शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

भूजलपातळी वाढली तरीही; उद्यासाठी पाणी जपूनच वापरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 11:34 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने भूजल पातळीतही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. असे ...

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने भूजल पातळीतही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. असे असले तरी उद्या पाणी हवे असले तर आजच पाणी जपून वापरावे लागणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि पावसाची असमानता यामुळे तालुक्यांमधील पाण्याचे संदर्भ बदलले आहेत.

गेल्या दोन वर्षांतील पर्जन्यमानाची कामगिरी पाहिली तर दुष्काळी तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. तर ज्या तालुक्यांमध्ये नेहमी चांगला पाऊस झाला अशा ठिकाणी सरासरी पाऊस झाला. आदिवासीबहुल भागात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी खडकाळ भागात पाणी वाहून जात असतेच. शिवाय जमिनीअंतर्गत रचनेमुळे पाणी साठून राहत नसल्याने अशा तालुक्यांना दुष्काळाचाही सामना करावा लागतो. या सर्वांचा अभ्यास दरवर्षी भूजल विभागाकडून केला जातो. त्यांच्या अभ्यासात्मक निरीक्षणातून जिल्ह्याच्या सप्टेंबर २०२१ च्या भूजल आकडेवारीनुसार तालुक्यातील पाण्याची पातळी लक्षात येते.

१११ निरीक्षण विहिरींची तपासली पातळी

भूजल विभागाच्या सप्टेंबर २०२१ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील जवळपास १११ विहिरींच्या पाणी पातळीचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशा चार टप्प्यांमध्ये निरीक्षण घेतले जाते. मालेगाव, नांदगाव आणि निफाड तालुक्यांमध्ये निरीक्षण केलेल्या विहिरींची संख्या अधिक आहे.

कोणत्या तालुक्याची भूजलपातळी किती? (आकडे मीटरमध्ये)

तालुका २०१७ २०१८ २०१९ २०२० २०२१

बागलाण : ८.८० ९.०९ ४.७३ ४.७३ ४.९६

चांदवड : ५.६७

देवळा ; ५.४६

दिंडोरी : २.५८

इगतपुरी : १.२८

कळवण : ४.७५

मालेगाव : ५.६९

नांदगाव : ५.४२

नाशिक : ३.९४

निफाड : २.४१

पेठ : १.५३

सिन्नर: ३.२०

सुरगाणा: १.५०

त्र्यंबकेश्वर: १.२९

येवला: ३.९३

उद्यासाठी पाणी शिल्लक ठेवा

जिल्ह्यातील पावसाची पातळी समाधानकारक दिसत असली तरी पावसाचा लहरीपणा लक्षात घेता असलेला पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे. सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. परंतु तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमानात तफावत असल्याने तालुक्यांना पाणी नियोजनावर भर द्यावा लागणार आहे.

येवल्यात पातळी अधिक

येवला तालुक्यात पाण्याची पातळी अधिक असल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी येवला तालुक्यातील पातळी २.१६ मीटरने वाढली आहे. मालेगाव, नांदगावमध्ये यंदा पाऊस बरसला असल्याने पातळीतही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. इतर तालुक्यातील पातळी मात्र सामान्य आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक