शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कवडीमोल दरामुळे शेतातच तोडून टाकली वांगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 19:12 IST

मानोरी : कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल या आशेने अनेक शेतकरी वर्गाने शेती व्यवसायाला जोडून भाजीपाला उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जात असतानाच येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी आप्पा गोधडे यांनी देखील पन्नास हजार रुपये खर्चून आपल्या शेतात वांग्याचे भरघोस उत्पादन घेतले, मात्र या वांग्यांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने मिळणाऱ्या दरातून साधा उत्पादन खर्च फिटणे देखील दुरापास्त झाल्याने गोधडे यांनी बैंगळ वांगी शेतातच तोडून टाकून देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देवांगी शेतातच तोडून टाकून देत तीव्र नाराजी व्यक्त केली

मानोरी : कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल या आशेने अनेक शेतकरी वर्गाने शेती व्यवसायाला जोडून भाजीपाला उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जात असतानाच येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी आप्पा गोधडे यांनी देखील पन्नास हजार रुपये खर्चून आपल्या शेतात वांग्याचे भरघोस उत्पादन घेतले, मात्र या वांग्यांना बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने मिळणाऱ्या दरातून साधा उत्पादन खर्च फिटणे देखील दुरापास्त झाल्याने गोधडे यांनी बैंगळ वांगी शेतातच तोडून टाकून देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दोन महिन्यांपूर्वी कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात रोपांची वानवा भासत असल्याने आप्पा गोधडे यांनी पर्याय म्हणून आपल्या २० गुंठे शेतीची मशागत करून एक्सपोर्ट क्वालिटी वाणाच्या वांग्याच्या रोपांची निवड करून लागवड केली. २० गुंठ्यासाठी सुमारे १५०० वांग्याची रोपे खरेदी केली. लागवड करते वेळी पाण्याची शास्वती नसल्याने मल्चिंग पेपरचे आच्छादन करून दोन फूट अंतरावर वांगे लावण्यात आले. वातावरणात बदल होत असताना देखिल गोधडे यांनी सातत्याने वांग्यांवर औषध फवारणी करून वांग्याची रोपे जागवली होती.दरम्यान मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून वांगे तोडण्यास सुरुवात केल्यानंतर वांगे बाजारात विक्रीसाठी नेले असता सुरुवातीला वांग्याच्या प्रति एक क्रेट्सला ५० ते ७० रुपयांचा भाव मिळाला होता. मात्र आज ना उद्या आपल्या वांग्यांना चांगला भाव मिळेल अशी शास्वती असताना वांगे देखील दर्जेदार असल्याने चांगले उत्पादन निघाले मात्र भावात सातत्याने घसरण सुरुच राहिली. लासलगाव, विंचूर, येवला, पाटोदा, मुखेड आदींसह आठवडे बाजारसह मुख्य बाजारात वांग्याच्या प्रति क्रेटसला २० रुपयांपासून भाव मिळू लागल्याने गोधडे यांना झालेला खर्च भरून निघणे देखील यातून दुरापास्त झाले असून त्यांनी 20 गुंठे वांग्यासाठी पन्नास हजार रुपये खर्चून केवळ पाच हजार रुपयांपर्यंत उत्पन्न निघाले असल्याने झालेला खर्च फिटणार कसा ? या चिंतेतते सापले आहे.कांदा लागवडीसाठी रोपे मिळत नसल्याने मी माझ्या २० गुंठे शेतात वांगे लावले होते. वांग्याला ५० हजार रुपये खर्च केल्यानंतर मागील काही दिवसांपासून वांगे बाजारात विक्रीसाठी नेत असून बाजारात एका क्रेटसला २० रुपये भाव मिळत असल्याने यातून माझा साधा उत्पादन खर्च देखील फिटणार नाही.- आप्पा गोधडे, शेतकरी, पिंपळगाव लेप. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी