शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सर्वत्र समान संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:53 IST

राजकारण अधिकतर लाटांवर चालते हे खरेच, पण जेव्हा या लाटा ओसरतात, तेव्हा साºयांना सर्वत्र समान संधी खुणावू लागते. सद्य राजकीय स्थितीत तसेच चित्र असल्याने स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकीत आयाराम-गयारामांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले असून, सर्वच राजकीय पक्षांत कमी-अधिक प्रमाणात ही भरती होत असल्याने कुणाला हुरळून जाण्याचे अगर कुणाला चिंताक्रांत होण्याचे कारण नाही.

ठळक मुद्देस्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकीत आयाराम-गयारामांचे पेव आजच्या प्राथमिक अवस्थेत सर्वांना समान संधी

राजकारण अधिकतर लाटांवर चालते हे खरेच, पण जेव्हा या लाटा ओसरतात, तेव्हा साºयांना सर्वत्र समान संधी खुणावू लागते. सद्य राजकीय स्थितीत तसेच चित्र असल्याने स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकीत आयाराम-गयारामांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले असून, सर्वच राजकीय पक्षांत कमी-अधिक प्रमाणात ही भरती होत असल्याने कुणाला हुरळून जाण्याचे अगर कुणाला चिंताक्रांत होण्याचे कारण नाही.जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या दोन्ही शहरांचे ‘गावपण’ तसे वेगळे आहे. इगतपुरी हे रेल्वे जंक्शनमुळे नावारूपास आले आहे, तर त्र्यंबकला ज्योतिर्लिंगामुळे ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभला आहे. इगतपुरीत राजकीयदृष्ट्या अलीकडच्या काळात शिवसेनेचा तर त्र्यंबकमध्ये भाजपाचा वरचष्मा राहिलेला दिसून येत असला तरी या दोन्हींच्या मिळून असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसच्या निर्मला गावित करीत आहेत. काही कालावधीनंतर यंदा थेट नगराध्यक्ष निवडून द्यायचा असल्याने तर अधिकच उत्साहाचे वातावरण आहे. त्यात नाही म्हटले तरी भाजपाला मध्यंतरी आलेले ‘भरते’ ओसरताना दिसत असल्याने प्रत्येकच राजकीय पक्षाबाबत अनुकूल वा प्रतिकूलता भासावी, अशी स्थिती आहे. त्यामुळेच, संधी जिकडे खुणावेल तिकडे उड्या मारण्याकडे इच्छुकांचा कल दिसत आहे. गेल्या काही दिवसांत सर्वच राजकीय पक्षांत भरती-ओहोटीचे प्रमाण मोठे राहिलेले दिसून आले तेही त्यातूनच. अर्थात, कुणी राजी व्हावे किंवा नाराज व्हावे, असेही नाही. शिवसेना, भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादीसह मनसे या साºयांमध्येच कमी-अधिक प्रमाणात पडझड झाली आहे. एक मात्र लक्षात घेता येणारे आहे की, भाजपाचा बोलबाला म्हटला जात असताना या पक्षाचे प्रभावक्षेत्र म्हणविणाºया त्र्यंबकेश्वरमध्ये काही नगरसेवक व खंद्द्या कार्यकर्त्यांनी अन्य पक्षांचा रस्ता धरला आहे. पारंपरिक ‘युती’ अंतर्गत वरचढ होऊ पाहणाºया शिवसेनेत काही जणांनी जाणे हे राजकीय स्वभावधर्माला साजेसे असल्याने समजूनही घेता यावे, परंतु काहीजण काँग्रेसमध्येही गेले आहेत. भलेही संधीच्या शोधात, म्हणजे तिकिटासाठी हे आवागमन झाले असेल, पण गल्ली ते दिल्ली भाजपाच्या चलतीच्या काळात काँग्रेसला असे ‘अच्छे दिन’ येताना दिसणार असतील तर, वातावरण बदलते आहे, असाच अर्थ त्यातून काढता यावा. विशेष म्हणजे, इगतपुरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते कै. गोपाळराव गुळवे यांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली. त्यांचे पुत्र संदीप यांनी गेल्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांपूर्वी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. आता वर्ष उलटत नाही तोच ते शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करते झाले आहेत. पण आश्चर्याची बाब यापुढे आहे व ती म्हणजे ज्यांच्यामुळे आपण डावलले जात असल्याची भावना व्यक्त करीत त्यांनी काँग्रेस सोडली होती व या दोघांतील वितुष्ट उघडपणे दिसून येत होते, त्याच आमदार निर्मला गावित यांनी त्यांना पुन्हा स्वगृही परतण्याचे आवतण दिले आहे म्हणे. थोडक्यात, कुणालाच कुणी वर्ज्य नाही. तसेही पक्षनिष्ठा वगैरे आता बासनात बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याची भिड कुणाला राहिलेली नाही. रोकडा संधीचा विचार सर्वांकडून केला जातो. आज काय मिळणार आहे, हे बघून पक्षांतरे होत आहेत. पक्षात येऊन पक्ष कार्य करून नंतर काही मिळविण्यासाठी थांबायला कुणी तयार नाही. त्यामुळे आज एकीकडे काही न मिळाल्यास उद्या हेच आयाराम पुन्हा दुसरीकडे उड्या मारताना दिसून येऊ शकतात. पण ही पक्षांतरे होत असताना बहुधा एखाद्या लाटेमुळे जसे घडून येते तसे कुणा एका पक्षाकडे हा जाणाºयांचा ओढा नसून सर्वच पक्षांत आयाराम-गयारामांचे सत्र सुरू असलेले दिसून येत आहे. आजच्या प्राथमिक अवस्थेत सर्वांना समान संधी दिसत असल्याचे म्हणता यावे, ते त्यामुळेच.