शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
2
अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई
3
भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; "आम्ही घाबरत नाही"
4
Madhav Gadgil: कोकणातील पर्यावरणीय संघर्षाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हरपला!
5
१० मिनिटांच्या डिलिव्हरीवर गिग वर्कर्सचा आक्षेप; क्विक कॉमर्स कंपन्यांचे धाबे दणाणले, काय आहे मागणी?
6
रोहित शर्माची पत्नीने रितिका सजदेहने मुंबईतील पॉश एरियात घेतला आलिशान फ्लॅट, किंमत किती?
7
फक्त फोन जवळ नेला अन् पैसे उडाले! 'टॅप-टू-पे' वापरताय तर ही बातमी वाचाच; नाहीतर होईल मोठं नुकसान
8
Vijay Hazare Trophy : हार्दिक पांड्याची वादळी खेळी! ‘बडे मियाँ’च्या कॅप्टन्सीत ‘छोटे मियाँ’चा धमाका!
9
Akola Municipal Election 2026: कोणाला पुन्हा संधी? माजी महापौर, तीन माजी महापौरांचे कुटुंबीय आजमावणार नशीब!
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले, एका झटक्यात चांदी ₹१२,२२५ नं स्वस्त; Gold च्या किंमतीत किती घसरण, पाहा
11
वडिलांना वाचवण्यासाठी लेकीने बिबट्याशी दोन हात केले, उसाच्या तुकड्याने फोडून पळवून लावले
12
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरातील पेपर केला सोपा; २० जागांवर युतीचे नगरसेवक बिनविरोध
13
'ठरलं होतं, आज याला मारायचंच'; मध्यरात्री प्रियकराला घरात घेतलं अन् झोपेतच पतीचा काटा काढला!
14
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पाच दिवसांचा 'ब्लॉक'; कुठे, किती तास वाहतूक राहणार बंद? 
15
अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबात कोण-कोण? आता कोणाच्या खांद्यावर असेल ३५,००० कोटींच्या वेदांता समूहाची जबाबदारी
16
Ritual: एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने ती व्यक्ती खरोखरंच मरते का? जाणून घ्या गंभीर परिणाम 
17
निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा?
18
Video: "हे चुकीचं आहे रे..."; रोहित शर्मा चिडला, लहान मुलीच्या आईवडिलांना चांगलंच सुनावलं!
19
फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 
20
BJP MIM Alliance: सत्तेसाठी भाजपाने फक्त एआयएमआयएम नाही, तर दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही सेना, प्रहारची बांधली होती मोट
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन वाचविण्यासाठी उद्योजक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 19:10 IST

सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी एकत्रित येत जनावरांसाठी मोफत पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ५० उद्योजकांनी एकत्र येऊन सदर उपक्रम हाती घेतला असून, चार गावांमध्ये दोन महिने पशुधनासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसामाजिक जाणीव : ५० उद्योजक चार गावांना देणार सलग दोन महिने टॅँकरने पाणी

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी एकत्रित येत जनावरांसाठी मोफत पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ५० उद्योजकांनी एकत्र येऊन सदर उपक्रम हाती घेतला असून, चार गावांमध्ये दोन महिने पशुधनासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दुष्काळात सामाजिक जाणीव लक्षात घेऊन उद्योजकांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, ५०हून अधिक टॅँकरद्वारे तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा केला जात आहे. मात्र पशुधनाचे हाल होत आहेत. अशा परिस्थिती उद्योजकांनी पुढे येऊन पशुधनाची तहान भागविण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीला हात पुढे केला आहे. तालुक्यातील देवपूर, पंचाळे, मिठसागरे, खंबाळे या गावांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्येक गावाला रोज एक २० हजार लिटरचा टँकर देण्यात येणार आहे. गुरुवारपासून (दि. २५) देवपूर येथून उपक्रमाला सुरुवात होणार आहे.तथापि, सरकारकडून जनावरांसाठी पाण्याची सुविधा होऊ शकेल असे वाटत नाही.समितीद्वारे जनावरांना पाणी देण्याचे नियोजन आखण्यात आले असून, देवपूर येथे २५ एप्रिलपासून उपक्रमाला सुरुवात होणार आहे. देवपूरसह चार गावांची निवड, प्रत्येक गावाला उद्यापासून रोज एक २० हजार लिटरचा टँकर उद्योजकांची एकजूट निमाचे संचालक राजेश गडाख, मारुती कुलकर्णी, बबन वाजे, किरण वाजे, राहुल नवले, कृष्णा नाईकवाडी, अजय बाहेती, अतुल अग्रवाल यांनी जनावरांसाठी टँकरने मोफत पाणी देण्याची संकल्पना मांडली. यास वसाहतीतील ५०हून अधिक उद्योजकांनी मदत देण्याचे जाहीर केले व निधी जमा केला.२० हजार लिटरच्या टँकरसाठी २ हजार ८०० खर्च येणार असल्याने उद्योजकांकडून २५० टँकरचा खर्च जमा झाला.चौकट-२० हजार लिटर क्षमतेचा टँकर रोज देवपूर, पंचाळे, मिठसागरे, खंबाळे येथील वाड्या-वस्त्यांवर फिरणार आहे. हा भाग बारमाही टंचाईग्रस्त असल्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात पशूपालन केले जाते. दुग्ध व्यवसाय येथील शेतकऱ्यांचे प्रमुख उपजिविकेचे साधन बनला आहे.फोटो क्र.- टॅँकरचा संग्रहीत फोटो वापरावा, ही विनंती.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी