शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गुरु नानकजींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:17 IST

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त गुरूगोविंद सिंग फाउंडेशनच्या परिसरात ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होया सह विविध भजनांचे सुमधुर कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी शीखबांधवांनी गुरुगोविंद सिंग फाउंडेशन येथे सुरू असलेल्या प्रकाश पर्वात उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.

ठळक मुद्देप्रकाश पर्व : भजन, कीर्तनासह विविध धार्मिक उपक्रम

इंदिरानगर : शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त गुरूगोविंद सिंग फाउंडेशनच्या परिसरात ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होया सह विविध भजनांचे सुमधुर कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी शीखबांधवांनी गुरुगोविंद सिंग फाउंडेशन येथे सुरू असलेल्या प्रकाश पर्वात उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.शहरातील गुरूनानक देवजी सेवा असोसिएशनद्वारा साजऱ्या करण्यात येत असलेल्या ५५०व्या गुरूनानक जयंतीनिमित्त आयोजित दोन दिवसीय विशेष प्रकाश पर्वानिमित्त शीख कीर्तन जत्थाचे मुख्य कीर्तनकार भाई अमनदीप सिंघजी, भाई बलप्रित सिंघजी आणि भाई सीम्रनजीत सिंघजी यांनी आपल्या विशेष कीर्तनांद्वारे गुरूनानक देवजी यांच्या विचारांबद्दल आपल्या ओघवत्या वाणीद्वारे मार्गदर्शन केले. या सर्व कीर्तनांचा मतितार्थ असा होता की, गुरु नानक देवजी यांची शिकवण म्हणजे घराच्या दरवाज्यावर लावलेला दिवा आहे, जो घराच्या आत ही प्रकाश देतो आणि घराच्या बाहेरही प्रकाश देतो. मानवाचे अंतर्मनही अंतर्बाह्य प्रकाशमान करण्यासाठी त्यांची शिकवण आजही हरप्रकारे आपल्याला मार्गदर्शक आहे. सर्व शक्य मार्गांनी त्यांची सेवा करा. अशाने सौहार्दपूर्ण वातावरणाची निर्मिती होईल जी सर्व समाजाला तसेच देशाला स्वस्थ ठेवेल, असे यावेळी कीर्तनात सांगण्यात आले. या प्रकाश पर्व सोहोळ्यामध्ये आमदार सीमा हिरे, स्कूल आॅफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल सलारिया, नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, वाघ एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी समीर वाघ यांनीदेखील विशेष उपस्थिती लावली. यावेळी गुरुगोबिंद सिंघ फाउंडेशनचे अध्यक्ष गुरदेव सिंघ बिर्दी, सचिव बलबीर सिंघ छाब्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी परिमंदर सिंग तसेच गुरुनानक देवजी सेवा असोसिएशनच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, फाउंडेशनच्या सर्व शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी तसेच शहरातील शीख बांधव, उपस्थित होते.मनुष्याने नेहमी सत्कर्म करावेयावेळी कीर्तनात सांगण्यात आले की, राष्ट्रीय एकात्मतेला पोषक वातावरण निर्माण होईल यासाठी मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत रहा, मनुष्याने मनुष्याशी मनुष्यासारखे वागले पाहिजे. जात, पंथ, धार्मिक मतभेद दूर करण्यासाठीच गुरूनानकजी यांनी लंगरची प्रथा सुरू केली. जिथे कोणताही भेदभाव न होता सर्वजण एका पंगतीत बसून अन्नग्रहण करतात. गुरूची शिकवण मनुष्याला नेहमीच सर्वांगीण विकासाला पोषक ठरते असे मार्गदर्शन या कथा कीर्तनाद्वारे लाभले.

टॅग्स :NashikनाशिकsikhशीखReligious programmeधार्मिक कार्यक्रम