शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भूजलपातळी वाढली तरीही; उद्यासाठी पाणी जपूनच वापरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 11:34 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने भूजल पातळीतही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. असे ...

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने भूजल पातळीतही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. असे असले तरी उद्या पाणी हवे असले तर आजच पाणी जपून वापरावे लागणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि पावसाची असमानता यामुळे तालुक्यांमधील पाण्याचे संदर्भ बदलले आहेत.

गेल्या दोन वर्षांतील पर्जन्यमानाची कामगिरी पाहिली तर दुष्काळी तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. तर ज्या तालुक्यांमध्ये नेहमी चांगला पाऊस झाला अशा ठिकाणी सरासरी पाऊस झाला. आदिवासीबहुल भागात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी खडकाळ भागात पाणी वाहून जात असतेच. शिवाय जमिनीअंतर्गत रचनेमुळे पाणी साठून राहत नसल्याने अशा तालुक्यांना दुष्काळाचाही सामना करावा लागतो. या सर्वांचा अभ्यास दरवर्षी भूजल विभागाकडून केला जातो. त्यांच्या अभ्यासात्मक निरीक्षणातून जिल्ह्याच्या सप्टेंबर २०२१ च्या भूजल आकडेवारीनुसार तालुक्यातील पाण्याची पातळी लक्षात येते.

१११ निरीक्षण विहिरींची तपासली पातळी

भूजल विभागाच्या सप्टेंबर २०२१ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील जवळपास १११ विहिरींच्या पाणी पातळीचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशा चार टप्प्यांमध्ये निरीक्षण घेतले जाते. मालेगाव, नांदगाव आणि निफाड तालुक्यांमध्ये निरीक्षण केलेल्या विहिरींची संख्या अधिक आहे.

कोणत्या तालुक्याची भूजलपातळी किती? (आकडे मीटरमध्ये)

तालुका २०१७ २०१८ २०१९ २०२० २०२१

बागलाण : ८.८० ९.०९ ४.७३ ४.७३ ४.९६

चांदवड : ५.६७

देवळा ; ५.४६

दिंडोरी : २.५८

इगतपुरी : १.२८

कळवण : ४.७५

मालेगाव : ५.६९

नांदगाव : ५.४२

नाशिक : ३.९४

निफाड : २.४१

पेठ : १.५३

सिन्नर: ३.२०

सुरगाणा: १.५०

त्र्यंबकेश्वर: १.२९

येवला: ३.९३

उद्यासाठी पाणी शिल्लक ठेवा

जिल्ह्यातील पावसाची पातळी समाधानकारक दिसत असली तरी पावसाचा लहरीपणा लक्षात घेता असलेला पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे. सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. परंतु तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमानात तफावत असल्याने तालुक्यांना पाणी नियोजनावर भर द्यावा लागणार आहे.

येवल्यात पातळी अधिक

येवला तालुक्यात पाण्याची पातळी अधिक असल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी येवला तालुक्यातील पातळी २.१६ मीटरने वाढली आहे. मालेगाव, नांदगावमध्ये यंदा पाऊस बरसला असल्याने पातळीतही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. इतर तालुक्यातील पातळी मात्र सामान्य आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक