शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:42 PM

नाशिक : सुरुवातीच्या काळात विशिष्ट वस्तूंसाठी ठरावीक ठिकाणे प्रसिद्ध होती. आता काळानुरूप छोट्या-मोठ्या गावांत टोलेजंग शोरूम्स उभी राहिली आहेत. तालुकास्तरावर आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रातील बाजारपेठा विकसित होण्याचा वेग पाहता नाशिकच्या मार्केटमध्ये अजूनही उणिवा जाणवतात. लोकांची बदलती जीवनशैली व वाढत्या क्रयशक्तीचा विचार करता आगामी दशकात काळाची पावले ओळखून नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नाशिकच्या मातीशी एकजीव झालेल्या व्यावसायिकांनी नोंदविले.

ठळक मुद्देशहरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक मॉल्सच्या संचालकांचे मत

नाशिक : सुरुवातीच्या काळात विशिष्ट वस्तूंसाठी ठरावीक ठिकाणे प्रसिद्ध होती. आता काळानुरूप छोट्या-मोठ्या गावांत टोलेजंग शोरूम्स उभी राहिली आहेत. तालुकास्तरावर आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रातील बाजारपेठा विकसित होण्याचा वेग पाहता नाशिकच्या मार्केटमध्ये अजूनही उणिवा जाणवतात. लोकांची बदलती जीवनशैली व वाढत्या क्रयशक्तीचा विचार करता आगामी दशकात काळाची पावले ओळखून नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नाशिकच्या मातीशी एकजीव झालेल्या व्यावसायिकांनी नोंदविले."लोकमत"च्या नाशिक आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या अनुषंगाने शहरातील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक मॉल्सच्या संचालकांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी त्यांनी उपरोक्त अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी आयोजित चर्चेत साखला फर्निचर मॉलचे संचालक नंदकिशोर साखला, आर्टलाइन फर्निचरचे संचालक प्रेम नंदवाणी, पारख अप्लायन्सचे संचालक रवी पारख, फर्निचर किंगचे संचालक शंकर अग्रवाल, इंट्रो फर्निचरचे संचालक शिरीष वाबळे, डिझायर सोफा मॉलचे संचालक केजेश सत्रा व आर्टलाइन फॅशनचे संचालक महेंद्र नंदवाणी सहभागी झाले होते. ह्यलोकमतह्णचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी उपस्थितांचे स्वागत करून चर्चेत भाग घेतला.कोरोनाने लॉकडाऊन काळात प्रत्येकाला घरात सक्तीने बंदिस्त केल्यामुळे लोकांचा स्वत:कडे, तसेच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. लोक स्मार्ट होत चालले असून, ज्यांना खरोखर काही खरेदी करायचे तेच घराबाहेर पडत आहेत. ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेचा विचार करता मुंबई, पुण्यात मिळणाऱ्या वस्तू नाशिकमध्ये कशा उपलब्ध होतील यावर विचार करणे आवश्यक असल्याचा सूरही या चर्चेत उमटला. यावेळी ऑनलाइन मार्केटिंग तसेच भाडेतत्त्वावर मिळणाऱ्या वस्तूंच्या उपलब्धतेबाबतही चर्चा करण्यात आली.स्पर्धेसोबत उलाढालही वाढलीपूर्वी दुकानांची संख्या मर्यादित होती. अल्प विक्रीत विक्रेता आणि ग्राहकही खुश होते. विक्रेता जी वस्तू दाखवायचा व सुचवायचा त्यावर विश्वास ठेवून ग्राहक खरेदी करायचे. आता वस्तूंमध्ये आलेल्या नावीन्यामुळे आणि अर्थपुरवठा करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने ग्राहक जागरूक झालेला असून, त्याची अभिरुचीही बदललेली आहे. त्यामुळे ग्राहक मागेल ते आता पुरवावे लागते. प्रारंभी नानाविध फर्निचर व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे या गोष्टी फक्त श्रीमंतांच्या असतात असा समज होता. आता त्या सर्वांसाठी दैनंदिन गरजेच्या भाग बनल्या आहेत. त्यामुळे व्यवसायामध्ये स्पर्धा वाढलेली असली तरी त्या तुलनेने उलाढालही वाढल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Marketबाजारbusinessव्यवसाय