शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शेतकऱ्यांचा कांदा लागवडीवर जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:23 IST

मानोरी : यंदा समाधानकारक पडलेला पाऊस आणि कांद्याचे टिकून असलेल्या दरामुळे येवला तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीवर जोर देताना दिसून ...

ठळक मुद्देअपेक्षा : दर टिकून असल्याने समाधान; रोपांना मागणी वाढली

मानोरी : यंदा समाधानकारक पडलेला पाऊस आणि कांद्याचे टिकून असलेल्या दरामुळे येवला तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीवर जोर देताना दिसून येत आहेत. त्यातच अनेक शेतकर्यांचे पीक अवकाळी पावसाने दोन ते तीन वेळी पाण्यात गेले असले तरी भविष्यात चांगला दर मिळेल या आशेने मिळेल त्या भावाने कांदा रोपे खरेदी करत असल्याचे पहावयास मिळत आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, जऊळके, जळगाव नेउर, शिरसगाव, पिंपळगाव लेप आदी परिसरातील शेतकरी जानेवारी महिना संपत आला असतानाही उन्हाळ कांदा लागवडीत व्यस्त आहेत. कांद्याचे माहेर घर म्हणून ख्याती असलेल्या येवला तालुक्यात यंदा अवकाळी पावसाने कांद्याचे रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. तर दुसरीकडे कांद्याचे भाव गगनाला भिडले असल्याने महागड्या दराने का होईना कांद्याचे रोपे अजूनही शेतकरी वर्ग खरेदी करून कांदा लागवड करत आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात उन्हाळ कांदा लागवड आटोपलेली असते. मात्र, यंदा चालू हंगामात परतीच्या पावसाने जोरदार आगमन करत खरीप हंगामातील पिकांची नासाडी केली.यात मोठ्या अपेक्षेप्रमाणे कांद्याची टाकलेली रोपेसुद्धा अवकाळी पावसाने होत्याची नव्हती करून टाकली. अवकाळी पावसाने तब्बल तीनदा रोपे टाकूनही ही रोपे सडून गेल्याने शेतकर्यांना स्वत:च्या मालकीची रोपे कांदा लागवडीसाठी राहिली नव्हती. तरीही कांदा लागवड करण्यासाठी सध्या शेतकर्यांना कांद्याच्या रोपाला महागडा भाव द्यावा लागत आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे कांदा लागवडीकडे शेतकरी वर्गाने जास्त भर दिलाआहे. एकीकडे घरची रोपे सडून गेली तर दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडत असल्याने महागड्या किमतीने का होईना मिळेल तेथून रोपे घेऊन कांदा लागवडीसाठी शेतकरी वर्गाची जणू लगीन् घाईच सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.औषध फवारणीचा खर्च वाढला; मजुरांना आले सुगीचे दिवसयेवला तालुक्यात मागील दीड महिन्यापासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाल्याचे दिसून आले आहे.वातावरण बदलामुळे कांद्यावर अधून मधून विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने वारंवार औषध फवारणी करावी लागत आहे.त्यामुळे नवीन कांदा लागवड धोक्यात आली असून लागवड केलेल्या कांद्याला वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.येवला तालुक्यातील मुखेड, मानोरी बुद्रुक, चिचोंडी, नेऊरगाव, देशमाने, जळगाव नेऊर, एरंडगाव आदी भागात कांदा लागवडीसाठी मजूर वर्गाची वानवा भासत आहे. मजूर वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी विकत घेतलेले रोपे खराब झाली आहेत. सध्या कांदा लागवडीचा प्रती एकर तब्बल आठ ते नऊ हजार रु पयांपर्यंत पोहचला असून मजूर वर्गाला मोठी मागणी होत असल्याचे दिसून येत आहे.यंदा कांद्याचे दर टिकून असल्याने उन्हाळ कांदा लागवड देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवकाळी पावसाने रोपांचे नुकसान झाल्याने आता कांदा लागवडीसाठी अत्यंत महागड्या दराने कांद्याची रोपे खरेदी करावी लागत आहे. बदलत्य वातावरणाने औषध फवारणी करण्याचा खर्च वाढला आहे. कांदा काढणीला आल्यानंतर भाव मिळतो की नाही याची शाश्वती नसल्याने धाकधूक वाढली आहे.- संदीप वावधाने, कांदा उत्पादक, मानोरी बु.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा