शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा महामार्गावरील आपत्कालीन सुविधा शोभेपुरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:25 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील आपत्कालीन स्थितीमध्ये रात्री-अपरात्री महामार्गावर अडचणीच्या वेळी मदत मिळावी या हेतूने ठरावीक अंतरावर एस.ओ.एस. सुविधा बसविण्यात आली आहे. त्यावरील कॉल बटण प्रेस करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या असल्या तरी अजूनही ही सेवा कार्यान्वित नसल्याने फक्त शोभेपुरती ती बसविण्यात आली आहे का, असा प्रश्न प्रवासी व वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील आपत्कालीन स्थितीमध्ये रात्री-अपरात्री महामार्गावर अडचणीच्या वेळी मदत मिळावी या हेतूने ठरावीक अंतरावर एस.ओ.एस. सुविधा बसविण्यात आली आहे. त्यावरील कॉल बटण प्रेस करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या असल्या तरी अजूनही ही सेवा कार्यान्वित नसल्याने फक्त शोभेपुरती ती बसविण्यात आली आहे का, असा प्रश्न प्रवासी व वाहनधारकांनी उपस्थित केला आहे. महामार्गावर परदेशातील संपर्क यंत्रणेसारखी एस.ओ.एस. ही अत्यावश्यक सुविधा ठरावीक अंतरावर उपलब्ध करून दिलेली आहे. पण एकंदरीत ही यंत्रणा रस्त्यावर शोभेपुरती बसविलेली दिसते. मुंबई-आग्रा जलदगती महामार्गावर काही वाहनचालकांना अडचण निर्माण झाल्यास संपर्क साधण्यासाठी अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध होण्यासाठी महामार्गावर ही फोन सुविधा ठराविक अंतरावर उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु सेवा अजूनही सुरू झालीच नसल्याचे वाहनधारक सांगतात. या सुविधेचा फायदा सर्व वाहनधारकांना कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी हायवेवरून नेहमी प्रवास करणाऱ्या वाहन धारकांनी केली आहे.  तसेच हायवेलगत काही किलोमीटरच्या आतमध्ये असलेले स्वच्छतागृह दिसत नाहीत. त्यामुळे वाहनधारकांची विशेष करून महिलांची मोठी कुचंबणा होते. त्यामुळे प्रशासनानेदेखील योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे. गरजेच्या ठिकाणीनिवारा शेड उभारावेमहामार्गाच्या दुतर्फा प्रवाशांच्या संरक्षणासाठी निवारा शेड फक्त ठरावीक ठिकाणी उभारण्यात आले आहेत. त्यातील काही निवारा शेडची दुरवस्था झालेली आहे. शिवाय बºयाच ठिकाणी निवारा शेड रस्त्याच्या एकाच बाजूने बसवलेले आहे. दुसºया बाजूने देखील प्रवासी असतात याचा विचार करून गरजेच्या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग