शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

रब्बी पिकांना विजेचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:25 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहेत.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहेत. भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात गेल्या काही दिवसापासून वीज गायब असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षी अपेक्षित पाऊस झाल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी चांगल्या प्रमाणात पिके घेतली आहेत. काही शेतकºयांच्या शेतात पाणी भरण्याच्या आत वीज गायब होत आहे. सध्या तापमानात वाढ झाल्याने रब्बीच्या पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच वीज वितरण कंपनीकडून विज पुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका नगदी पिकांना बसत आहेत. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. नांदूरशिंगोटे, दापूर, चास आदी भागात शनिवारी (दि.१) ला ९ तास वीज पुरवठा खंडीत होता. तर रविवारी सकाळी ९ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत वीज गायब होती. तसेच नळवाडी गावाला नांदूरशिंगोटे व चास येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जात आहे. परंतु गेल्या चार दिवसापासून या भागात केव्हाही वीज गायब होेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नळवाडी गावातील काही भागात सोनेवाडी भागातील वीजेची लाईन जोडल्याने या ंिठकाणी वीजपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचा आरोप नळवाडी ग्रामस्थांनी केला आहे. नळवाडी शिवारात २४ रोहित्र असून त्यापैकी ११ रोहित्र दुसरीकडे जोडण्याची मागणी तेथील शेतकºयांनी केली आहे. वीज पुरवठा खंडीत असल्याने येथील शेतक-यांनी नांदूरशिंगोटे कार्यालयात धाव घेवून आपले गाºहाणे मांडले. यावेळी माजी उपसरपंच सुदाम दराडे, दत्तात्रय दराडे, नितीन दराडे, निवृत्ती सानप, भागवत सहाणे, भाऊसाहेब दराडे, भारत दराडे, मच्छींद्र दराडे, बाळासाहेब दराडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.--------------चौकट- भोजापूर खोरे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहेत. विजेचा लंपडाव सुरू असल्याने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्याकरिता जाणाºया शेतक-यांमध्ये गीतीचे वातावरण तयार झाले आहे. नळवाडी शिवारात दिवसा कमी दाबाने विजपुरवठा होत असल्याने विजपंप सुरळीत चालत नाही. त्यामुळे त्याचा फटका रब्बी पिकांना बसत आहे.-सुदाम दराडे, माजी उपसरपंच, नळवाडी---------------------शनिवारी सिन्नरहून नांदूरशिंगोटे येणाºया विजवाहिनीच्या मुख्य वीजवाहक तारा तुटल्याने तसेच रविवारी सकाळी वीजेचा लोड वाढल्याने विज पुरवठा खंडीत झाला होता. रविवारी दुपारनतंर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. विजेचा दाब वाढू नये यासाठी प्रत्येक फिडर वाईज नियोजन करण्यात आले आहे.-आर. एस. भगत, सहाय्यक अभियंता.

टॅग्स :Nashikनाशिक