शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शहराला विजेचा झटका ; महावितरणच्या कारभाराविषयी  संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:33 IST

उन्हाची तीव्रता वाढत असतांना शहरात मात्र अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त आहे.

नाशिक : उन्हाची तीव्रता वाढत असतांना शहरात मात्र अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त आहे. शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत असताना विजेअभावी नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे याबाबत महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा करूनही शहरात असा प्रकार होत नसल्याचा पवित्रा या अभियंत्यांनी घेल्यामुळे रोष अधिकच निर्माण झाला आहे.दोन दिवसांपूर्वी नाशिकरोडमधील एका वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दोन ते अडीच तास नाशिकरोडचा वीजपुवठा खंडित झाला. त्यानंतरही या भागात अजूनही विस्कळीत वीजपुरवठा असून, खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नाशिक शहरातही सोमवारी दुपारपासून अनेकदा वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक भागांमध्ये जनरेटरचा वापर करावा लागला. सातत्याने जनरेटर सुरू करणे आणि वीजपुरवठा सुरळीत झाला की बंद करणे, अशी परेड करावी लागत होती.ग्राहकांना आपल्या कक्ष कार्यालयातच माहिती देण्याची व्यवस्था नसल्यामुळे ग्राहकांना कोणतीही माहिती मिळत नाही. तक्रार केंद्रे मुंबई स्थित आॅनलाइन केल्याने ग्राहकांचे समाधान होत नाही. यामुळे महावितरण आणि ग्राहकांमधील दरी वाढत आहे.महावितरणच्या कार्यालयात या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी अन्य एका अधिकाऱ्याला संपर्क साधण्यास सांगितले. संबंधित महाशयांना फोन केला असता कोणत्या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला, असा प्रतिप्रश्न त्यांनीच विचारला. सर्वकाही ऐकून घेतल्यानंतर त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला. टोल फ्री क्रमांकावरूनसंपर्क करूनही पलीकडील व्यक्तीला सर्वकाही माहिती आपणालाच द्यावी लागते. ग्राहकांच्या प्रश्नांबाबत नेहमीच उदासीनता दाखविली जाते. सोमवारीदेखील अनेकांना असाचा अनुभव आला.भारनियमन नसताना ‘वीज’गूलशहरात कुठेही भारनियमन नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला असला तरी वीजपुरवठा विस्कळीत होण्याचे मान्य करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडाचे प्रमाण वाढल्यामुळे काही भागांत वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. परंतु ग्राहकाला माहिती मिळण्याची व्यवस्थाच नसल्यामुळे ग्राहकांना मुकाटपणे वीज येण्याची वाट पाहावी लागते.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज