शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

दोन जिल्ह्यातील वीज सीमावाद संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 22:49 IST

नांदगाव : दोन जिल्ह्यातला वीज सीमावाद संपुष्टात आला असून, न्यायडोंगरीच्या वीजपुरवठ्याची तार जळगाव जिल्ह्याकडून नाशिक जिल्ह्याला जोडली गेल्याने सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यापासून न्यायडोंगरीकरांची सुटका झाली आहे.

ठळक मुद्देवीजपुरवठा नाशिककडे : न्यायडोंगरीकरांना मिळाला दिलासाजिल्हा परिषदेच्या आमसभेमध्ये चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : दोन जिल्ह्यातला वीज सीमावाद संपुष्टात आला असून, न्यायडोंगरीच्या वीजपुरवठ्याची तार जळगाव जिल्ह्याकडून नाशिक जिल्ह्याला जोडली गेल्याने सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यापासून न्यायडोंगरीकरांची सुटका झाली आहे.गेल्या तीन दिवसांपासून अंधारात असलेल्या न्यायडोंगरीचा वीजपुरवठा रविवारी (दि. ८) सुरळीत करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचवेळी जळगावकडून नाशिक विभागाकडे वीजपुरवठा हस्तांतरित झाल्याने रात्रंदिवस धावपळ करीत असलेल्या वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. व अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या लक्षात ही बाब आणून देत, हा सीमावाद कायमस्वरूपी निकाली काढण्याची मागणी केली. त्यास कार्यकारी अभियंता डोंगरे व सहायक अभियंता वाटपाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक बाबींची पूर्तता करून दिल्याने नाशिक विभागातील पिंपरखेड, ता. नांदगाव येथून न्यायडोंगरी उपकेंद्रासाठी वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.न्यायडोंगरी, बिरोळा, हिंगणेदेहरे, पिंप्रीहवेली, परधाडी, पिंपरखेड, चिंचविहीर, चांदोरा, जळगाव खुर्द या गावांना या बदलाचा फायदा होणार आहे.न्यायडोंगरी वीज उपकेंद्रास जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून वीजपुरवठा केला जात असे. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत असे. परंतु वीज वितरणासाठी जळगाव विभाग येत असल्यामुळे नाशिक विभागाचे अधिकारी व कर्मचारी तिकडे जाऊन काम करू शकत नव्हते. ही तांत्रिक अडचण लक्षात घेऊन आर्कि. अश्विनी आहेर यांनी हा प्रश्न जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदelectricityवीज