शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादनाचा गावनिहाय अंदाज बांधा - भारती पवार

By अझहर शेख | Updated: March 9, 2023 18:00 IST

नाशिक : कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून अवकाळी पावसाचाही फटका आता कांद्याला बसला ...

नाशिक : कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून अवकाळी पावसाचाही फटका आता कांद्याला बसला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. याबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गुरुवारी (दि.९) जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाला विविध सुचना देत कांदा पीकाच्या क्षेत्राचे गावनिहाय अहवाल तयार करण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा दराबाबत गुरुवरी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, दिल्ली नाफेडचे उप व्यवस्थापक निखिल पाडदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यात सध्या कांदा पिकाला योग्य भाव मिळण्यासाठी, जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्र व त्याप्रमाणात होणारे कांद्याचे उत्पादनाचा अंदाज येणे आवश्यक आहे. याकरिता कृषी विभागाने जिल्ह्यातील कांदा पिकाच्या एकूण क्षेत्राची माहिती कृषी सहायकांच्या मदतीने गोळा करावी, अशी सूचना पवार यांनी यावेळी केली. ‘नाफेड’द्वारे केल्या जाणाऱ्या कांदा खरेदी केंद्रांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत व्यापक पद्धतीने पोहचविण्यावर भर देणे गरजेचे आहे, मात्र तसे होताना दिसत नाही, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी कांदा उत्पादक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधीनी कांदा दर, खरेदी व निर्यात धोरणाबाबत त्यांच्या अपेक्षा, मागण्या मांडल्या. तसेच जिल्ह्यातील कांदा लागवड क्षेत्राबाबत सोनवणे यांनी माहिती सादर केली.

तफावत खपवून घेतली जाणार नाही!

कृषी विभाग व बाजार समितींनी तयार केलेल्या अहवालात कांदा उत्पादनाबाबत कुठलीही तफावत नसावी. जिल्ह्यात कांदा उत्पादन क्षमता चांगली असल्याने निर्यात खुली आहे. कांदा निर्यात करतांना पोर्टवरील प्लगइन पॉईंट वाढविणे, कांदाचाळी व प्रक्रीया उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे भारती पवार यांनी सांगितले. नाफेडकरून लाल कांद्याची खरेदी सुरू आहे.

कांदा खरेदीबाबत राज्य सरकार सकारात्मक

नाफेड मार्फत करण्यात येणारी कांदा खरेदीचा दर टप्प्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ कांदा खरेदीसाठी देखील नियोजन करणे आवश्यक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च व त्यानुसार होणारा नफा याअनुषंगाने कांद्याला भाव मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. कांदा खरेदीबाबत राज्य सरकारदेखील सकारात्मक असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :onionकांदाNashikनाशिक