शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

बौद्धिक क्षमता असतानाही भारतीय पेटंटचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:12 IST

भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक क्षमता असताना जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचे पेटंट नोंदविण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याची खंत व्यक्त करतानाच आगामी काळात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनांचे पेटंट नोंदविण्यावर भर देण्याची गरज उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रसाद कोकीळ : अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमालेत व्यक्त केली खंत

नाशिक : भारतात मोठ्या प्रमाणात बौद्धिक क्षमता असताना जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारताचे पेटंट नोंदविण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या खूपच कमी असल्याची खंत व्यक्त करतानाच आगामी काळात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या संशोधनांचे पेटंट नोंदविण्यावर भर देण्याची गरज उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केली. पेटंटच्या माध्यमातून भारत देश जगभरातील बौद्धिक संपत्तीवर अधिकार प्राप्त करून राष्ट्रीय संपत्ती निर्माण करू शकेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.मानवधन सामाजिक, शैक्षणिक विकास संस्थेतर्फे सावानाच्या औरगांबाद सभागृहात मंगळवारी (दि.१५) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफताना त्यांनी ‘देशाच्या विकासात तरुणांचे योगदान’ विषयावर व्याख्यान दिले. व्यासपीठावर कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, नॅबचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, रवि शास्त्री, संदीप भानुसे आदी उपस्थित होते. संपत्ती निर्माण करताना आपण मुळात राष्टÑ संपत्तीचा विचारच करीत नाही. आपल्या भोवतालच्या समाजाचा विकास लक्षातच घेतला जात नाही; मात्र राष्ट्रसंपत्ती व संपन्नता हाच खरा विकास असतो. आजच्या तरुण पिढीने याच मार्गाने राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा कुलकर्णी व पंकज कुं वर यांनी सूत्रसंचालन केले, तर ज्योती कोल्हे यांनी आभार मानले.आपली ऊर्जा राष्ट्रहितासाठी खर्च व्हावीतरुण पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी माणसांच्या आरोग्याचा विचार करणारा, निसर्गाचा समतोल राखणारा, आपली धर्म संस्कृती जपत कलेचा आनंद घेणारा व आपल्या विकासाबरोबरच राष्ट्रहिताचा विचार करणारा माणूस आपण निर्माण करू शकलो तरच देश विकासाच्या दिशेने जाईल. मुळात आपली ऊर्जा ही राष्ट्राच्या हितासाठी व मनुष्याच्या विकासाठी खर्च व्हायला हवी, असे मत कोकीळ यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक