शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्येही दररोज ६,५००’ नागरिकांचे शिवभोजन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:21 IST

नाशिक: राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी या योजनेला जिल्'ात लॉकडाऊनच्या काळातही प्रतिसाद लाभल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे. ऐन लॉकडाऊनमध्ये जिल्'ातील ४४ केंद्रांवर दररोज सुमारे साडेसहा हजार नागरीक शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत असल्याची आकडेवारी पुरवठा विभागाने दिली आहे.

ठळक मुद्देजिल्'ात प्रतिसाद : पुरवठा विभागाने केला दावा

नाशिक: राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी या योजनेला जिल्'ात लॉकडाऊनच्या काळातही प्रतिसाद लाभल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे. ऐन लॉकडाऊनमध्ये जिल्'ातील ४४ केंद्रांवर दररोज सुमारे साडेसहा हजार नागरीक शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत असल्याची आकडेवारी पुरवठा विभागाने दिली आहे.राज्यात शिवभोजन थाळी सुरू झाल्यानंतर सुरूवातील दहा रूपयांत जेवण दिले जात होते. कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेला जिल्'ात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.जिल्'ात गेल्या सप्टेबर महिन्यातील आकडेवारी पाहिली असता १ लाख ८५ हजार ५०६ नागरीकांनी शिवभोजन थाळी योजनेचा लाभ घेतल्याची नोंद झालेली आहे. या आकडेवारीचा विचार केला तर दैनंदिन सरासरी ६ हजार १०० लोक योजनेचा दररोज लाभ घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरासरी ६ हजार ७०० थाळी एव्हढी वाढ असल्याची नोंद झालेली आहे. शिवभोजन थाळी योजना सुरू झाल्यापासून जिल्'ात ३० सप्टेबर या कालावधीत एकुण दहा लाख ७८ हजार ४३७ लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याचे दिसून येते.राज्यात गेल्या दहा महिन्यात सुमारे दोन कोटी नागरीकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतल्याने हा एक विक्रम मानला जात आहे.कमी किंमतीचा परिणाम?लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडण्याचे असलेले निर्बंध आणि त्यानंतर त्यामध्ये काहीप्रमाणात शिथिलता दिल्यानंतरही शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात आले. केवळ पाच रूपये या प्रमाणे थाळी असल्याने लॉकडाऊन काळातही लाभार्थी वाढल्याचा दावा सुत्रांनी केला.गर्दीच्या ठिकाणी केंद्रेनागरीकांनी वर्दळ असलेल्या भागात शिवभोजन थाळीची केंद्रे असल्याने प्रतिसाद अधिक मिळत असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. रेल्वेस्थानक परिसर, बाजार समिती, बसस्थानके, जिल्हाधिकारी कार्यालय,प्रमुख चौक अशा ठिकाणी ही केंद्रे आहेत.

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयzpजिल्हा परिषद