शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

विकासाच्या मुद्द्याभोवतीच रंगतेय निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:55 IST

कळवण विधानसभा मतदार- संघात यंदा कमालीची चुरस आहे. मैदानात चार उमेदवार असले तरी खऱ्या अर्थाने दुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. विकासाचा मुद्दा व बेरजेचे राजकारण कळीचे बनल्याने निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देकळवण-सुरगाणा: निवडणूक राग-रंगदुरंगी लढत : वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी बेरजेचे राजकारण

मनोज देवरेकळवण विधानसभा मतदार- संघात यंदा कमालीची चुरस आहे. मैदानात चार उमेदवार असले तरी खऱ्या अर्थाने दुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. विकासाचा मुद्दा व बेरजेचे राजकारण कळीचे बनल्याने निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे.यंदाच्या निवडणुकीत स्व. ए. टी. पवार यांची उणीव भासत आहे. गेली ४५ वर्ष ए. टी. पवार यांना विकासाच्या बळावर हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यात यश आले होते. मतदारांचेही त्यांना तितकेच सहकार्य मिळाले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत युती व आघाडी दुभंगल्याने मतविभागणीचा फटका पवार यांना बसला. गेल्या पाच वर्षांत मात्र विकासाचा वेग मंदावल्याने निवडणुकीत तोच मुद्दा प्रभावीपणे पुढे येताना दिसून येत आहे.यंदा पक्ष न पाहता विकासाचा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. पाच वर्षांत समाधानकारक विकासकामे झाली नसल्याचा मुद्दा विरोधकांनी ऐरणीवर आणला आहे. भाजपकडून इच्छुक राजेंद्र ठाकरे यांनी पक्षांतर करत मनसेकडून उमेदवारी केली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा, शिवसेना, मनसे अशी चौरंगी लढत दिसत असली तरी खरा सामना दुरंगी होत आहे.मतदारसंघात पुनंद प्रकल्पातून सटाणा शहर पाणी पुरवठा योजनेचे सुरु असलेले काम, ओतूर धरणाचा रेंगाळलेला प्रश्न, कळवण शहर व तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आदी मुद्द्यावर विरोधक एकवटले आहेत. विकासाच्या मुद्द्यावरूनच आमदार जे. पी. गावित यांना विरोधकांनी घेरलं आहे. त्यामुळे गावितांच्या दृष्टीने यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ए.टी. पवार यांच्या निधनानंतर नितीन पवार यांनी सूत्रे हाती घेत कळवण पंचायत समिती, नगरपंचायत, बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त केले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामे तसेच स्व. ए.टी. पवार यांची विकास पुरुष म्हणून असलेली प्रतिमा ही पवार यांची जमेची बाजू मानली जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक विकासाच्या प्रमुख मुद्द्यावरच लढविली जात आहे. रिंगणातील उमेदवारही विकासाच्या मुद्द्यावर भर देत असल्याने लढतीत कोणाची सरशी होते, हे येणारा काळच सांगणार आहे.मतदारसंघातीलकळीचे मुद्देयंदाच्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षात ठप्प झालेली कामे, ओतूर धरणाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश.४पुनंद प्रकल्पातून सटाणा शहर पाणी पुरवठा योजनेचे सुरु असलेले काम, योजना रद्द करण्यात आलेले अपयश, कळवण शहर व तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था आदी मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत.विकासाच्या मुद्दावर नेत्यांची दिलजमाईए. टी. पवार यांच्या कार्यकाळात झालेला विकासाचा मुद्दा यंदा प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच या मुद्््यावर काँग्रेस आघाडीमध्ये नेत्यांची दिलजमाई झाल्याचे चित्र दिसून येते. शिवाय कळवण शहरातील निर्णायक आघाडीही या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. कळवण, सुरगाणा या दोन तालुकामिळून मतदारसंघ बनला आहे. मात्र यंदा कळवणमधून भुमिपूत्राचाही मुद्दा प्रभावीपणे पुढे आणला जात आहे. त्यामुळे माकपच्या उमेदवाराच्या दृष्टीने लढत प्रतिष्ठेची आणि अतिशय चुरशीची बनली आहे.बदललेली समीकरणेया मतदार संघावर ए. टी. पवार यांचे अधिराज्य होते. मात्र गेल्या निवडणुकीत आघाडी आणि युती वेगवेगळे लढल्याने मतविभागणीचा फटका मोठ्या प्रमाणावरचा फटका पवार यांना बसल्याचे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.दोन वर्षांपूर्वी ए. टी. पवार यांचे निधन झाले. त्यातच गेल्या पाच वर्षात कळवण आणि सुरगाणा तालुक्यात समाधानकारक विकासकामे झाली नसल्याची मतदारराजाची भावना आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार संघात पाणी, रस्ते हे मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत.यावेळेच्या निवडणूकीत जनतेच्या मनात असणारा कौल आणि गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या घडामोडी यावरच विजयाचे गणित ठरणार आहे. कळवण आणि सुरगाणा या दोन्ही तालुक्यात विकासाचे कार्ड प्रभावी ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalwan-acकळवणNCPराष्ट्रवादी काँग्रेस