या शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सुरेगाव शिवारात पालखेड डाव्या कालव्यालगत शासकीय मालकीच्या ५० एकर क्षेत्रात १९७२ साली दुष्काळी कामात हा तलाव तयार केला आहे. पिंपळखुटे या वनक्षेत्र शिवाराजवळ हा तलाव आहे. पालखेडच्या पाण्याने हा तलाव आवर्तनाच्या दरम्यान भरून दिला जातो. गवंडगाव, सुरेगाव, पिंपळखुटे, तळवाडे देवळाणे, भुलेगावसह परिसरातील हरणे, शेळ्यामेंढ्या व इतर जनावरे मोठ्या संख्येने पाणी पिण्यासाठी या तलावावर येतात. या बंधाऱ्यालगत शेतकऱ्यांच्या ५० ते ६० विहिरी त्यांच्या खासगी क्षेत्रात पूर्वीपासून आहेत. परंतु काही शेतकऱ्यांनी कायद्याला गुंडाळून थेट तलावातच चार विहिरी खोदण्याचा उद्योग केला. दोन विहिरी तर पूर्णत्वास गेल्या आहेत. दरम्यान, तहसीलदार शरद मंडलिक यांनी या कार्यक्षेत्रातील चोपडे या तलाठी कर्मचाऱ्याला पाठवून सदर विहिरीचे काम बंद केले असले तरी कायमस्वरूपी या तलावातील विहिरी पूर्णत: बुजवून टाकाव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. भाऊसाहेब भागवत, गणेश भागवत, रामेश्वर गायकवाड, सुभाष साळुंके, विलास भागवत, सिराज सय्यद, सोन्याबापू भागवत, फकीरा भागवत, ईश्वर सोमासे, बाबासाहेब पवार यांच्यासह ५० शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)