शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 16:44 IST

नाशिक : सुरुवातीच्या काळात विशिष्ट वस्तूंसाठी ठरावीक ठिकाणे प्रसिद्ध होती. आता काळानुरूप छोट्या-मोठ्या गावांत टोलेजंग शोरूम्स उभी राहिली आहेत. तालुकास्तरावर आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रातील बाजारपेठा विकसित होण्याचा वेग पाहता नाशिकच्या मार्केटमध्ये अजूनही उणिवा जाणवतात. लोकांची बदलती जीवनशैली व वाढत्या क्रयशक्तीचा विचार करता आगामी दशकात काळाची पावले ओळखून नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नाशिकच्या मातीशी एकजीव झालेल्या व्यावसायिकांनी नोंदविले.

ठळक मुद्देशहरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक मॉल्सच्या संचालकांचे मत

नाशिक : सुरुवातीच्या काळात विशिष्ट वस्तूंसाठी ठरावीक ठिकाणे प्रसिद्ध होती. आता काळानुरूप छोट्या-मोठ्या गावांत टोलेजंग शोरूम्स उभी राहिली आहेत. तालुकास्तरावर आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रातील बाजारपेठा विकसित होण्याचा वेग पाहता नाशिकच्या मार्केटमध्ये अजूनही उणिवा जाणवतात. लोकांची बदलती जीवनशैली व वाढत्या क्रयशक्तीचा विचार करता आगामी दशकात काळाची पावले ओळखून नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नाशिकच्या मातीशी एकजीव झालेल्या व्यावसायिकांनी नोंदविले."लोकमत"च्या नाशिक आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या अनुषंगाने शहरातील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक मॉल्सच्या संचालकांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी त्यांनी उपरोक्त अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी आयोजित चर्चेत साखला फर्निचर मॉलचे संचालक नंदकिशोर साखला, आर्टलाइन फर्निचरचे संचालक प्रेम नंदवाणी, पारख अप्लायन्सचे संचालक रवी पारख, फर्निचर किंगचे संचालक शंकर अग्रवाल, इंट्रो फर्निचरचे संचालक शिरीष वाबळे, डिझायर सोफा मॉलचे संचालक केजेश सत्रा व आर्टलाइन फॅशनचे संचालक महेंद्र नंदवाणी सहभागी झाले होते. ह्यलोकमतह्णचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी उपस्थितांचे स्वागत करून चर्चेत भाग घेतला.कोरोनाने लॉकडाऊन काळात प्रत्येकाला घरात सक्तीने बंदिस्त केल्यामुळे लोकांचा स्वत:कडे, तसेच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. लोक स्मार्ट होत चालले असून, ज्यांना खरोखर काही खरेदी करायचे तेच घराबाहेर पडत आहेत. ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेचा विचार करता मुंबई, पुण्यात मिळणाऱ्या वस्तू नाशिकमध्ये कशा उपलब्ध होतील यावर विचार करणे आवश्यक असल्याचा सूरही या चर्चेत उमटला. यावेळी ऑनलाइन मार्केटिंग तसेच भाडेतत्त्वावर मिळणाऱ्या वस्तूंच्या उपलब्धतेबाबतही चर्चा करण्यात आली.स्पर्धेसोबत उलाढालही वाढलीपूर्वी दुकानांची संख्या मर्यादित होती. अल्प विक्रीत विक्रेता आणि ग्राहकही खुश होते. विक्रेता जी वस्तू दाखवायचा व सुचवायचा त्यावर विश्वास ठेवून ग्राहक खरेदी करायचे. आता वस्तूंमध्ये आलेल्या नावीन्यामुळे आणि अर्थपुरवठा करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने ग्राहक जागरूक झालेला असून, त्याची अभिरुचीही बदललेली आहे. त्यामुळे ग्राहक मागेल ते आता पुरवावे लागते. प्रारंभी नानाविध फर्निचर व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे या गोष्टी फक्त श्रीमंतांच्या असतात असा समज होता. आता त्या सर्वांसाठी दैनंदिन गरजेच्या भाग बनल्या आहेत. त्यामुळे व्यवसायामध्ये स्पर्धा वाढलेली असली तरी त्या तुलनेने उलाढालही वाढल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Marketबाजारbusinessव्यवसाय