शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

अतिक्रमण विभागाचा वंचितांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:02 IST

शहरातील वाहतुकीला अडथळा करणारे किंवा विनापरवाना रस्त्यावरच मंडई थाटणारे भाजीविक्रेत्यांवर महापालिका कारवाई करते आणि त्यांचे साहित्यही जप्त करते.

नाशिक : शहरातील वाहतुकीला अडथळा करणारे किंवा विनापरवाना रस्त्यावरच मंडई थाटणारे भाजीविक्रेत्यांवर महापालिका कारवाई करते आणि त्यांचे साहित्यही जप्त करते. त्यामुळे दरवेळी रोषाचा धनी ठरणारे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून मात्र वेगळीच समाजसेवा केली जात आहे. जप्त केलेला भाजीपाला आणि अन्य साहित्य नाशिकमधील निराधार आणि वंचितांच्या संस्थेसाठी मदत म्हणून दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही चर्चेशिवाय ही मदत दिली जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या दृष्टीने नाराजीचा विषय असलेले हा विभाग मात्र सेवाभावी संस्थांच्या दृष्टीने कृतज्ञतेची भावना वाढविणारा ठरत आहे.अतिक्रमण विभाग हा शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रयत्न करीत असला तो कायम वादाच्या भोवऱ्यात असतो.  कधी अतिक्रमण हटवले नाही म्हणून नागरिक चिरिमिरीचे आरोप करतात, तर कधी अतिक्रमण हटविल्यानंतर फेरीवालेही त्यांच्यावर आरोप करतात. त्यात प्रमुख तक्रार जप्त केलेल्या मालाची असते. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई करताना भाजीपाला, फळे जप्त करतात, त्यावर आराडाओरड होते.  कित्येकदा जप्त मालाचे पुढे  काय होते  याविषयी सामान्य नागरिकांनादेखील कुतूहल किंवा शंका असते. मात्र, नाशिक महापालिकेच्या वतीने हा माल शहरातील विविध सेवाभावी संस्था तसेच वंचितांचा सांभाळ करणाºया संस्था तसेच शासकीय वसतिगृहांना दिला जातो.गरजवंतांकडून कृतज्ञता...शहरातील अभिक्षणगृह (रिमांडहोम), रमाबाई आंबेडकर वसतिगृह, त्याचप्रमाणे वृद्धाश्रम, अंध-अपंगांचा सांभाळ करणाºया संस्था यांना हा माल दिला जातो आणि किती तसेच कोणता माल दिला, याबाबतदेखील लेखी घेतले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडून अशाप्रकारची मदत दिली जात असून, त्यासंदर्भातील नोंदी दफ्तरी दाखल असल्याचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी सांगितले. महापालिकेच्या या सहकार्यामुळे अनेक गरजवंत आणि वंचितांना आधार मिळतो.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण