शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
2
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
3
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
4
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
5
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
6
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, पण ४०० पार नाही जाणार, एक्झिट पोलचा अंदाज 
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

महिलांचे सबलीकरण काळाची गरज : परुळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:58 AM

महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दूर होऊन त्या सक्षम होतील तसेच स्वयंविकासातून कौटुंबिक विकासही साधतील, असा विश्वास स्वयंसिद्धा प्रकल्पाच्या संचालिका कांचन परुळेकर यांनी व्यक्त केला असून, समाजाच्या विकासासाठी महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : महिलांचे आर्थिक सबलीकरण झाल्यास त्यांचे परावलंबित्व दूर होऊन त्या सक्षम होतील तसेच स्वयंविकासातून कौटुंबिक विकासही साधतील, असा विश्वास स्वयंसिद्धा प्रकल्पाच्या संचालिका कांचन परुळेकर यांनी व्यक्त केला असून, समाजाच्या विकासासाठी महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत रविवारी (दि. २७) कांचन परुळेकर यांनी सत्ताविसावे पुष्प गुंफले. निर्मला केशव गरुड यांच्या स्मृतीत महिलांचे आर्थिक सबलीकरण विषयावर व्याख्यान देताना त्यांनी महिलांना स्वयंविकास व स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, सद्य:स्थितीत आर्थिक विकास हा धर्म झाला असल्याने महिलांनी आत्मभान, आत्मनिर्भरता आणि स्वावलंबनाची कास धरून भविष्याचा वेध घेतला पाहिजे. आर्थिक सक्षमीकरणासाठी महिलांनी स्वत:च पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासनाने महिलांसाठी विविध क्षेत्रांत आरक्षण दिले असले तरी पंचायत राजमध्ये महिलांच्या आरक्षित जागांवर ७५ टक्के पुरुषच कार्यभार पाहत आहेत. महिलांच्या सबलीकरणात हा सर्वांत मोठा अडसर असून, महिलांनी आत्मनिर्भर हाणे गरजेचे आहे. समाजातील पुरु षांचे सबलीकरण झाले आहे. त्या तुलनेत महिलांचे सबलीकरण झालेले नाही. त्यासाठी संधीची वाट पाहण्याऐवजी महिलांनी स्वत:च संधी निर्माण करून त्याचे सोने करावे. पुरु षांनीही त्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. आई उद्योजक झाली, तर पुढची पिढी उद्योजक बनते, हे लक्षात घेऊन महिलांनी वाटचाल करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी महिलांनी उद्योग व्यवसायात उतरण्याचे आवाहन केले.आजचे व्याख्यान ,  विषय : कॉर्पोरेट कर्मयोग,  वक्ते : भावार्थ रामचंद्र देखणे

टॅग्स :Nashikनाशिक