शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

बौद्धिक क्षमता असतानाही भारतीय पेटंटचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:12 IST

भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक क्षमता असताना जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचे पेटंट नोंदविण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याची खंत व्यक्त करतानाच आगामी काळात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनांचे पेटंट नोंदविण्यावर भर देण्याची गरज उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रसाद कोकीळ : अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमालेत व्यक्त केली खंत

नाशिक : भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक क्षमता असताना जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचे पेटंट नोंदविण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याची खंत व्यक्त करतानाच आगामी काळात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनांचे पेटंट नोंदविण्यावर भर देण्याची गरज उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केली. पेटंटच्या माध्यमातून भारत देश जगभरातील बौद्धिक संपत्तीवर अधिकार प्राप्त करून राष्ट्रीय संपत्ती निर्माण करू शकेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.मानवधन सामाजिक, शैक्षणिक विकास संस्थेतर्फे सावानाच्या औरगांबाद सभागृहात मंगळवारी (दि.१५) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना त्यांनी ‘देशाच्या विकासात तरुणांचे योगदान’ विषयावर व्याख्यान दिले. व्यासपीठावर कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, नॅबचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, रवि शास्त्री, संदीप भानुसे आदी उपस्थित होते. संपत्ती निर्माण करताना आपण मुळात राष्टÑ संपत्तीचा विचारच करीत नाही. आपल्या भोवतालच्या समाजाचा विकास लक्षातच घेतला जात नाही; मात्र राष्ट्रसंपत्ती व संपन्नता हाच खरा विकास असतो. आजच्या तरुण पिढीने याच मार्गाने राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा कुलकर्णी व पंकज कुं वर यांनी सूत्रसंचालन केले, तर ज्योती कोल्हे यांनी आभार मानले.आपली ऊर्जा राष्ट्रहितासाठी खर्च व्हावीतरुण पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी माणसांच्या आरोग्याचा विचार करणारा, निसर्गाचा समतोल राखणारा, आपली धर्म संस्कृती जपत कलेचा आनंद घेणारा व आपल्या विकासाबरोबरच राष्ट्रहिताचा विचार करणारा माणूस आपण निर्माण करू शकलो तरच देश विकासाच्या दिशेने जाईल. मुळात आपली ऊर्जा ही राष्ट्राच्या हितासाठी व मनुष्याच्या विकासाठी खर्च व्हायला हवी, असे मत कोकीळ यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक