शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

गुरु नानकजींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:17 IST

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त गुरूगोविंद सिंग फाउंडेशनच्या परिसरात ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होया सह विविध भजनांचे सुमधुर कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी शीखबांधवांनी गुरुगोविंद सिंग फाउंडेशन येथे सुरू असलेल्या प्रकाश पर्वात उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.

ठळक मुद्देप्रकाश पर्व : भजन, कीर्तनासह विविध धार्मिक उपक्रम

इंदिरानगर : शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त गुरूगोविंद सिंग फाउंडेशनच्या परिसरात ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होया सह विविध भजनांचे सुमधुर कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी शीखबांधवांनी गुरुगोविंद सिंग फाउंडेशन येथे सुरू असलेल्या प्रकाश पर्वात उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.शहरातील गुरूनानक देवजी सेवा असोसिएशनद्वारा साजऱ्या करण्यात येत असलेल्या ५५०व्या गुरूनानक जयंतीनिमित्त आयोजित दोन दिवसीय विशेष प्रकाश पर्वानिमित्त शीख कीर्तन जत्थाचे मुख्य कीर्तनकार भाई अमनदीप सिंघजी, भाई बलप्रित सिंघजी आणि भाई सीम्रनजीत सिंघजी यांनी आपल्या विशेष कीर्तनांद्वारे गुरूनानक देवजी यांच्या विचारांबद्दल आपल्या ओघवत्या वाणीद्वारे मार्गदर्शन केले. या सर्व कीर्तनांचा मतितार्थ असा होता की, गुरु नानक देवजी यांची शिकवण म्हणजे घराच्या दरवाज्यावर लावलेला दिवा आहे, जो घराच्या आत ही प्रकाश देतो आणि घराच्या बाहेरही प्रकाश देतो. मानवाचे अंतर्मनही अंतर्बाह्य प्रकाशमान करण्यासाठी त्यांची शिकवण आजही हरप्रकारे आपल्याला मार्गदर्शक आहे. सर्व शक्य मार्गांनी त्यांची सेवा करा. अशाने सौहार्दपूर्ण वातावरणाची निर्मिती होईल जी सर्व समाजाला तसेच देशाला स्वस्थ ठेवेल, असे यावेळी कीर्तनात सांगण्यात आले. या प्रकाश पर्व सोहोळ्यामध्ये आमदार सीमा हिरे, स्कूल आॅफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल सलारिया, नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, वाघ एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी समीर वाघ यांनीदेखील विशेष उपस्थिती लावली. यावेळी गुरुगोबिंद सिंघ फाउंडेशनचे अध्यक्ष गुरदेव सिंघ बिर्दी, सचिव बलबीर सिंघ छाब्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी परिमंदर सिंग तसेच गुरुनानक देवजी सेवा असोसिएशनच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, फाउंडेशनच्या सर्व शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी तसेच शहरातील शीख बांधव, उपस्थित होते.मनुष्याने नेहमी सत्कर्म करावेयावेळी कीर्तनात सांगण्यात आले की, राष्ट्रीय एकात्मतेला पोषक वातावरण निर्माण होईल यासाठी मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत रहा, मनुष्याने मनुष्याशी मनुष्यासारखे वागले पाहिजे. जात, पंथ, धार्मिक मतभेद दूर करण्यासाठीच गुरूनानकजी यांनी लंगरची प्रथा सुरू केली. जिथे कोणताही भेदभाव न होता सर्वजण एका पंगतीत बसून अन्नग्रहण करतात. गुरूची शिकवण मनुष्याला नेहमीच सर्वांगीण विकासाला पोषक ठरते असे मार्गदर्शन या कथा कीर्तनाद्वारे लाभले.

टॅग्स :NashikनाशिकsikhशीखReligious programmeधार्मिक कार्यक्रम