शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

गुरु नानकजींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:17 IST

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त गुरूगोविंद सिंग फाउंडेशनच्या परिसरात ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होया सह विविध भजनांचे सुमधुर कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी शीखबांधवांनी गुरुगोविंद सिंग फाउंडेशन येथे सुरू असलेल्या प्रकाश पर्वात उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.

ठळक मुद्देप्रकाश पर्व : भजन, कीर्तनासह विविध धार्मिक उपक्रम

इंदिरानगर : शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक देवजी यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त गुरूगोविंद सिंग फाउंडेशनच्या परिसरात ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होया सह विविध भजनांचे सुमधुर कीर्तनांचा लाभ घेण्यासाठी शीखबांधवांनी गुरुगोविंद सिंग फाउंडेशन येथे सुरू असलेल्या प्रकाश पर्वात उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.शहरातील गुरूनानक देवजी सेवा असोसिएशनद्वारा साजऱ्या करण्यात येत असलेल्या ५५०व्या गुरूनानक जयंतीनिमित्त आयोजित दोन दिवसीय विशेष प्रकाश पर्वानिमित्त शीख कीर्तन जत्थाचे मुख्य कीर्तनकार भाई अमनदीप सिंघजी, भाई बलप्रित सिंघजी आणि भाई सीम्रनजीत सिंघजी यांनी आपल्या विशेष कीर्तनांद्वारे गुरूनानक देवजी यांच्या विचारांबद्दल आपल्या ओघवत्या वाणीद्वारे मार्गदर्शन केले. या सर्व कीर्तनांचा मतितार्थ असा होता की, गुरु नानक देवजी यांची शिकवण म्हणजे घराच्या दरवाज्यावर लावलेला दिवा आहे, जो घराच्या आत ही प्रकाश देतो आणि घराच्या बाहेरही प्रकाश देतो. मानवाचे अंतर्मनही अंतर्बाह्य प्रकाशमान करण्यासाठी त्यांची शिकवण आजही हरप्रकारे आपल्याला मार्गदर्शक आहे. सर्व शक्य मार्गांनी त्यांची सेवा करा. अशाने सौहार्दपूर्ण वातावरणाची निर्मिती होईल जी सर्व समाजाला तसेच देशाला स्वस्थ ठेवेल, असे यावेळी कीर्तनात सांगण्यात आले. या प्रकाश पर्व सोहोळ्यामध्ये आमदार सीमा हिरे, स्कूल आॅफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल सलारिया, नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, वाघ एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी समीर वाघ यांनीदेखील विशेष उपस्थिती लावली. यावेळी गुरुगोबिंद सिंघ फाउंडेशनचे अध्यक्ष गुरदेव सिंघ बिर्दी, सचिव बलबीर सिंघ छाब्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी परिमंदर सिंग तसेच गुरुनानक देवजी सेवा असोसिएशनच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, फाउंडेशनच्या सर्व शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी तसेच शहरातील शीख बांधव, उपस्थित होते.मनुष्याने नेहमी सत्कर्म करावेयावेळी कीर्तनात सांगण्यात आले की, राष्ट्रीय एकात्मतेला पोषक वातावरण निर्माण होईल यासाठी मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत रहा, मनुष्याने मनुष्याशी मनुष्यासारखे वागले पाहिजे. जात, पंथ, धार्मिक मतभेद दूर करण्यासाठीच गुरूनानकजी यांनी लंगरची प्रथा सुरू केली. जिथे कोणताही भेदभाव न होता सर्वजण एका पंगतीत बसून अन्नग्रहण करतात. गुरूची शिकवण मनुष्याला नेहमीच सर्वांगीण विकासाला पोषक ठरते असे मार्गदर्शन या कथा कीर्तनाद्वारे लाभले.

टॅग्स :NashikनाशिकsikhशीखReligious programmeधार्मिक कार्यक्रम