शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 23:34 IST

वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकामांचा बोजवारा उडाला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व धरणे यंदा काटोकाट भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते; परंतु भारनियमन सुरू आहे. तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शेतकºयांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देपांगरी : पिकांना पाणी देण्यासाठी पूर्ण क्षमतेने पुरवठा करण्याची मागणी

पांगरी : वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकामांचा बोजवारा उडाला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व धरणे यंदा काटोकाट भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते; परंतु भारनियमन सुरू आहे. तसेच वीज असते त्यावेळी अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शेतकºयांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी, नाले, बंधारे भरली आहेत. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकाची म्हणजे गहू, मका तसेच जनवारांच्या चाºयाची लागवड केली आहे, परंतु पिकांना पाणी देणे शेतकºयांना अवघड झाले आहे. अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने एक वाफा भरण्याकरिता अर्धा तास लागत आहे. वीज खंडित होण्याचे प्रमाण ही वाढल्याने वाफ्यापर्यंत पाणी पोहोचण्याअगोदर वीज जाते. त्यामुळे विहीर ते वाफ्यापर्यंत शेतकरी चकरा मारून हैराण झाला आहे. पाणी भरण्यासाठी दोन व्यक्तीची गरज भासू लागली असून, एक शेतात तर दुसºयाला स्टार्टरजवळ उभे राहावे लागत आहे.सध्या शेतकºयांना शेतीसाठी रविवारी ते मंगळवार रात्री ८.०५ ते सकाळी ६.०५ वाजेपर्यंत, तर गुरुवार ते रविवार सकाळी ७.२० ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत वीज असते, परंतु रात्री दिली जाणारी वीज रात्री न देता दिवसाच्या वेळी देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. रात्री अंधारामुळे हिंस्रपशू तसेच साप, विंचू सारखे विषारी प्राण्यांच्या दहशतीखाली शेतकºयाला रात्री शेतीत पाणी भरावे लागते.शेतीसाठी दिवसाच वीज द्यावी तसेच पूर्ण दाबाने वीज देण्याची मागणी बाबासाहेब शिंदे, अशरफ कादरी, अशोक शिंदे, दादासाहेब पांगारकर, नीलेश पगार, प्रकाश पांगारकर, संदीप पगार, भाऊसाहेब पगार, प्रवीण शिंदे, सुनीलनिरगुडे आदींसह शेतकºयांनी केली आहे.कमी दाबाचा पुरवठा वीज उपकरणे बंदवीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक वीज उपकरणे बंद आहेत. त्यामुळे वीज असूनही उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती उपकरणे जळून नुकसान होत आहे. मोटर जळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकºयाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.पांगरी व परिसरात गावामध्ये अत्यंत कमी दाबाने वीज दिली जात असून, वीज वारंवार खंडित होत आहे. वीज मंडळाकडून वीजबिल मात्र अखंडितपणे वसूल होत आहे. वीजबिल व इतर सर्व आकार सक्तीने वसूल केले जात असताना वीज कमी दाबाने दिली जात आहे. शेतकºयांवर हा अन्याय आहे.- संजय वारुळे, उपाध्यक्ष, विकास संस्था, पांगरीग्रामीण भागातील शेतीला सरकारने सलग वीजपुरवठा आणि तो दिवसा केला तर शेतीला पुन्हा ऊर्जितावस्था येऊ शकते, परंतु सरकारची तशी मानसिकता असायला हवी, दुर्दैवाने ती नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची पाउणशे वर्षे उलटून गेल्यानंतरही ग्रामीण भागातील भूमिपुत्र व शेतकरी आजही अंधारात चाचपडत आहेत.- आत्माराम पगार, सिन्नर तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :Governmentसरकार