शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

शासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा ‘उधळण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2015 23:52 IST

ऊर्जा संवर्धनाला हरताळ : एक-एक कण ऊर्जा वाचविण्याचा पडला विसर; कोठे पंख्यांची घरघर, तर कोठे दिव्यांचा लखलखाट

अझहर शेख, नाशिक‘एक-एक कण ऊर्जा वाचवूया, भविष्याची ऊर्जा आजच साठवूया...’ असा प्रबोधनात्मक नारा राज्य शासनासह महाऊर्जा विभागाकडून बुलंद केला जात आहे; मात्र शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये याउलट चित्र बघावयास मिळाले. कार्यालयांमधील आवारात एकापेक्षा अधिक ट्यूबलाईटचा लखलखाट, तर ऐन हिवाळ्यात जेवणाच्या वेळेतही पंख्यांची घरघर सर्रासपणे सुरूच असल्याचे चित्र पहावयास मिळाले. काही कार्यालयांमधील अधिकाऱ्यांची रिकामी दालनेही दिव्यांच्या लखलखाटाने उजळलेली होती. एकूणच राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनालाच शासकीय कार्यालयांकडून विजेची उधळण करून हरताळ फासला गेला.दरवर्षी १४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो, तर वीस डिसेंबरपर्यंत ‘ऊर्जा बचत व जनजागृती सप्ताह’ पाळला जातो. यानिमित्ताने आज (दि.१४) महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद भवन, आदिवासी विकास भवन, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वच कार्यालयांना भेटी दिल्या असता या सर्वच कार्यालयांच्या गावी ऊर्जा संवर्धन दिन नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. महापालिकेच्या जनसंपर्क कक्षामध्ये कोणीही नसतानादेखील सर्वच दिवे सुरू असल्यामुळे कक्ष ‘प्रकाश’मान असल्याचे सकाळी आढळून आले. तसेच कामगार सेनेच्या कक्षाबरोबरच विरोधी पक्षनेत्यांच्या दालनातही विजेची उधळपट्टी पहावयास मिळाली. तसेच अभियंत्यांच्या कार्यालयांमधील मोकळ्या जागेत भिंतींच्या खिडकीतून सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात येत असतानाही सर्व ‘दिवे’ लावलेले होते हे विशेष! जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील काही कक्षांमध्ये अनावश्यकरीत्या विजेची उधळण होत असल्याचे बघावयास मिळाले. येथील वनहक्क कायदा कक्षामध्ये असलेले सर्वच दिवे प्रकाशमान होते. वास्तविक बघता एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवे लावण्याची गरज किमान दिवसातरी पडायला नको; मात्र येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून आले. तसेच जिल्हा आपत्ती विभागप्रमुखांच्या कार्यालयातही कोणी नसतानाही त्यांच्या खुर्चीवरील दिवा प्रकाशमान असल्यामुळे कक्ष उजळला होता. जिल्हा परिषदेमध्येही विविध पदाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरील जागेत असलेले सर्वच दिवे लागलेले होते. विशेष म्हणजे यावेळी एकही पदाधिकारी दालनामध्ये नव्हता व अभ्यागतही त्यांच्याकडे फिरकलेले नव्हते तरीदेखील विजेची उधळण सुरूच होती. आदिवासी विकास भवनामध्ये प्रवेश करताच स्वागत कक्षावरील दिवे चालू होते. पहिल्या मजल्यावरील प्रशासन विभागाच्या सर्व खिडक्यांमधून आतमध्ये हवा-प्रकाश खेळता असतानाही दिव्यांचा लखलखाट होता.

मागणी अधिक निर्मिती कमी    ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत निर्मिती अपुरी पडत आहे. २00१ साली भारताच्या प्रतिव्यक्तीमागे ३७४ किलो वॅट ऊर्जेचा वापर दरवर्षी होत होता; मात्र सध्या ६0८ किलो वॅट ऊर्जा वापरली जात आहे. २0१२ पर्यंत जाणकारांच्या मते १000 किलो वॅट ऊर्जेच्या वापराची आवश्यकता असल्याचा अंदाज होता. त्यामुळे ऊर्जेची निर्मिती वाढविण्यावर भर दिला जात आहे. एकूणच दिवसेंदिवस ऊर्जेची मागणी वाढत असून, त्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहे. देशाच्या विकासासाठी आवश्यक असणार्‍या सर्वच उत्पादन क्षेत्रांसाठी ऊर्जेची गरज असून, त्यासाठी ऊर्जेची असणारी नैसर्गिक संसाधने र्मयादित स्वरूपाची आहे. त्यामुळे सौर ऊ र्जेच्या वापराचा विचार करणे गरजेचे असून, विजेची बचत काळाची गरज आहे, हे समजून अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.

जनजागृतीचा विसर, विजेचा अपव्यय

प्रसारमाध्यमांद्वारे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाच्या औचित्यावर राज्य व केंद्र शासनामार्फत जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जात असताना शहरातील शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये मात्र विजेचा अपव्ययच बघावयास मिळाला. ऊर्जा संवर्धन दिन व सप्ताहच्या औचित्यावर एकाही कार्यालयामध्ये जनजागृतीपर फलक लावल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे ‘ऊ र्जा संवर्धन दिन’ शासकीय कार्यालयांच्या उंबरठय़ावरच पोहचलेला नसल्याचे प्रकर्षाने जाणवले.