शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

भूजलपातळी वाढली तरीही; उद्यासाठी पाणी जपूनच वापरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 11:34 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने भूजल पातळीतही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. असे ...

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने भूजल पातळीतही काही प्रमाणात वाढ झालेली आहे. असे असले तरी उद्या पाणी हवे असले तर आजच पाणी जपून वापरावे लागणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि पावसाची असमानता यामुळे तालुक्यांमधील पाण्याचे संदर्भ बदलले आहेत.

गेल्या दोन वर्षांतील पर्जन्यमानाची कामगिरी पाहिली तर दुष्काळी तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. तर ज्या तालुक्यांमध्ये नेहमी चांगला पाऊस झाला अशा ठिकाणी सरासरी पाऊस झाला. आदिवासीबहुल भागात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी खडकाळ भागात पाणी वाहून जात असतेच. शिवाय जमिनीअंतर्गत रचनेमुळे पाणी साठून राहत नसल्याने अशा तालुक्यांना दुष्काळाचाही सामना करावा लागतो. या सर्वांचा अभ्यास दरवर्षी भूजल विभागाकडून केला जातो. त्यांच्या अभ्यासात्मक निरीक्षणातून जिल्ह्याच्या सप्टेंबर २०२१ च्या भूजल आकडेवारीनुसार तालुक्यातील पाण्याची पातळी लक्षात येते.

१११ निरीक्षण विहिरींची तपासली पातळी

भूजल विभागाच्या सप्टेंबर २०२१ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील जवळपास १११ विहिरींच्या पाणी पातळीचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशा चार टप्प्यांमध्ये निरीक्षण घेतले जाते. मालेगाव, नांदगाव आणि निफाड तालुक्यांमध्ये निरीक्षण केलेल्या विहिरींची संख्या अधिक आहे.

कोणत्या तालुक्याची भूजलपातळी किती? (आकडे मीटरमध्ये)

तालुका २०१७ २०१८ २०१९ २०२० २०२१

बागलाण : ८.८० ९.०९ ४.७३ ४.७३ ४.९६

चांदवड : ५.६७

देवळा ; ५.४६

दिंडोरी : २.५८

इगतपुरी : १.२८

कळवण : ४.७५

मालेगाव : ५.६९

नांदगाव : ५.४२

नाशिक : ३.९४

निफाड : २.४१

पेठ : १.५३

सिन्नर: ३.२०

सुरगाणा: १.५०

त्र्यंबकेश्वर: १.२९

येवला: ३.९३

उद्यासाठी पाणी शिल्लक ठेवा

जिल्ह्यातील पावसाची पातळी समाधानकारक दिसत असली तरी पावसाचा लहरीपणा लक्षात घेता असलेला पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे. सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. परंतु तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमानात तफावत असल्याने तालुक्यांना पाणी नियोजनावर भर द्यावा लागणार आहे.

येवल्यात पातळी अधिक

येवला तालुक्यात पाण्याची पातळी अधिक असल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी येवला तालुक्यातील पातळी २.१६ मीटरने वाढली आहे. मालेगाव, नांदगावमध्ये यंदा पाऊस बरसला असल्याने पातळीतही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. इतर तालुक्यातील पातळी मात्र सामान्य आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक