शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एलएलबी द्वितीय वर्ष पुनर्परीक्षेच्या प्रवेशपत्रांचा घोळ, २४ ऑक्टोबरपासून परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:31 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची पुनर्परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, नाशिक मधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एलएलबीच्या पुनर्परीक्षार्थी २०५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र त्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली असून, परीक्षा देता न आल्यास त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देएलएलबी दि्वतीय वर्षाच्या पुनरपरीक्षा प्रवेशपत्रांचा घोळ २४ ऑक्टोबरपासून परीक्षा 205 पैरी 15 विद्यार्थ्यांची अडचण

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची पुनर्परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, नाशिक मधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एलएलबीच्या पुनर्परीक्षार्थी २०५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र त्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण झाली असून, परीक्षा देता न आल्यास त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखा पदवी अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी २०१४ च्या जुन्या अभ्यासक्रमानुसार आॅक्टोबर २०१८ मध्ये पुनर्परीक्षा देत आहेत. त्यांना परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र महाविद्यालयातून प्राप्त करणे अनिवार्य आहे. परंतु नाशिकमधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातून एलएलबी द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा देणाºया २०५ विद्यार्थ्यांपैकी ५७ विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र विद्यापीठाकडून महाविद्यालयाला प्राप्त झालेले नसल्याने विद्यार्थ्यांनाही ते मिळू शकलेले नाही. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाक डून महाविद्यालयांच्या मेल आयडीवर पाठविले जातात. या प्रवेशपत्रांचे महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. परंतु महाविद्यालयाला विद्यापीठाकडूनच ओळखपत्र पाप्त झाले नसल्यामुळे महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संपर्क  साधण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर जवळपास ४२ विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र विद्यापीठाकडून पाठविण्यात आले. मात्र त्यानंतरही १५ विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळण्याची प्रतीक्षा कायम असून, या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राअभावी परीक्षा देता आली नाही, तर त्यांचे वर्ष पुन्हा एकदा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

विद्यार्थी संघटना आक्रमक विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विधी शाखेच्या द्वितीय वर्ष पदवी पुनर्परीक्षेच्या प्रवेशपत्रांचा घोळ घातल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत असतानाही अद्याप विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांचा घोळ मिटलेला नाही. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाचे अधिकारी योगेश सोनार यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.  

प्रवेशपत्रांच्या वाटपात विद्यापीठाच्या यंत्रणेकडूनच त्रुटी राहिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून, ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. - तुषार जाधव, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, नाशिक 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ