शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक प्रदूषणमुक्त करण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:34 IST

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी गटारी तुंबल्या, गोदावरीला पूर आला, नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले, गावात पाणी शिरले किंवा डोंगर बोडके झाले तर होणाऱ्या नुकसानीला केवळ नगर परिषदेला जबाबदार धरण्यापेक्षा पर्यावरणप्रेमी व पालिका प्रशासनाने आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत त्र्यंबक शहराला प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संकल्प केला आहे.

त्र्यंबकेश्वर : (वसंत तिवडे ) दरवर्षी गटारी तुंबल्या, गोदावरीला पूर आला, नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले, गावात पाणी शिरले किंवा डोंगर बोडके झाले तर होणाऱ्या नुकसानीला केवळ नगर परिषदेला जबाबदार धरण्यापेक्षा पर्यावरणप्रेमी व पालिका प्रशासनाने आपापल्या स्तरावर प्रयत्न करीत त्र्यंबक शहराला प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संकल्प केला आहे.गोदावरी उगमाच्या एक ते दोन किमी परिसर वृक्षराजीने नटविणे, पाण्याचे स्रोत शोधून ते मोकळे करणे आदी कामांसाठी गावातीलच काही सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यात आयपीएल ग्रुपचे ललित लोहगावकर व त्यांचे सहकारी अव्याहतपणे प्रयत्न करीत आहेत. या ग्रुपच्या वतीने दररोज वृक्ष लागवड करणे, ती जगवणे, वाढ झालेल्या झाडांना ओटे व पार बांधणे, पाय-यांच्या भिंतींची डागडुजी करणे तसेच इतस्तत: पडलेले दगड -गोटे नीट ठेवत परिसराच्या स्वच्छतेवर भर देत आहेत. डॉ.पंकज बोरसे हेदेखील हरित ब्रह्मगिरीसाठी त्यांच्या ग्रुपतर्फे एक हजार रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढे आले आहेत. दरम्यान, दोन तीन वर्षांपूर्वी त्र्यंबकच्या मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे यांनी डोंगरावर पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते डोंगरातच जिरावे यासाठी १ बाय १ फुटाचे हजारो खड्डे पालिका कर्मचाऱ्यांकडून खोदून घेतले होते. हा प्रयोग यशस्वी होऊन त्यावर्षी गावात पूर आला नाही, तर विद्यमान मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनीही शहरात फक्त एक हजार झाडे लावायची व ती झाडे एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय या बँकांना दत्तक देऊन वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प सोडला आहे.-------------------------पुण्यश्लोक राजामाता अहल्यादेवी होळकर, पेशवेकाळातील राजे व महाराजे आदींनी आपापल्या राजवटीत भाविक यात्रेकरुंना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलेले जलाशय कालपरत्वे बुजून गेले होते. ते जलाशय शोधण्याचे काम आयपीएल ग्रुपने केले. असे जलाशय, विहिरी शोधून त्या स्वच्छ केल्या. पडलेला भाग स्वखर्चाने दुरुस्त केला. तसेच आयुर्वेदिक औषधांच्या दुर्मीळ झाडांची लागवड सुरू केली आहे. दोन्ही पहाडांवर जंगल व्हावे हाच ध्यास आम्ही काम करीत आहोत.- ललित लोहगावकर, आयपीएल ग्रुप, त्र्यंबकेश्वर--------------------------------------पावसाच्या एक महिना अगोदरच गोदा सफाई मोहीम कंत्राटी कामगारांकडून करून घेतली. कुशावर्त तीर्थ ते थेट तुंगार पेट्रोलपंपापर्यंत नदीपात्र जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही बाजूंनी सारखे करून स्वच्छता केली. अहिल्या नदी थेट संगम घाटापर्यंत स्वच्छ केली. गावातील निलगंगा म्हातार ओहोळ वगैरे ओढे, नाले स्वच्छ केले. या नाले, ओढे व नद्यांमध्ये वरपर्यंत घाण आल्याने गावात पूरपरिस्थिती निर्माण होत असे. आता सर्वच स्वच्छ केल्याने प्रदूषणाचा धोका नाही व पूर येण्याचा धोकाही उरला नाही. - डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्वर नगर परिषद

टॅग्स :Nashikनाशिक