शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वीज, पावसाचा धुमाकूळ

By admin | Updated: October 3, 2015 00:06 IST

सुरगाण्यात एक ठार : चौघे जखमी; जनावरेही मृत्युमुखी

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे एक जण ठार तर चौघे गंभीर जखमी झाले असून, ठिकठिकाणी वीज पडून जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. नाशिक शहरातही दुपारी अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली, त्यानंतर मात्र हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सलग तीन दिवस पडलेल्या पावसाने नंतरच्या कालावधीत दडी मारली, त्यामुळे परतीचा पाऊस निघूनही गेल्याची भावना व्यक्त केली जात असताना गेल्या काही दिवसांपासून भाद्रपदाचे कडाक्याचे ऊन तापण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे दिवसा उन्हाचा तडाखा व रात्री गारवा अशा दुहेरी हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच शुक्रवारी दुपारपर्यंत कोपलेल्या सूर्यदेवाला अचानक दोन वाजता ढगांनी वेढले व काही वेळातच विजेचा कडकडाट करीत वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहराप्रमाणेच ग्रामीण भागात म्हणजेच पेठ, सुरगाणा, चांदवड, दिंडोरी या तालुक्यांनाही पावसाने झोडपले. त्यात सुरगाणा तालुक्यातील चिखली येथे वीज पडून यशवंत लक्ष्मण चौधरी हे जागीच ठार झाले तर युवराज चंदर भोये हे जखमी झाले. दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी येथेही जगन बहिरम व हिरामण बहिरम हे दोघेही वीज पडून जखमी झाले. चांदवड तालुक्यातील साळसाणे येथेही विजेच्या कडकडाटाने कोसळलेल्या पावसामुळे सुदाम सूर्यभान जाधव यांची गाय वीज पडून मृत झाली, असाच प्रकार पेठ तालुक्यातील भाटविहरा येथील नारायण सोमा तुंगार यांचा बैल मृत्युमुखी पडला. दिंडोरी तालुक्यातीलच मौजे प्रिंप्रीअंचला येथील पंडित लक्ष्मण गावित यांच्या मालकीची गायदेखील विजेच्या धक्क्याने मरण पावली. निफाड तालुक्यातील विंचूर टाकळी येथे वादळी पावसाने सुरेश कारभारी मोरे यांच्या घराचे पत्रे उडून जवळच असलेल्या निंबाच्या झाडावर आदळले.