शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
8
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
9
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
10
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
11
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
12
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
13
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
14
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
15
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
17
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
19
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
20
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास

भूजल अधिनियमनाविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:45 IST

शेतकऱ्यांना आता आपल्या शेतात कोणत्या पिकाची लागवड करायची हे शासनाच्या धोरणानुसार ठरवावे लागणार असून विहीर, विंधनविहीर खोदण्यासाठीही शासनाची परवानगी घेत पाण्याचा महसूलही भरावा लागणार असून, याबाबत शासनाने नव्याने भूजल अधिनियमन आणले आहेत.

दिंडोरी : शेतकऱ्यांना आता आपल्या शेतात कोणत्या पिकाची लागवड करायची हे शासनाच्या धोरणानुसार ठरवावे लागणार असून विहीर, विंधनविहीर खोदण्यासाठीही शासनाची परवानगी घेत पाण्याचा महसूलही भरावा लागणार असून, याबाबत शासनाने नव्याने भूजल अधिनियमन आणले आहेत. या निर्णयास शेतकºयांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत हरकती नोंदवण्यात येऊन वेळप्रसंगी आंदोलन व न्यायालयात जाण्याचा निर्णय दिंडोरी येथे झालेल्या सर्वपक्षीय शेतकºयांच्या बैठकीत घेण्यात आला. कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, वाघाड महासंघाचे चंद्रकांत राजे, शहाजी सोमवंशी, शिवाजी पिंगळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी दिगवंत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.शासनाच्या भूजल व धरण पाणीवाटप नियोजन जलआराखडा याबाबत आमदार नरहरी झिरवाळ यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत मुद्दा उपस्थित करत लक्ष वेधले होते. या प्रश्नावर आमदार झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाने भूजल अधिनियम प्रसिद्ध केले असून त्यात शेतकºयांना विहीर व विंधनविहीर खोदण्यास परवानगी घ्यावी लागणार आह. तसेच या पाणी वापरासाठी कर भरावा लागणार आहे. कोणत्या क्षेत्रात किती पाणी उपलब्ध होणार आहे यावर तेथे कोणती पिके घ्यायची हे शासन ठरवून देणार आहे. अधिसूचित पिके सोडून दुसरे पीक लावायचे असेल तर त्याची परवानगी घ्यावी लागणार असून, त्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. आदी विविध बाबी या अधिनियमनात प्रस्तावित असून, यावर ३१ आॅगस्ट पर्यंत हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. याबाबत दिंडोरीत बैठक झाली, यावेळी शेतकºयांनी या कायद्याला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एकत्रित हरकती घेण्यात येणार आहे.धरणांच्या जलनियोजनाबाबत नाराजीजायकवाडी धरण भरावे यासाठी ऊर्ध्व गोदावरी खोºयात पाणी अडवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यावर नाराजी व्यक्त केली असून हे निर्बंध उठविण्याची मागणी करण्यात आली. दिंडोरी तालुक्यात घाटमाथ्यावर अजूनही साइट उपलब्ध आहे तेथे गुजरातला वाया जाणारे पाणी गोदावरी खोºयात वळवून तूट भरून काढणे शक्य असून, त्यासाठी शासनाने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. शेतकºयांनीही जागरूक होत सर्व धरणे लाभक्षेत्रात पाणी वाटप सोसायटी स्थापन करून पाणी परवानगी घेऊन आपला कायदेशीर पाण्यावरील हक्क प्रस्थापित करावा असे ठरविण्यात आले.यावेळी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, वाघाड महासंघाचे चंद्रकांत राजे, शहाजी सोमवंशी, शिवाजी पिंगळ, कोपरगाव साखर कारखान्याचे संचालक सोमनाथ पाटील चांदगुडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, विश्वासराव देशमुख, आर. के. खांदवे, गोपीनाथ गांगुर्डे, बाळासाहेब कदम, जे.डी. केदार, मनोज ढिकले, नितीन गांगुर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नरेश देशमुख यांनी केले. यावेळी सुरेश डोखळे, संजय पडोळ, बाळासाहेब जाधव, राजेंद्र ढगे, भास्कर भगरे, सुरेश देशमुख, सदाशिव गावित, संजय वाघ, राजेंद्र देशमुख, दिनकर जाधव, वाळू जगताप, रणजित देशमुख, गंगाधर निखाडे, विलास कड, रघुनाथ गामणे, डॉ. योगेश गोसावी, पांडुरंग गणोरे, सुनील आव्हाड, प्रकाश पिंगळ, श्याम हिरे, पप्पू राऊत आदी उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारWaterपाणी