शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

विकासाच्या मुद्द्याभोवतीच रंगतेय निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:55 IST

कळवण विधानसभा मतदार- संघात यंदा कमालीची चुरस आहे. मैदानात चार उमेदवार असले तरी खऱ्या अर्थाने दुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. विकासाचा मुद्दा व बेरजेचे राजकारण कळीचे बनल्याने निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देकळवण-सुरगाणा: निवडणूक राग-रंगदुरंगी लढत : वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी बेरजेचे राजकारण

मनोज देवरेकळवण विधानसभा मतदार- संघात यंदा कमालीची चुरस आहे. मैदानात चार उमेदवार असले तरी खऱ्या अर्थाने दुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. विकासाचा मुद्दा व बेरजेचे राजकारण कळीचे बनल्याने निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे.यंदाच्या निवडणुकीत स्व. ए. टी. पवार यांची उणीव भासत आहे. गेली ४५ वर्ष ए. टी. पवार यांना विकासाच्या बळावर हा मतदारसंघ ताब्यात ठेवण्यात यश आले होते. मतदारांचेही त्यांना तितकेच सहकार्य मिळाले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत युती व आघाडी दुभंगल्याने मतविभागणीचा फटका पवार यांना बसला. गेल्या पाच वर्षांत मात्र विकासाचा वेग मंदावल्याने निवडणुकीत तोच मुद्दा प्रभावीपणे पुढे येताना दिसून येत आहे.यंदा पक्ष न पाहता विकासाचा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. पाच वर्षांत समाधानकारक विकासकामे झाली नसल्याचा मुद्दा विरोधकांनी ऐरणीवर आणला आहे. भाजपकडून इच्छुक राजेंद्र ठाकरे यांनी पक्षांतर करत मनसेकडून उमेदवारी केली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा, शिवसेना, मनसे अशी चौरंगी लढत दिसत असली तरी खरा सामना दुरंगी होत आहे.मतदारसंघात पुनंद प्रकल्पातून सटाणा शहर पाणी पुरवठा योजनेचे सुरु असलेले काम, ओतूर धरणाचा रेंगाळलेला प्रश्न, कळवण शहर व तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आदी मुद्द्यावर विरोधक एकवटले आहेत. विकासाच्या मुद्द्यावरूनच आमदार जे. पी. गावित यांना विरोधकांनी घेरलं आहे. त्यामुळे गावितांच्या दृष्टीने यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ए.टी. पवार यांच्या निधनानंतर नितीन पवार यांनी सूत्रे हाती घेत कळवण पंचायत समिती, नगरपंचायत, बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त केले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामे तसेच स्व. ए.टी. पवार यांची विकास पुरुष म्हणून असलेली प्रतिमा ही पवार यांची जमेची बाजू मानली जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक विकासाच्या प्रमुख मुद्द्यावरच लढविली जात आहे. रिंगणातील उमेदवारही विकासाच्या मुद्द्यावर भर देत असल्याने लढतीत कोणाची सरशी होते, हे येणारा काळच सांगणार आहे.मतदारसंघातीलकळीचे मुद्देयंदाच्या निवडणुकीत गेल्या पाच वर्षात ठप्प झालेली कामे, ओतूर धरणाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश.४पुनंद प्रकल्पातून सटाणा शहर पाणी पुरवठा योजनेचे सुरु असलेले काम, योजना रद्द करण्यात आलेले अपयश, कळवण शहर व तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था आदी मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत.विकासाच्या मुद्दावर नेत्यांची दिलजमाईए. टी. पवार यांच्या कार्यकाळात झालेला विकासाचा मुद्दा यंदा प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच या मुद्््यावर काँग्रेस आघाडीमध्ये नेत्यांची दिलजमाई झाल्याचे चित्र दिसून येते. शिवाय कळवण शहरातील निर्णायक आघाडीही या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. कळवण, सुरगाणा या दोन तालुकामिळून मतदारसंघ बनला आहे. मात्र यंदा कळवणमधून भुमिपूत्राचाही मुद्दा प्रभावीपणे पुढे आणला जात आहे. त्यामुळे माकपच्या उमेदवाराच्या दृष्टीने लढत प्रतिष्ठेची आणि अतिशय चुरशीची बनली आहे.बदललेली समीकरणेया मतदार संघावर ए. टी. पवार यांचे अधिराज्य होते. मात्र गेल्या निवडणुकीत आघाडी आणि युती वेगवेगळे लढल्याने मतविभागणीचा फटका मोठ्या प्रमाणावरचा फटका पवार यांना बसल्याचे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.दोन वर्षांपूर्वी ए. टी. पवार यांचे निधन झाले. त्यातच गेल्या पाच वर्षात कळवण आणि सुरगाणा तालुक्यात समाधानकारक विकासकामे झाली नसल्याची मतदारराजाची भावना आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार संघात पाणी, रस्ते हे मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत.यावेळेच्या निवडणूकीत जनतेच्या मनात असणारा कौल आणि गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या घडामोडी यावरच विजयाचे गणित ठरणार आहे. कळवण आणि सुरगाणा या दोन्ही तालुक्यात विकासाचे कार्ड प्रभावी ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalwan-acकळवणNCPराष्ट्रवादी काँग्रेस