शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

व्याधीजर्जर गोवंशावर मायेची पखरण...

By admin | Updated: October 16, 2015 23:57 IST

व्याधीजर्जर गोवंशावर मायेची पखरण...

‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीचा प्रत्यय गायींबाबत प्रकर्षाने येतो. गाय दुभती न राहिल्याने कित्येक जण तिची रवानगी एकतर कत्तलखान्यात करतात वा तिला घराबाहेर तरी काढतात. आयुष्याच्या सायंकाळी व्याधीजर्जर झालेल्या या गायींची सुश्रुषा करणे किती अवघड काम असते, याची कल्पना कुणालाही यावी; पण पंचवटीतील रूपाली जोशी हे काम सतरा वर्षांपासून अव्याहत आणि निष्ठेने करीत आहेत. जोशी यांना लहानपणापासून प्राण्यांविषयी प्रेम. १९९८ मध्ये त्यांनी योगायोगाने तपोवनातील कृषी गोसेवा ट्रस्ट या संस्थेत काही दिवस काम केले. त्या गोवंशाची मनापासून करीत असलेली सेवा पाहून पुढे त्यांच्यावरच ही जबाबदारी पूर्णवेळ सोपवण्यात आली. या ट्रस्टच्या व्यवस्थापक म्हणून जोशी काम पाहत आहेत. ट्रस्टच्या गोशाळेत अडीचशे गायी, गोऱ्हे व बैल आहेत. गायीने दूध देणे बंद केल्यावर वा बैल म्हातारा झाल्यानंतर लोक त्याची रवानगी कत्तलखान्याकडे करतात किंवा त्यांना रस्त्यावर सोडून देतात. रस्त्यावर सोडलेली गुरे महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक उचलून दहा दिवस कोंडवाड्यात ठेवते. गुराचा मालक न आल्यास गुरांना या गोशाळेत पाठवले जाते. अशा गायींची रूपालीताई सेवा करतात. कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गुरांची त्या स्वत:चा जीव धोक्यात घालून सुटका करतात. गोशाळेत आणून त्यांचे पालनपोषण करतात. बऱ्याच गुरांना गंभीर आजार असतो, कोणाचा सांधा निखळलेला असतो, तर कोणाला वृद्धावस्थेमुळे जागेवरून उठणेही अशक्य असते. त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या आयुष्याची सायंकाळ सुसह्य करण्याचे काम जोशी करीत आहेत. गोशाळेत येणारी गुरे भाकड असतात. त्यांच्यापासून दूध मिळत नाही. त्यांच्यावर वारंवार उपचारही करावे लागतात. समाजाने नाकारलेल्या या गुरांना रूपालीताई माया लावतात. सकाळपासूनच त्यांचे काम सुरू होते. गुरांची पाहणी करून त्यांना हवे-नको ते पाहणे, त्यांना औषधे देणे, इंजेक्शन्स-सलाइन्स देणे, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करणे आदि जबाबदाऱ्या त्या लीलया सांभाळतात. एवढेच नव्हे, दिवसाचे चोवीस तास त्या सजग राहतात आणि कत्तलीसाठी नेणाऱ्या गायींना वाचवण्यासाठी धाव घेतात. प्राण्यांप्रति असलेल्या प्रेमापोटीच या कार्यात रमलो आहोत. गुरे मुकी असली, तरी त्यांना भावना नीट समजतात. एखादी गाय कितीही आक्रमक झाली, तरी तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवल्यास ती शांत होतेच, असा अनुभव असल्याचे जोशी सांगतात. सेवेचा हाच वसा आपण आयुष्यभर जोपासणार असल्याचाही निश्चय त्या बोलून दाखवतात. ‘समाजाकडून दुर्लक्षित गोवंशाची आपल्या हातून सेवा घडते, याचा अभिमान वाटतो. गोशाळेत आलेली गुरे मुळातच कमजोर, आजाराने ग्रासलेली असतात. अशा गोवंशाचे मरण सुसह्य करण्याचे काम आपल्या हातून घडते, याचे समाधान वाटते’, असे जोशी सांगतात. क्षुल्लक कारणावरून माणसा-माणसामध्ये वैर भडकण्याच्या सध्याच्या काळात गुरांना माया लावणारी अशी व्यक्ती विरळीच!