शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

शेतकऱ्यांचा हमीभावासाठी पुन्हा एल्गार; गांधी जयंतीपासून कर्जमुक्तीचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 17:30 IST

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना शेतीमालाला हमीभाव व सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी पुन्हा एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यव्यापी आंदोलन करून राज्यकर्त्यांसमोर शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षापासून दूर राहत किसान क्रांती मोर्चाने २ ऑक्टोबरपासून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत गावोगावी चावडी-पारावर ‘मी शेतकरी’ या बॅनरखाली आंदोलन करण्याची भूमिका किसान क्रांती मोर्चाने घेतल्याची माहिती शेतकरी नेते तथा शेतकरी सुकाणू समीतीचे सदस्य डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

ठळक मुद्देहमीभाव, कर्जमुक्तीसाठी शेतकरी उभारणार लढा गांधी जयंतीपासून मी शेतकरी बँनरखाली गावोगावी आंदोलन

नाशिक : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना शेतीमालाला हमीभाव व सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी पुन्हा एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यव्यापी आंदोलन करून राज्यकर्त्यांसमोर शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षापासून दूर राहत किसान क्रांती मोर्चाने २ ऑक्टोबरपासून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत गावोगावी चावडी-पारावर ‘मी शेतकरी’ या बॅनरखाली आंदोलन करण्याची भूमिका किसान क्रांती मोर्चाने घेतल्याची माहिती शेतकरी नेते तथा शेतकरी सुकाणू समीतीचे सदस्य डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी किसान क्रांती मोर्चाच्या माध्यमातून कर्जमुक्ती आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी २०१७ मध्ये १ जूनपासून ‘शेतकरी संपावर’ आंदोलन क रून मुंबईसह राज्यभरातील प्रमुख शहराचा भाजीपाला व दूध पुरवठा खंडीत केला होता. पुणतांबा येथून सुरु झालेल्या या आंदोलनाला नाशिकसह संपूर्ण उत्तरमहाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत शेतमालाचा संपूर्ण पुरवठा बंद केला होता. मात्र या आंदोलनादरम्यान काही शेतकरी नेते सरकारच्या दावनीला बांधले गेल्याचा आरोप झाल्याने संपात फुट पडल्याने आंदोलनाला अपेक्षित यश मिळू शकले नव्हते. राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोशल मिडियाच्या माध्यमातून आंदोलन उभे करण्याची तयारी सुरु केली असून २ ऑक्टोबरपासून गावोगावी चावडी, पारावर ‘मी शेतकरी ’ या बॅनरखाली धरणे आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच शेतकऱ्यांनी या आंदोलनाचे नियोजन केले आहे.विविध राजकीय पक्षांच्या सभा अणि प्रचार रॅलींमध्ये सहभागी होताना ‘मी शेतकरी’ असे घोषवाक्य लिहिलेली टोपी घालून उपस्थित राहण्याचे अवाहनही या माध्यमातून केले जात आहे. प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने विविध राजकीय पक्ष सत्तेत आल्यानंतर विसरुन जातात व पुढील निवडणुकीत त्याच त्याच आश्वासनांची बरसात करतात. अशा राजकीय नेत्यांना त्यांनीच गेल्या निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्याचा यामागे उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. गावात येणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सरसकट कर्जमुक्ती आणि हमीभावाविषयी लेखी आश्वासन घेण्यासोबतच गावोगावी यासंबधीचे ठराव करून राज्यपालांना पाठविण्याचे नियोजन या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती