शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
4
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
5
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
6
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
7
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
8
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
9
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
10
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
11
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
12
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
13
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
14
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
15
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
16
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
17
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
18
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
19
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
20
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी

सर्वत्र समान संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:53 IST

राजकारण अधिकतर लाटांवर चालते हे खरेच, पण जेव्हा या लाटा ओसरतात, तेव्हा साºयांना सर्वत्र समान संधी खुणावू लागते. सद्य राजकीय स्थितीत तसेच चित्र असल्याने स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकीत आयाराम-गयारामांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले असून, सर्वच राजकीय पक्षांत कमी-अधिक प्रमाणात ही भरती होत असल्याने कुणाला हुरळून जाण्याचे अगर कुणाला चिंताक्रांत होण्याचे कारण नाही.

ठळक मुद्देस्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकीत आयाराम-गयारामांचे पेव आजच्या प्राथमिक अवस्थेत सर्वांना समान संधी

राजकारण अधिकतर लाटांवर चालते हे खरेच, पण जेव्हा या लाटा ओसरतात, तेव्हा साºयांना सर्वत्र समान संधी खुणावू लागते. सद्य राजकीय स्थितीत तसेच चित्र असल्याने स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकीत आयाराम-गयारामांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले असून, सर्वच राजकीय पक्षांत कमी-अधिक प्रमाणात ही भरती होत असल्याने कुणाला हुरळून जाण्याचे अगर कुणाला चिंताक्रांत होण्याचे कारण नाही.जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या दोन्ही शहरांचे ‘गावपण’ तसे वेगळे आहे. इगतपुरी हे रेल्वे जंक्शनमुळे नावारूपास आले आहे, तर त्र्यंबकला ज्योतिर्लिंगामुळे ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभला आहे. इगतपुरीत राजकीयदृष्ट्या अलीकडच्या काळात शिवसेनेचा तर त्र्यंबकमध्ये भाजपाचा वरचष्मा राहिलेला दिसून येत असला तरी या दोन्हींच्या मिळून असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसच्या निर्मला गावित करीत आहेत. काही कालावधीनंतर यंदा थेट नगराध्यक्ष निवडून द्यायचा असल्याने तर अधिकच उत्साहाचे वातावरण आहे. त्यात नाही म्हटले तरी भाजपाला मध्यंतरी आलेले ‘भरते’ ओसरताना दिसत असल्याने प्रत्येकच राजकीय पक्षाबाबत अनुकूल वा प्रतिकूलता भासावी, अशी स्थिती आहे. त्यामुळेच, संधी जिकडे खुणावेल तिकडे उड्या मारण्याकडे इच्छुकांचा कल दिसत आहे. गेल्या काही दिवसांत सर्वच राजकीय पक्षांत भरती-ओहोटीचे प्रमाण मोठे राहिलेले दिसून आले तेही त्यातूनच. अर्थात, कुणी राजी व्हावे किंवा नाराज व्हावे, असेही नाही. शिवसेना, भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादीसह मनसे या साºयांमध्येच कमी-अधिक प्रमाणात पडझड झाली आहे. एक मात्र लक्षात घेता येणारे आहे की, भाजपाचा बोलबाला म्हटला जात असताना या पक्षाचे प्रभावक्षेत्र म्हणविणाºया त्र्यंबकेश्वरमध्ये काही नगरसेवक व खंद्द्या कार्यकर्त्यांनी अन्य पक्षांचा रस्ता धरला आहे. पारंपरिक ‘युती’ अंतर्गत वरचढ होऊ पाहणाºया शिवसेनेत काही जणांनी जाणे हे राजकीय स्वभावधर्माला साजेसे असल्याने समजूनही घेता यावे, परंतु काहीजण काँग्रेसमध्येही गेले आहेत. भलेही संधीच्या शोधात, म्हणजे तिकिटासाठी हे आवागमन झाले असेल, पण गल्ली ते दिल्ली भाजपाच्या चलतीच्या काळात काँग्रेसला असे ‘अच्छे दिन’ येताना दिसणार असतील तर, वातावरण बदलते आहे, असाच अर्थ त्यातून काढता यावा. विशेष म्हणजे, इगतपुरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते कै. गोपाळराव गुळवे यांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली. त्यांचे पुत्र संदीप यांनी गेल्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांपूर्वी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. आता वर्ष उलटत नाही तोच ते शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करते झाले आहेत. पण आश्चर्याची बाब यापुढे आहे व ती म्हणजे ज्यांच्यामुळे आपण डावलले जात असल्याची भावना व्यक्त करीत त्यांनी काँग्रेस सोडली होती व या दोघांतील वितुष्ट उघडपणे दिसून येत होते, त्याच आमदार निर्मला गावित यांनी त्यांना पुन्हा स्वगृही परतण्याचे आवतण दिले आहे म्हणे. थोडक्यात, कुणालाच कुणी वर्ज्य नाही. तसेही पक्षनिष्ठा वगैरे आता बासनात बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्याची भिड कुणाला राहिलेली नाही. रोकडा संधीचा विचार सर्वांकडून केला जातो. आज काय मिळणार आहे, हे बघून पक्षांतरे होत आहेत. पक्षात येऊन पक्ष कार्य करून नंतर काही मिळविण्यासाठी थांबायला कुणी तयार नाही. त्यामुळे आज एकीकडे काही न मिळाल्यास उद्या हेच आयाराम पुन्हा दुसरीकडे उड्या मारताना दिसून येऊ शकतात. पण ही पक्षांतरे होत असताना बहुधा एखाद्या लाटेमुळे जसे घडून येते तसे कुणा एका पक्षाकडे हा जाणाºयांचा ओढा नसून सर्वच पक्षांत आयाराम-गयारामांचे सत्र सुरू असलेले दिसून येत आहे. आजच्या प्राथमिक अवस्थेत सर्वांना समान संधी दिसत असल्याचे म्हणता यावे, ते त्यामुळेच.