शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सिन्नर येथे प्रस्तावित समृद्धी महामार्गाची पर्यावरण सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:03 IST

शेतकर्‍यानी मांडलेल्या आक्षेपाचा अहवाल तयार करून तो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. प्रशासन शेतकर्‍याच्या पाठीशी असून, सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले.

सिन्नर : शेतकर्‍यानी मांडलेल्या आक्षेपाचा अहवाल तयार करून तो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. प्रशासन शेतकर्‍याच्या पाठीशी असून, सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले. प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची पर्यावरण सुनावणी येथील भगवती लॉन्स येथे पार पडली. व्यासपीठावर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे आर. व्ही. पाटील, रस्ते विकास महामंडळाचे पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोके, जिल्हा भूमिअभिलेख विभागाचे अधीक्षक अनिल माने, भूसंपादन अधिकारी विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी आदी उपस्थित होते.  यापूर्वी राबविण्यात आलेल्या प्रकल्पांतील अनुभव पाहता पर्यावरण सुनावणी केवळ प्रशासकीय प्रक्रिया असल्याचा आक्षेप शेतकर्‍यानी घेतला. विविध प्रकल्पांत लाखो झाडांची कत्तल यापूर्वीही झाली आहे.मात्र एकाच खड्ड्यात अनेकदा झाडे लावली. यापूर्वी कधीही आश्वासने पाळली गेली नाही. सध्याच्या सुनावणीनंतर ती पाळली जाणार नसल्याचे भाकीत शेतकºयांनी केले. त्यामुळे प्रशासनाइतका वेळ वाया घालवू नये, असा सल्लाही शेतकर्‍यानी दिला. काम सुरू असताना पाण्याचे प्रदूषण काही काळापुरते होऊ शकेल. आजूबाजूला धूळ उडणार असली तरी ती घालविण्यासाठी जागोजागी पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे रस्ते विकास महामंडळाचे पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोके यांनी सांगितले.  ध्वनी प्रदूषण  थांबविण्या-साठी मुंबई आयआयटीने बनविलेले नॉइस बॅरिअर जिल्ह्यात ६ किलोमीटर बसविण्यात येणार आहेत. जेवढी वनजमीन जाणार आहे तेवढीच उपलब्ध करून तितक्याच झाडांची लागवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिन्नर तालुक्यातील समृद्धबाधित गावांच्या पर्यावरण जनसुनावणीसाठी केवळ सुमारे १०० शेतकºयांची उपस्थिती लाभली.द्राक्ष, टमाटे नष्ट होण्याची भीतीप्रकल्प झाल्यावर झाडे लावली जात नाहीत, महामार्गाच्या भरावासाठी टेकड्या नष्ट केल्या जातील याची हानी कशी भरून काढणार, असा आक्षेप विष्णू हारक या शेतकर्‍याने घेतला. सिन्नर-घोटी महामार्गाच्या प्रदूषणाने भात पीक नष्ट झाले असून, आता समृद्धीमुळे द्राक्ष, टमाटे पिके नष्ट होतील याची भीती व्यक्त केली. सोमनाथ वाघ यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पाण्याचे नष्ट होणारे स्रोत परत कसे मिळविले जाणार, असा सवाल उपस्थित केला.

टॅग्स :Farmerशेतकरीenvironmentवातावरण