शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

"सर्वांनाच कॅबिनेट मंत्री व्हायचेय, मंत्रिमंडळ विस्तार होणार कसा?"; काँग्रेसचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 18:18 IST

नाशिक - राज्यात संविधानिक तत्त्वांची पायमल्ली करून सत्तांतर घडवून आणले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सर्व ४० ते ...

नाशिक - राज्यात संविधानिक तत्त्वांची पायमल्ली करून सत्तांतर घडवून आणले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सर्व ४० ते ५० आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले आहे. आता सर्वांचीच कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होणार कसा? असा खोचक सवाल उपस्थित करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत, म्हणूनच ते माईक ओढून, चिठ्ठी देऊन तर कधी शर्ट ओढून सल्लागाराच्या भूमिकेत कार्यरत असल्याची बोचरी टीका काँग्रेसचे विधानसभा गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

नाशिक शहरातील तुपसाखरे लॉन्स येथे रविवारी (दि. ३१) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत नाशिक शहर व ग्रामीण, तसेच मालेगाव शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर व नाशिक काँग्रेसचे सहप्रभारी ब्रीज दत्त, अतुल लोंढे, माजी नगरसेवक शाहू खैरे, प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, हेमलता पाटील, वत्सला खैरे आदी उपस्थित होते.

राज्यात विचित्र परिस्थितीत पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन करून सरकार स्थापन झाले आहे. या सरकारला महिना पूर्ण होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. कारण या सरकारला न्यायालयाच्या निर्णयाचीही भीती असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यात अतिवृष्टी आणि महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार नसल्याने कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री नाही, अशा परिस्थितीत राज्यातील सर्वसामान्य जनता विविध समस्यांनी त्रस्त असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सातत्याने दिल्ली वारी करण्यात व्यस्त असल्याची खोचक टीका त्यांनी यावेळी केली.

बापाच्या आधी मुलगा निवृत्त-हेच अच्छे दिन का?

काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे वडिलांच्या अगोदर मुलगा निवृत्त होणार असल्याचा दिवस देशातील जनतेला पहायला मिळणार असल्याची बोचरी टीका करतानाच हेच अच्छे दिन आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी केला. तसेच देशात व राज्यात महत्त्वाच्या विषयावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी ईडीचा वापर होत असून शिवसनेचे नेते संजय राऊत यांना झालेली अटक त्याचाच भाग असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस