शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

कोरोनावर पारंपरिक औषधांनीही प्रभावी उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:23 IST

नाशिक - कोरोना संसर्ग झाला की रुग्ण आणि त्याचे नातेवाईक घाबरून जातात आणि तत्काळ रुग्णालयाचा शोध सुरू करतात. मात्र भावनावश न होता योग्य पद्धतीने निदान करून उपचाराची दिशा ठरवा. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणेच आयुर्वेद आणि होमिओपॅथीतही यावर अनेक उपचार आहेत. त्यांचाही वापर करून घ्यावा. अचूक उपचार झाल्यास कोणत्याही प्रकारे धावपळ न करताही रुग्ण बरे होऊ शकतात, असे मत नाशिकमधील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देतज्ज्ञांचे मत : न घाबरता सामना केल्यास बरे होणे शक्य

नाशिक - कोरोना संसर्ग झाला की रुग्ण आणि त्याचे नातेवाईक घाबरून जातात आणि तत्काळ रुग्णालयाचा शोध सुरू करतात. मात्र भावनावश न होता योग्य पद्धतीने निदान करून उपचाराची दिशा ठरवा. आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणेच आयुर्वेद आणि होमिओपॅथीतही यावर अनेक उपचार आहेत. त्यांचाही वापर करून घ्यावा. अचूक उपचार झाल्यास कोणत्याही प्रकारे धावपळ न करताही रुग्ण बरे होऊ शकतात, असे मत नाशिकमधील तज्ज्ञांनी व्यक्त केले.शहरात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने नागरिकांनी मुळातच दक्षता घ्यावी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासह संसर्ग होऊ नये यासाठी महापौर सतीश कुलकर्णी हे पारंपरिक वैद्यकशास्त्राच्या उपचार पद्धतीचे पालन करावे यासाठी आग्रही असून त्या संदर्भात गुरुवारी तज्ज्ञांसमवेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ही माहिती तज्ज्ञांनी दिली. कोरोना संसर्ग झाल्यानंतर बेड मिळण्यापासून औषध आणि उपचाराच्या अनेक समस्या उदभवतात. त्यातही महापालिकेसारखी यंत्रणा संपूर्ण क्षमतेनिशी झटत असली तरी त्यांनाही मर्यादा आहेत; त्यामुळेच संसर्ग होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन महापौरांनी केले.मुळात कोणत्याही चिकित्सा प्रणालीशी कोणाचीही स्पर्धा नाही. मात्र सहजसुलभ पद्धतीने प्रतिकारशक्ती वाढवण्याचे आणि उपचाराचे प्रयत्न असल्याचे या तज्ज्ञांनी सांगितले. डॉ. सचिन पाटील यांनी पतंजलीविषयी असलेल्या गैरसमजांचे खंडन केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील उपस्थित होते.कोरोना संसर्ग झाला की लगेचच रुग्णाला घाबरवून सोडल्यास त्याच्यावरील तणाव वाढतो. त्याचा श्वसनावर तसेच फुप्फुसांवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे न घाबरता परिस्थितीला सामोरे जा. होमिओपॅथीतदेखील कोरोनावर उपचार करता येतात; तसेच त्यातून रुग्णदेखील बरे होतात. गेल्या वर्षी असेर्निक अल्बमच्या गोळ्या लाखो लोकांनी घेतल्या. त्यांनादेखील त्याचा फायदा झाला.- डॉ. आशर शेख, होमिओपॅथी तज्ज्ञपूर्वदक्षता (प्रिव्हेंशन), हायरिस्क, कोविड पॉझिटिव्ह आणि पोस्ट कोविड असे या संदर्भातील चार टप्पे आहेत. होमिओपॅथीत त्याचे उपचार असून त्यातील डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या घेतल्यानंतर फुप्फुसातील संसर्ग कमी होऊन बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. ९८ टक्के प्रकरणांत रुग्णालयात न जाता घरीच उपचार घेऊन रुग्ण बरा होऊ शकतो.- डॉ. योगेश धोंगडे, होमिओपॅथी तज्ज्ञउन्हाळा असल्याने थंड पदार्थांकडे ओढा असला तरी आइस्क्रीम, शीतपेये यासारख्या पदार्थांमुळे घशात अत्यंत थंड होते आणि ते कोरोनासारख्या विषाणूला पोषक ठरते; त्यामुळे या काळात फ्रिज डिस्टन्सिंगदेखील केले पाहिजे. जलनेती नियमित केल्यास संसर्ग टळू शकतो. त्यामुळे ती नियमितपणे केली पाहिजे.- डॉ. अभिनव मुठे, आयुर्वेदाचार्यकोरोना उपचाराबद्दल माझे संशोधन झाले आहे. संसर्ग झाल्यानंतर ताप आल्यास तो तत्काळ कमी होण्यासाठी गोळ्या-औषधे घेतली जातात. तसे न करता तापाचे सुयोग्य नियमन केले पाहिजे. होमिओपॅथीत हेच केले जाते. अत्यंत साध्या उपचाराने कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला आहे.- डॉ. फराज मोतीवाला, होमिओपॅथ तज्ज्ञसदोष श्वसन हे खरे आजाराचे मूळ असून त्यामुळे फुप्फुसाचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे योग्य श्वसनाबरोबरच प्राणायाम आणि कपालभाती नियमित करणे आवश्यक आहे.- राज सिन्नरकर, योगतज्ज्ञ.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल