शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुकणे धरणात बुडून दोघांचा अंत; एकाला वाचवण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:33 IST

इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील धरणावर फिरण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २९ रोजी) दुपारच्या सुमारास घडली. ऐन सणासुदीत अशी दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ठळक मुद्देइगतपुरी तालुक्यातील घटना; परिसरात हळहळ

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील धरणावर फिरण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २९ रोजी) दुपारच्या सुमारास घडली. ऐन सणासुदीत अशी दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. बुडून मृत पावलेल्या दोघांची नावे कमलसिंग खरकसिंग बिल्ट (२५), मनोजकुमार मोहनचंद्र जोशी (५१, दोघेही रा. उत्तराखंड, ह. मु. जिंदाल कंपनी मुंढेगाव) अशी आहेत. या घटनेत वाचलेल्या युवकाचे नाव रवींद्र भरत सिंग आहे. तिघेही युवक मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील कामगार असल्याचे समजते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोन्हीही युवक पाण्यात बुडाले. मृतदेह काढण्यासाठी वाडीवऱ्हे पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली. एक तासाने दुसरा मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेची माहिती मिळताच गोंदे दुमाला येथील जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे निवृत्ती गुंड यांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्यात साहाय्य केले.  वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास फड तपास करत आहेत.मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोशया घटनेत बचावलेल्या रवींद्र सिंग याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, धरणावर गेलेल्या या तीन युवकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची वार्ता कळताच त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. ऐन धूलिवंदन सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू