शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

"सर्वांनाच कॅबिनेट मंत्री व्हायचेय, मंत्रिमंडळ विस्तार होणार कसा?"; काँग्रेसचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 18:18 IST

नाशिक - राज्यात संविधानिक तत्त्वांची पायमल्ली करून सत्तांतर घडवून आणले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सर्व ४० ते ...

नाशिक - राज्यात संविधानिक तत्त्वांची पायमल्ली करून सत्तांतर घडवून आणले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सर्व ४० ते ५० आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले आहे. आता सर्वांचीच कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होणार कसा? असा खोचक सवाल उपस्थित करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत, म्हणूनच ते माईक ओढून, चिठ्ठी देऊन तर कधी शर्ट ओढून सल्लागाराच्या भूमिकेत कार्यरत असल्याची बोचरी टीका काँग्रेसचे विधानसभा गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

नाशिक शहरातील तुपसाखरे लॉन्स येथे रविवारी (दि. ३१) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत नाशिक शहर व ग्रामीण, तसेच मालेगाव शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर व नाशिक काँग्रेसचे सहप्रभारी ब्रीज दत्त, अतुल लोंढे, माजी नगरसेवक शाहू खैरे, प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, हेमलता पाटील, वत्सला खैरे आदी उपस्थित होते.

राज्यात विचित्र परिस्थितीत पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन करून सरकार स्थापन झाले आहे. या सरकारला महिना पूर्ण होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. कारण या सरकारला न्यायालयाच्या निर्णयाचीही भीती असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यात अतिवृष्टी आणि महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार नसल्याने कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री नाही, अशा परिस्थितीत राज्यातील सर्वसामान्य जनता विविध समस्यांनी त्रस्त असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सातत्याने दिल्ली वारी करण्यात व्यस्त असल्याची खोचक टीका त्यांनी यावेळी केली.

बापाच्या आधी मुलगा निवृत्त-हेच अच्छे दिन का?

काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे वडिलांच्या अगोदर मुलगा निवृत्त होणार असल्याचा दिवस देशातील जनतेला पहायला मिळणार असल्याची बोचरी टीका करतानाच हेच अच्छे दिन आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी केला. तसेच देशात व राज्यात महत्त्वाच्या विषयावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी ईडीचा वापर होत असून शिवसनेचे नेते संजय राऊत यांना झालेली अटक त्याचाच भाग असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस