शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:07 IST

‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असा नारा जगप्रसिद्ध विचारवंत व कामगार चळवळीच जनक कार्ल मार्क्स यांनी १९व्या शतकाच्या प्रारंभी दिला. त्यानंतर कामगार चळवळ जगभरात पसरली.

जागतिक  कामगार दिन

नाशिक : ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असा नारा जगप्रसिद्ध विचारवंत व कामगार चळवळीच जनक कार्ल मार्क्स यांनी १९व्या शतकाच्या प्रारंभी दिला. त्यानंतर कामगार चळवळ जगभरात पसरली. परंतु सुमारे १०० वर्षांनंतरही कामगारांच्या जीवनमानात फारशी सुधारणा झालेली नाही. आपल्या देशात कामगारांसाठी अनेक कामगार कायदे असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे मत कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये कामगारांचे शोषण सुरूच आहे, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कामगारांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. तसेच केंद्र सरकारने कामगारांचे ४४ कायदे रद्द करून त्यांच्यावर अन्यायच केला आहे, असा आरोपही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.भारतात सर्व क्षेत्रातील कामगारांचे जीवनमान अद्यापही खालावलेले दिसते. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात मोठा विकास झाला. परंतु उद्योग धंद्यातील कामगारांना अद्यापही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जगातील कामगार चळवळीनंतर १ मे १८९१ रोजी युरोपात व अमेरिकेत पहिला कामगार दिन साजरा झाला. तर भारतात १ मे १९२३ रोजी पहिला कामगार दिन साजरा करण्यात आला. या दिनी विविध क्षेत्रातील कामगारांचा गौरव करण्यात येतो.कामगार दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमीयुरोप व अमेरिकेत १९व्या शतकाच्या प्रारंभी सरंजामशाहीनंतर औद्योगिकीकरण वाढल्याने कारखान्यांमध्ये कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असे. कामगारांना यंत्रावर १८ ते २० तास काम करावे लागत होते. त्यामुळे कार्ल मार्क, फेड्रिक ऐग्लस यांच्यासह अनेक कामगार नेत्यांनी कामगारांच्या शोषणाविरुद्ध लढा उभारला. कामगार केवळ आठ तास काम करतील यासाठी आंदोलन करण्यात आले. दि. १ मे १८८६ रोजी शिकागो शहरात जगभरातील कामगार एकत्र आले. यावेळी कामगार आंदोलन चिरडून टाकण्यासाठी गोळीबार करण्यात आला. यात पाच कामगारांचा मृत्यू झाला त्या दिवसापासून १ मे हा कामगार दिन म्हणून पाळण्यात येतो.आम्ही सर्व कामगार संघटनांच्या वतीने सरकारला १२ मागण्यांचे निवेदन दिले असून, त्यात प्रामुख्याने तीन मागण्यांचा समावेश आहे. सर्व कामगारांना १८ हजार रुपये किमान वेतन मिळावे, कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे, कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, या तीन मागण्यांसह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. परंतु सरकारने याबाबत कुठलीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे कामगारांचे शोषण सुरूच आहे.- डॉ. डी. एल. कराड, राष्ट्रीय उपाध्यक्ष, सीटूशासनाच्या अनेक योजनांचा कामगारांना फायदा होत नाही. कारण शासनाकडून कामगारांच्या मूलभूत समस्यांचा आणि प्रलंबित प्रश्नांचा कधी विचारच केला जात नाही. नियमानुसार कामगार कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांची आर्थिक परिस्थिती वर्षानुवर्ष खालावलेलीच दिसते. कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.  - आबा महाजन, सरचिटणीस,  भारतीय कामगार सेनागेल्या शंभर वर्षांत जगभरात कामगारांचे शोषण कमी होण्याऐवजी वाढलेच आहे. आपल्या देशातदेखील कामाचे केवळ आठ तास असताना कारखानदार कामगारांकडून कमी वेतनात जादा काम करून घेतात. कामगारांना २५ हजार रुपये वेतन देण्याऐवजी केवळ दहा हजार रुपये वेतनावर काम करून घेण्यात येते. त्यांच्या हितसंरक्षण होत नाही. त्यामुळे सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. केंद्रातील मोदी सरकारने कामगारांचे ४४ कायदे रद्द करून त्यांच्यावर अन्यायच केला आहे.  - श्रीधर देशपांडे,  ज्येष्ठ कामगार नेतेकामगारांसाठी शासनाचे अनेक कामगार कायदे केले असून, याची अंमलबजावणी होत नाही. विशेष माथाडी कामगारांसाठी या कामगार कायद्याचा फायदा होत नाही. अनेक कंपनींमध्ये असे कायदे लागू असतानाही त्याचा लाभ माथाडी कामगारांना मिळत नाही. त्यामुळे अशा कामगारांना त्याचा लाभ मिळावा. - पवन मटाले, शहर प्रमुख, भारतीय माथाडी कामगार सेना

 

टॅग्स :NashikनाशिकEmployeeकर्मचारी