शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

अकरा हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 01:43 IST

नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेतल्यानंतर  निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ५८९५ जागांसाठी आता ११ हजार १०५ इतके उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायत:  १६२७ उमेदवार आले बिनविराेध

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेतल्यानंतर  निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ५८९५ जागांसाठी आता ११ हजार १०५ इतके उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. दरम्यान, बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या १६२७ इतकी असून, सर्वाधिक २३८ उमेदवार  सिन्नर तालुक्यातून बिनविरोध निवडून आले आहेत. गेल्या ४ जानेवारी  रोजी अर्ज माघारी झाल्यानंतर निवडणूक रिंगणातील चित्र समोर आले होते; परंतु नांदगाव आणि येवला तालुक्यांमधील अर्ज माघारीचे नाट्य लांबल्यामुळे या दोन्ही तालुक्यांमधील अंतिम आकडेवारी समोर आलेली नव्हती.  निवडणुका असलेल्या १३ तालुक्यांमधील ५८९५ जागांसाठीचे चित्र  आता स्पष्ट झाले असून, ११,१०५ उमेदवार नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील ५८९५ जागांसाठी १६,५६३  असे इतके नामनिर्देशन अर्ज वैध ठरल्याने  अर्ज माघारीसाठी उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी राजकीय नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागली. माघारीच्या दिवशी प्रत्येक तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज माघारीची मुदत असल्याने उमेदवारांना  धावपळ करावी लागली. शंभरावर उमेदवार बिनविरोधनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर व्यापक हालचाली सुरू असल्यामुळे त्याचा परिणामही दिसून आला. अनेक तालुक्यांमध्ये शंभरच्या पुढे जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. निफाड, सिन्नर, येवला, मालेगाव आणि नांदगाव तालुक्यांमधून अर्ज माघार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जवळपास सर्वच ठिकाणी अर्ज माघारी घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचेही दिसून आले. 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत