शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

विजेअभावी शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:34 IST

वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकामांचा बोजवारा उडाला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व धरणे यंदा काटोकाट भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते; परंतु भारनियमन सुरू आहे. तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शेतकºयांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देपांगरी : पिकांना पाणी देण्यासाठी पूर्ण क्षमतेने पुरवठा करण्याची मागणी

पांगरी : वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकामांचा बोजवारा उडाला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व धरणे यंदा काटोकाट भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते; परंतु भारनियमन सुरू आहे. तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शेतकºयांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी, नाले, बंधारे भरली आहेत. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाची म्हणजे गहू, मका तसेच जनवारांच्या चाºयाची लागवड केली आहे, परंतु पिकांना पाणी देणे शेतकºयांना अवघड झाले आहे. अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने एक वाफा भरण्याकरिता अर्धा तास लागत आहे. वीज खंडित होण्याचे प्रमाण ही वाढल्याने वाफ्यापर्यंत पाणी पोहोचण्याअगोदर वीज जाते. त्यामुळे विहीर ते वाफ्यापर्यंत शेतकरी चकरा मारून हैराण झाला आहे. पाणी भरण्यासाठी दोन व्यक्तीची गरज भासू लागली असून, एक शेतात तर दुसºयाला स्टार्टरजवळ उभे राहावे लागत आहे.सध्या शेतकºयांना शेतीसाठी रविवारी ते मंगळवार रात्री ८.०५ ते सकाळी ६.०५ वाजेपर्यंत, तर गुरुवार ते रविवार सकाळी ७.२० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत वीज असते, परंतु रात्री दिली जाणारी वीज रात्री न देता दिवसाच्या वेळी देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. रात्री अंधारामुळे हिंस्रपशू तसेच साप, विंचू सारखे विषारी प्राण्यांच्या दहशतीखाली शेतकºयाला रात्री शेतीत पाणी भरावे लागते.शेतीसाठी दिवसाच वीज द्यावी तसेच पूर्ण दाबाने वीज देण्याची मागणी बाबासाहेब शिंदे, अशरफ कादरी, अशोक शिंदे, दादासाहेब पांगारकर, नीलेश पगार, प्रकाश पांगारकर, संदीप पगार, भाऊसाहेब पगार, प्रवीण शिंदे, सुनीलनिरगुडे आदींसह शेतकºयांनी केली आहे.कमी दाबाचा पुरवठा वीज उपकरणे बंदवीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक वीज उपकरणे बंद आहेत. त्यामुळे वीज असूनही उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती उपकरणे जळून नुकसान होत आहे. मोटर जळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकºयाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.पांगरी व परिसरात गावामध्ये अत्यंत कमी दाबाने वीज दिली जात असून, वीज वारंवार खंडित होत आहे. वीज मंडळाकडून वीजबिल मात्र अखंडितपणे वसूल होत आहे. वीजबिल व इतर सर्व आकार सक्तीने वसूल केले जात असताना वीज कमी दाबाने दिली जात आहे. शेतकºयांवर हा अन्याय आहे.- संजय वारुळे, उपाध्यक्ष, विकास संस्था, पांगरीग्रामीण भागातील शेतीला सरकारने सलग वीजपुरवठा आणि तो दिवसा केला तर शेतीला पुन्हा ऊर्जितावस्था येऊ शकते, परंतु सरकारची तशी मानसिकता असायला हवी, दुर्दैवाने ती नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची पाउणशे वर्षे उलटून गेल्यानंतरही ग्रामीण भागातील भूमिपुत्र व शेतकरी आजही अंधारात चाचपडत आहेत.- आत्माराम पगार, सिन्नर तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :Governmentसरकार