शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

कार्य कर्तृत्वाने अटलजींचा सर्वसामान्यांवर प्रभाव : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:16 IST

संपूर्ण देशात खेडोपाडी भारतीय जनता पक्ष पोहचविण्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सिंहाचा वाटा आहे. मात्र पार्टीपेक्षा देश मोठा हे अटलजींनी आपल्या कार्यातून अनेकवेळा दाखवून दिले आहे,

नाशिकरोड : संपूर्ण देशात खेडोपाडी भारतीय जनता पक्ष पोहचविण्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सिंहाचा वाटा आहे. मात्र पार्टीपेक्षा देश मोठा हे अटलजींनी आपल्या कार्यातून अनेकवेळा दाखवून दिले आहे, आपल्या कार्य कर्तृत्वामुळे अटलजींचा सर्वसामान्यांवर मोठा प्रभाव होता, असे प्रतिपादन भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.  मोटवानीरोड उत्सव मंगल कार्यालयात सर्वपक्षीयांच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत बोलताना भंडारी म्हणाले की, गेली ६०-६२ वर्ष अटलजींनी राजकारण केले. गेल्या १०-१२ वर्षांपासून अटलजी सामाजिक जीवनापासून अलिप्त राहूनसुद्धा त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकाकुल झाला हा मोठेपणा सहजासहजी कोणाला लाभत नाही, असे भंडारी यांनी सांगितले. यावेळी राष्टय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह प्रदीप केतकर, नगरसेवक संभाजी मोरूस्कर, प्रशांत दिवे, आशा तडवी, अशोक सातभाई, सुभाष घिया, अस्लम मणियार, रामू जाधव, प्रमोद बागुल, विक्रम कदम, रवींद्र मालुंजकर, रोहन देशपांडे, शाम गोहाड आदिंनी श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालन अंबादास कुलकर्णी यांनी केले. शोकसभेला प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक शरद मोरे, दिनकर आढाव, सूर्यकांत लवटे, डॉ. सीमा ताजणे, मीरा हाडगे, अंबादास पगारे, योगेश भगत, संजय घुले, गजानन तितरे, अ‍ॅड. सुहास पाठक, सुहास बिडवई, रमेश औटे, उन्मेष गायधनी समीर शेख, राजेंद्र ताजणे, ज्ञानेश्वर भोसले आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी