शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सिन्नर येथे प्रस्तावित समृद्धी महामार्गाची पर्यावरण सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:03 IST

शेतकर्‍यानी मांडलेल्या आक्षेपाचा अहवाल तयार करून तो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. प्रशासन शेतकर्‍याच्या पाठीशी असून, सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले.

सिन्नर : शेतकर्‍यानी मांडलेल्या आक्षेपाचा अहवाल तयार करून तो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. प्रशासन शेतकर्‍याच्या पाठीशी असून, सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले. प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची पर्यावरण सुनावणी येथील भगवती लॉन्स येथे पार पडली. व्यासपीठावर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे आर. व्ही. पाटील, रस्ते विकास महामंडळाचे पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोके, जिल्हा भूमिअभिलेख विभागाचे अधीक्षक अनिल माने, भूसंपादन अधिकारी विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी आदी उपस्थित होते.  यापूर्वी राबविण्यात आलेल्या प्रकल्पांतील अनुभव पाहता पर्यावरण सुनावणी केवळ प्रशासकीय प्रक्रिया असल्याचा आक्षेप शेतकर्‍यानी घेतला. विविध प्रकल्पांत लाखो झाडांची कत्तल यापूर्वीही झाली आहे.मात्र एकाच खड्ड्यात अनेकदा झाडे लावली. यापूर्वी कधीही आश्वासने पाळली गेली नाही. सध्याच्या सुनावणीनंतर ती पाळली जाणार नसल्याचे भाकीत शेतकºयांनी केले. त्यामुळे प्रशासनाइतका वेळ वाया घालवू नये, असा सल्लाही शेतकर्‍यानी दिला. काम सुरू असताना पाण्याचे प्रदूषण काही काळापुरते होऊ शकेल. आजूबाजूला धूळ उडणार असली तरी ती घालविण्यासाठी जागोजागी पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाचे पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोके यांनी सांगितले.  ध्वनी प्रदूषण  थांबविण्या-साठी मुंबई आयआयटीने बनविलेले नॉइस बॅरिअर जिल्ह्यात ६ किलोमीटर बसविण्यात येणार आहेत. जेवढी वनजमीन जाणार आहे तेवढीच उपलब्ध करून तितक्याच झाडांची लागवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिन्नर तालुक्यातील समृद्धबाधित गावांच्या पर्यावरण जनसुनावणीसाठी केवळ सुमारे १०० शेतकºयांची उपस्थिती लाभली.द्राक्ष, टमाटे नष्ट होण्याची भीतीप्रकल्प झाल्यावर झाडे लावली जात नाहीत, महामार्गाच्या भरावासाठी टेकड्या नष्ट केल्या जातील याची हानी कशी भरून काढणार, असा आक्षेप विष्णू हारक या शेतकर्‍याने घेतला. सिन्नर-घोटी महामार्गाच्या प्रदूषणाने भात पीक नष्ट झाले असून, आता समृद्धीमुळे द्राक्ष, टमाटे पिके नष्ट होतील याची भीती व्यक्त केली. सोमनाथ वाघ यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पाण्याचे नष्ट होणारे स्रोत परत कसे मिळविले जाणार, असा सवाल उपस्थित केला.

टॅग्स :Farmerशेतकरीenvironmentवातावरण