शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

उकाड्यातही उत्साह : चटके सहन करत हजेरी; शनिवारी शेवटचा विवाह मोजक्या तिथींमुळे तळपत्या उन्हात लग्नांचे बार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:19 IST

सिन्नर : गुरुच्या अस्तामुळे आधी महिना-सव्वा महिना तसेच संपूर्ण मार्च व एप्रिलचे दोन आठवडे असा खंड गेल्यानंतर २० एप्रिलपासून लग्नसराईची धूम सुरू झाली.

ठळक मुद्देलग्नसराईचा धूमधडाका सुरू झालानाईलाजाने नातेवाइकांच्या लग्नसोहळ्याला इष्टमंडळींसह हजेरी लावणे गरजेचे

सिन्नर : गुरुच्या अस्तामुळे आधी महिना-सव्वा महिना तसेच संपूर्ण मार्च व एप्रिलचे दोन आठवडे असा खंड गेल्यानंतर २० एप्रिलपासून लग्नसराईची धूम सुरू झाली. ती १२ मे पर्यंत असल्याने लग्नसराईचा धूमधडाका सुरू झाला. एकाच दिवशी अनेक लग्न समारंभ असल्याने वºहाडी मंडळींची लग्नांना हजेरी लावण्यासाठी तारांबळ दिसून येत आहे. तपमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहोचला असतानाही नाईलाजाने नातेवाइकांच्या लग्नसोहळ्याला इष्टमंडळींसह हजेरी लावणे गरजेचे असल्याने उन्हाचे चटके सहन करत वºहाडी मंडळी हजेरी लावताना दिसत आहे. लग्नासाठी केवळ १२ मेपर्यंत मुहूर्त असल्याचे ब्रह्मवृदांकडून सांगण्यात आले आहे; मात्र त्यानंतर पुन्हा जून, जुलैमध्ये लग्नतिथी आहेत. पावसाळ्यात शेत मशागतीच्या कामांमुळे तसेच खरीप हंगामामुळे शेतीकडे लक्ष देणे शेतकरी पसंत करतात. हंगामाच्या काळात लग्न करण्याऐवजी त्याआधीच बार उडविण्यावर ग्रामीण भागातील कुटुंबाचा भर असतो. २० एप्रिल ते १५ मे हा काळ लग्नतिथी उरकून घेण्यात शेतकरी व बहुतेक समाज धन्यता मानतात. मंगल कार्यालय, केटरिंग, आचारी, घोडेवाले, लग्न साहित्यांच्या मागणीत वाढ झाल्याने यांचे दाम वाढल्याचे चित्र दिसत आहे. १५ मे नंतर अधिकमासाला प्रारंभ होणार असल्याने दोन दिवसात लग्नतिथी उरकावी लागत आहे. तपमानाचा पारा वाढला तरी लग्नसोहळा पार पाडण्यासाठी धांदल उडत आहे.