शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:34 IST

वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकामांचा बोजवारा उडाला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व धरणे यंदा काटोकाट भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते; परंतु भारनियमन सुरू आहे. तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शेतकºयांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देपांगरी : पिकांना पाणी देण्यासाठी पूर्ण क्षमतेने पुरवठा करण्याची मागणी

पांगरी : वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकामांचा बोजवारा उडाला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व धरणे यंदा काटोकाट भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते; परंतु भारनियमन सुरू आहे. तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शेतकºयांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी, नाले, बंधारे भरली आहेत. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाची म्हणजे गहू, मका तसेच जनवारांच्या चाºयाची लागवड केली आहे, परंतु पिकांना पाणी देणे शेतकºयांना अवघड झाले आहे. अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने एक वाफा भरण्याकरिता अर्धा तास लागत आहे. वीज खंडित होण्याचे प्रमाण ही वाढल्याने वाफ्यापर्यंत पाणी पोहोचण्याअगोदर वीज जाते. त्यामुळे विहीर ते वाफ्यापर्यंत शेतकरी चकरा मारून हैराण झाला आहे. पाणी भरण्यासाठी दोन व्यक्तीची गरज भासू लागली असून, एक शेतात तर दुसºयाला स्टार्टरजवळ उभे राहावे लागत आहे.सध्या शेतकºयांना शेतीसाठी रविवारी ते मंगळवार रात्री ८.०५ ते सकाळी ६.०५ वाजेपर्यंत, तर गुरुवार ते रविवार सकाळी ७.२० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत वीज असते, परंतु रात्री दिली जाणारी वीज रात्री न देता दिवसाच्या वेळी देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. रात्री अंधारामुळे हिंस्रपशू तसेच साप, विंचू सारखे विषारी प्राण्यांच्या दहशतीखाली शेतकºयाला रात्री शेतीत पाणी भरावे लागते.शेतीसाठी दिवसाच वीज द्यावी तसेच पूर्ण दाबाने वीज देण्याची मागणी बाबासाहेब शिंदे, अशरफ कादरी, अशोक शिंदे, दादासाहेब पांगारकर, नीलेश पगार, प्रकाश पांगारकर, संदीप पगार, भाऊसाहेब पगार, प्रवीण शिंदे, सुनीलनिरगुडे आदींसह शेतकºयांनी केली आहे.कमी दाबाचा पुरवठा वीज उपकरणे बंदवीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक वीज उपकरणे बंद आहेत. त्यामुळे वीज असूनही उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती उपकरणे जळून नुकसान होत आहे. मोटर जळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकºयाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.पांगरी व परिसरात गावामध्ये अत्यंत कमी दाबाने वीज दिली जात असून, वीज वारंवार खंडित होत आहे. वीज मंडळाकडून वीजबिल मात्र अखंडितपणे वसूल होत आहे. वीजबिल व इतर सर्व आकार सक्तीने वसूल केले जात असताना वीज कमी दाबाने दिली जात आहे. शेतकºयांवर हा अन्याय आहे.- संजय वारुळे, उपाध्यक्ष, विकास संस्था, पांगरीग्रामीण भागातील शेतीला सरकारने सलग वीजपुरवठा आणि तो दिवसा केला तर शेतीला पुन्हा ऊर्जितावस्था येऊ शकते, परंतु सरकारची तशी मानसिकता असायला हवी, दुर्दैवाने ती नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची पाउणशे वर्षे उलटून गेल्यानंतरही ग्रामीण भागातील भूमिपुत्र व शेतकरी आजही अंधारात चाचपडत आहेत.- आत्माराम पगार, सिन्नर तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :Governmentसरकार