शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

"सर्वांनाच कॅबिनेट मंत्री व्हायचेय, मंत्रिमंडळ विस्तार होणार कसा?"; काँग्रेसचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 18:18 IST

नाशिक - राज्यात संविधानिक तत्त्वांची पायमल्ली करून सत्तांतर घडवून आणले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सर्व ४० ते ...

नाशिक - राज्यात संविधानिक तत्त्वांची पायमल्ली करून सत्तांतर घडवून आणले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सर्व ४० ते ५० आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले आहे. आता सर्वांचीच कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होणार कसा? असा खोचक सवाल उपस्थित करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत, म्हणूनच ते माईक ओढून, चिठ्ठी देऊन तर कधी शर्ट ओढून सल्लागाराच्या भूमिकेत कार्यरत असल्याची बोचरी टीका काँग्रेसचे विधानसभा गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

नाशिक शहरातील तुपसाखरे लॉन्स येथे रविवारी (दि. ३१) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत नाशिक शहर व ग्रामीण, तसेच मालेगाव शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर व नाशिक काँग्रेसचे सहप्रभारी ब्रीज दत्त, अतुल लोंढे, माजी नगरसेवक शाहू खैरे, प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, हेमलता पाटील, वत्सला खैरे आदी उपस्थित होते.

राज्यात विचित्र परिस्थितीत पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन करून सरकार स्थापन झाले आहे. या सरकारला महिना पूर्ण होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. कारण या सरकारला न्यायालयाच्या निर्णयाचीही भीती असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यात अतिवृष्टी आणि महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार नसल्याने कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री नाही, अशा परिस्थितीत राज्यातील सर्वसामान्य जनता विविध समस्यांनी त्रस्त असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सातत्याने दिल्ली वारी करण्यात व्यस्त असल्याची खोचक टीका त्यांनी यावेळी केली.

बापाच्या आधी मुलगा निवृत्त-हेच अच्छे दिन का?

काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे वडिलांच्या अगोदर मुलगा निवृत्त होणार असल्याचा दिवस देशातील जनतेला पहायला मिळणार असल्याची बोचरी टीका करतानाच हेच अच्छे दिन आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी केला. तसेच देशात व राज्यात महत्त्वाच्या विषयावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी ईडीचा वापर होत असून शिवसनेचे नेते संजय राऊत यांना झालेली अटक त्याचाच भाग असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस