शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बौद्धिक क्षमता असतानाही भारतीय पेटंटचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:12 IST

भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक क्षमता असताना जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचे पेटंट नोंदविण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याची खंत व्यक्त करतानाच आगामी काळात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनांचे पेटंट नोंदविण्यावर भर देण्याची गरज उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रसाद कोकीळ : अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमालेत व्यक्त केली खंत

नाशिक : भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक क्षमता असताना जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचे पेटंट नोंदविण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याची खंत व्यक्त करतानाच आगामी काळात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनांचे पेटंट नोंदविण्यावर भर देण्याची गरज उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केली. पेटंटच्या माध्यमातून भारत देश जगभरातील बौद्धिक संपत्तीवर अधिकार प्राप्त करून राष्ट्रीय संपत्ती निर्माण करू शकेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.मानवधन सामाजिक, शैक्षणिक विकास संस्थेतर्फे सावानाच्या औरगांबाद सभागृहात मंगळवारी (दि.१५) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना त्यांनी ‘देशाच्या विकासात तरुणांचे योगदान’ विषयावर व्याख्यान दिले. व्यासपीठावर कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, नॅबचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, रवि शास्त्री, संदीप भानुसे आदी उपस्थित होते. संपत्ती निर्माण करताना आपण मुळात राष्टÑ संपत्तीचा विचारच करीत नाही. आपल्या भोवतालच्या समाजाचा विकास लक्षातच घेतला जात नाही; मात्र राष्ट्रसंपत्ती व संपन्नता हाच खरा विकास असतो. आजच्या तरुण पिढीने याच मार्गाने राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा कुलकर्णी व पंकज कुं वर यांनी सूत्रसंचालन केले, तर ज्योती कोल्हे यांनी आभार मानले.आपली ऊर्जा राष्ट्रहितासाठी खर्च व्हावीतरुण पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी माणसांच्या आरोग्याचा विचार करणारा, निसर्गाचा समतोल राखणारा, आपली धर्म संस्कृती जपत कलेचा आनंद घेणारा व आपल्या विकासाबरोबरच राष्ट्रहिताचा विचार करणारा माणूस आपण निर्माण करू शकलो तरच देश विकासाच्या दिशेने जाईल. मुळात आपली ऊर्जा ही राष्ट्राच्या हितासाठी व मनुष्याच्या विकासाठी खर्च व्हायला हवी, असे मत कोकीळ यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक