शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

अवघ्या सेाळा दिवसात अठराशे कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:13 AM

कोराेनामुळे शहरात बाधितांची संख्या वाढते आहे, तसे मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. १ एप्रिल पासूनचा आढावा घेतला तर सरासरी ...

कोराेनामुळे शहरात बाधितांची संख्या वाढते आहे, तसे मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. १ एप्रिल पासूनचा आढावा घेतला तर सरासरी तीस जणांचे बळी जात आहेत त्यात नाशिक शहरातील बळींची संख्या काही प्रमाणात कमी असली तरी नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातून तसेच धुळे, जळगाव, नगर, नंदूरबार तसेच पालघरसारख्या ठिकाणहून रूग्ण येतात. येथील आरोग्य सुविधा तेथील सुविधांच्या तुलनेत जास्त असल्याने दीडशे- दोनशे किलोमीटर लांब जाऊनही आपल्या कुटूंबातील व्यक्ती वाचला पाहिजे या अपेक्षेने ते येतात आणि रूग्णाचा मृत्यू झाला तर संसर्ग वाढू नये यासाठी नाशिकमध्येच अंत्यसंस्कार करतात. नाशिकमधून पुणे किंवा मुंबईला उपचारासाठी नेलेल्या रूग्णाचा तेथे मृत्यू झाला तरी त्या व्यक्तीला देखील नाशिकमध्येच आणून अंत्यसंस्कार केलेे जातात. त्यामुळे नाशिक शहरातील चारही अमरधामचे बेड फुल असतात. सहाजिकच वेटिंग सुध्दा कायम असते.

नाशिक महापालिकेच्या पाच विभागातील अमरधामचा विचार केला तर १ ते १६ एप्रिल या कालावधीत २ हजार ३६० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यात १ हजार ७९३ कोरोना बाधीत तर ५६७ अन्य आजाराने मृत्यू पावलेल्यांचा समावेश आहे.

इन्फो..

नाशिक शहरातील चारही अमरधाममध्ये १६ दिवसात करण्यात आलेले अंत्यसंस्कार

(ग्राफसाठी)

नाशिक पूर्व

कोरोना बाधितांचे मृत्यू- ५४५

अन्य आजाराने मृत्यू- १०८

--

पंचवटी विभाग

काेरोना बाधितांचे मृत्यू- ४९४

अन्य आजाराने मृत्यू- १८६

--

नाशिकरोड विभाग

कोरोना बाधितांचे मृत्यू- ३९०

सामान्य आजाराने मृत्यू- ४४

----

सिडको विभाग

केारोना बाधितांचे मृत्यू- ३१२

---

सातपूर विभाग

कोरोना बाधितांचे मृत्यू- ५२

अन्य आजाराने मृत्यू- ५१

...कोट...

नाशिक शहराबरोबरच अन्य ग्रामीण भागातील मृतदेह देखील नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी येतात. ग्रामीण भागात स्मशानभूमी असूनही तेथे विद्युत किंवा गॅस दाहीनी नसल्याने अनेक गावातून मृतदेह नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. त्यामुळे नाशिक आणि पंचवटी अमरधामवर प्रचंड ताण येत आहे.

- डॉ. कल्पना कुटे, संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग

अन्य आजाराने मृत्यू- १७८