शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शासकीय तलावात खोदल्या विहिरी

By admin | Updated: December 12, 2015 23:59 IST

कारवाईची मागणी : परिसरातील शेतकरी संतप्त

येवला : सुरेगाव शिवारात शासकीय मालकीच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेल्या सुमारे ५० एकर क्षेत्रातील तलावात काही शेतकरी दांडगाईने विहिरी खोदत असून, या विहिरी तत्काळ बुजवाव्यात, अशी मागणी येथील सुमारे ५० शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, तलाठी पातळीवर तात्पुरते काम बंद केले असले तरी पुन्हा दांडगाईने काम सुरू केले जाण्याची शक्यता निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने तळे राखावे आणि आमच्या जनावरांना पाणी चाखायला राहू द्यावे, असे आवाहन करून या तलावात असलेल्या विहिरी कायमस्वरूपी बुजवून टाकाव्यात आणि बेकायदेशीर विहिरी खोदणाऱ्या शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सुरेगाव शिवारात पालखेड डाव्या कालव्यालगत शासकीय मालकीच्या ५० एकर क्षेत्रात १९७२ साली दुष्काळी कामात हा तलाव तयार केला आहे. पिंपळखुटे या वनक्षेत्र शिवाराजवळ हा तलाव आहे. पालखेडच्या पाण्याने हा तलाव आवर्तनाच्या दरम्यान भरून दिला जातो. गवंडगाव, सुरेगाव, पिंपळखुटे, तळवाडे देवळाणे, भुलेगावसह परिसरातील हरणे, शेळ्यामेंढ्या व इतर जनावरे मोठ्या संख्येने पाणी पिण्यासाठी या तलावावर येतात. या बंधाऱ्यालगत शेतकऱ्यांच्या ५० ते ६० विहिरी त्यांच्या खासगी क्षेत्रात पूर्वीपासून आहेत. परंतु काही शेतकऱ्यांनी कायद्याला गुंडाळून थेट तलावातच चार विहिरी खोदण्याचा उद्योग केला. दोन विहिरी तर पूर्णत्वास गेल्या आहेत. दरम्यान, तहसीलदार शरद मंडलिक यांनी या कार्यक्षेत्रातील चोपडे या तलाठी कर्मचाऱ्याला पाठवून सदर विहिरीचे काम बंद केले असले तरी कायमस्वरूपी या तलावातील विहिरी पूर्णत: बुजवून टाकाव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. भाऊसाहेब भागवत, गणेश भागवत, रामेश्वर गायकवाड, सुभाष साळुंके, विलास भागवत, सिराज सय्यद, सोन्याबापू भागवत, फकीरा भागवत, ईश्वर सोमासे, बाबासाहेब पवार यांच्यासह ५० शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)