शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

रब्बी पिकांना विजेचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:25 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहेत.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहेत. भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात गेल्या काही दिवसापासून वीज गायब असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षी अपेक्षित पाऊस झाल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी चांगल्या प्रमाणात पिके घेतली आहेत. काही शेतकºयांच्या शेतात पाणी भरण्याच्या आत वीज गायब होत आहे. सध्या तापमानात वाढ झाल्याने रब्बीच्या पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच वीज वितरण कंपनीकडून विज पुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका नगदी पिकांना बसत आहेत. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. नांदूरशिंगोटे, दापूर, चास आदी भागात शनिवारी (दि.१) ला ९ तास वीज पुरवठा खंडीत होता. तर रविवारी सकाळी ९ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत वीज गायब होती. तसेच नळवाडी गावाला नांदूरशिंगोटे व चास येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जात आहे. परंतु गेल्या चार दिवसापासून या भागात केव्हाही वीज गायब होेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नळवाडी गावातील काही भागात सोनेवाडी भागातील वीजेची लाईन जोडल्याने या ंिठकाणी वीजपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचा आरोप नळवाडी ग्रामस्थांनी केला आहे. नळवाडी शिवारात २४ रोहित्र असून त्यापैकी ११ रोहित्र दुसरीकडे जोडण्याची मागणी तेथील शेतकºयांनी केली आहे. वीज पुरवठा खंडीत असल्याने येथील शेतक-यांनी नांदूरशिंगोटे कार्यालयात धाव घेवून आपले गाºहाणे मांडले. यावेळी माजी उपसरपंच सुदाम दराडे, दत्तात्रय दराडे, नितीन दराडे, निवृत्ती सानप, भागवत सहाणे, भाऊसाहेब दराडे, भारत दराडे, मच्छींद्र दराडे, बाळासाहेब दराडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.--------------चौकट- भोजापूर खोरे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहेत. विजेचा लंपडाव सुरू असल्याने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्याकरिता जाणाºया शेतक-यांमध्ये गीतीचे वातावरण तयार झाले आहे. नळवाडी शिवारात दिवसा कमी दाबाने विजपुरवठा होत असल्याने विजपंप सुरळीत चालत नाही. त्यामुळे त्याचा फटका रब्बी पिकांना बसत आहे.-सुदाम दराडे, माजी उपसरपंच, नळवाडी---------------------शनिवारी सिन्नरहून नांदूरशिंगोटे येणाºया विजवाहिनीच्या मुख्य वीजवाहक तारा तुटल्याने तसेच रविवारी सकाळी वीजेचा लोड वाढल्याने विज पुरवठा खंडीत झाला होता. रविवारी दुपारनतंर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. विजेचा दाब वाढू नये यासाठी प्रत्येक फिडर वाईज नियोजन करण्यात आले आहे.-आर. एस. भगत, सहाय्यक अभियंता.

टॅग्स :Nashikनाशिक