शहरं
Join us  
Trending Stories
1
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
2
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
3
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
4
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
5
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
6
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
7
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
8
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
9
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
10
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
11
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
12
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
13
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
14
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
15
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
16
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
17
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
18
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
19
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
20
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?

शासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा ‘उधळण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2015 23:52 IST

ऊर्जा संवर्धनाला हरताळ : एक-एक कण ऊर्जा वाचविण्याचा पडला विसर; कोठे पंख्यांची घरघर, तर कोठे दिव्यांचा लखलखाट

अझहर शेख, नाशिक‘एक-एक कण ऊर्जा वाचवूया, भविष्याची ऊर्जा आजच साठवूया...’ असा प्रबोधनात्मक नारा राज्य शासनासह महाऊर्जा विभागाकडून बुलंद केला जात आहे; मात्र शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये याउलट चित्र बघावयास मिळाले. कार्यालयांमधील आवारात एकापेक्षा अधिक ट्यूबलाईटचा लखलखाट, तर ऐन हिवाळ्यात जेवणाच्या वेळेतही पंख्यांची घरघर सर्रासपणे सुरूच असल्याचे चित्र पहावयास मिळाले. काही कार्यालयांमधील अधिकाऱ्यांची रिकामी दालनेही दिव्यांच्या लखलखाटाने उजळलेली होती. एकूणच राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनालाच शासकीय कार्यालयांकडून विजेची उधळण करून हरताळ फासला गेला.दरवर्षी १४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो, तर वीस डिसेंबरपर्यंत ‘ऊर्जा बचत व जनजागृती सप्ताह’ पाळला जातो. यानिमित्ताने आज (दि.१४) महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद भवन, आदिवासी विकास भवन, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वच कार्यालयांना भेटी दिल्या असता या सर्वच कार्यालयांच्या गावी ऊर्जा संवर्धन दिन नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. महापालिकेच्या जनसंपर्क कक्षामध्ये कोणीही नसतानादेखील सर्वच दिवे सुरू असल्यामुळे कक्ष ‘प्रकाश’मान असल्याचे सकाळी आढळून आले. तसेच कामगार सेनेच्या कक्षाबरोबरच विरोधी पक्षनेत्यांच्या दालनातही विजेची उधळपट्टी पहावयास मिळाली. तसेच अभियंत्यांच्या कार्यालयांमधील मोकळ्या जागेत भिंतींच्या खिडकीतून सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात येत असतानाही सर्व ‘दिवे’ लावलेले होते हे विशेष! जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील काही कक्षांमध्ये अनावश्यकरीत्या विजेची उधळण होत असल्याचे बघावयास मिळाले. येथील वनहक्क कायदा कक्षामध्ये असलेले सर्वच दिवे प्रकाशमान होते. वास्तविक बघता एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवे लावण्याची गरज किमान दिवसातरी पडायला नको; मात्र येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून आले. तसेच जिल्हा आपत्ती विभागप्रमुखांच्या कार्यालयातही कोणी नसतानाही त्यांच्या खुर्चीवरील दिवा प्रकाशमान असल्यामुळे कक्ष उजळला होता. जिल्हा परिषदेमध्येही विविध पदाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरील जागेत असलेले सर्वच दिवे लागलेले होते. विशेष म्हणजे यावेळी एकही पदाधिकारी दालनामध्ये नव्हता व अभ्यागतही त्यांच्याकडे फिरकलेले नव्हते तरीदेखील विजेची उधळण सुरूच होती. आदिवासी विकास भवनामध्ये प्रवेश करताच स्वागत कक्षावरील दिवे चालू होते. पहिल्या मजल्यावरील प्रशासन विभागाच्या सर्व खिडक्यांमधून आतमध्ये हवा-प्रकाश खेळता असतानाही दिव्यांचा लखलखाट होता.

मागणी अधिक निर्मिती कमी    ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत निर्मिती अपुरी पडत आहे. २00१ साली भारताच्या प्रतिव्यक्तीमागे ३७४ किलो वॅट ऊर्जेचा वापर दरवर्षी होत होता; मात्र सध्या ६0८ किलो वॅट ऊर्जा वापरली जात आहे. २0१२ पर्यंत जाणकारांच्या मते १000 किलो वॅट ऊर्जेच्या वापराची आवश्यकता असल्याचा अंदाज होता. त्यामुळे ऊर्जेची निर्मिती वाढविण्यावर भर दिला जात आहे. एकूणच दिवसेंदिवस ऊर्जेची मागणी वाढत असून, त्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहे. देशाच्या विकासासाठी आवश्यक असणार्‍या सर्वच उत्पादन क्षेत्रांसाठी ऊर्जेची गरज असून, त्यासाठी ऊर्जेची असणारी नैसर्गिक संसाधने र्मयादित स्वरूपाची आहे. त्यामुळे सौर ऊ र्जेच्या वापराचा विचार करणे गरजेचे असून, विजेची बचत काळाची गरज आहे, हे समजून अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.

जनजागृतीचा विसर, विजेचा अपव्यय

प्रसारमाध्यमांद्वारे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाच्या औचित्यावर राज्य व केंद्र शासनामार्फत जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जात असताना शहरातील शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये मात्र विजेचा अपव्ययच बघावयास मिळाला. ऊर्जा संवर्धन दिन व सप्ताहच्या औचित्यावर एकाही कार्यालयामध्ये जनजागृतीपर फलक लावल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे ‘ऊ र्जा संवर्धन दिन’ शासकीय कार्यालयांच्या उंबरठय़ावरच पोहचलेला नसल्याचे प्रकर्षाने जाणवले.