शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांना नाशिकभूषण पुरस्कार

By admin | Updated: April 13, 2015 01:27 IST

अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांना नाशिकभूषण पुरस्कार

नाशिक : अर्थशास्त्र हे मानवी समूहाच्या वागण्याच्या गृहीतकांवर आधारित आहे. त्याचा आधार घेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाद्वारे समूहाचे मन बदलण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कारण गृहीतके सदासर्वकाळ सारखी नसतात. आता मानवी समूहाचे मन बदलण्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची गरज असल्याचे मत उद्योगपती राम भोगले यांनी व्यक्त केले. रोटरी क्लबच्या वतीने देण्यात येणारा नाशिकभूषण पुरस्कार प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांना त्यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले, सरकार आणि अर्थतज्ज्ञ दरवर्षी अर्थसंकल्पात कररचना बदलून देशातील नागरिकांचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करतात. परंतु अर्थशास्त्राचे नियम जर मानवी समूहाच्या गृहीतकांवर आधारित असतील, तर ते सदासर्वकाळ यथार्थ ठरतील याची शाश्वती नाही. यासाठी अर्थतज्ज्ञांनीच आता समूहाचे वर्तन बदलण्यासाठी वेगळा मार्ग शोधून काढण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. गोविलकरांसारख्या तज्ज्ञांनी तो जरूर करावा हे सांगतानाच भोगले यांनी गोविलकरांच्या कार्याचा गौरव केला. संघाचे काम करण्यात जेव्हा अनेक अडचणी होत्या अशा काळात गोविलकरांनी रुग्णालयासारखे मोठे काम उभे केले. त्यासाठी समाजाचीही त्यांना साथ लाभली. समाजसेवा करणारे स्वयंघोषित अनेक असतात, परंतु समाजानेही गोविलकरांमधील गुण ओळखूनच त्यांना साथ दिल्याचे भोगले म्हणाले. दीपप्रज्वलन आणि श्याम दशपुत्रे यांनी सादर केलेल्या ईशस्तवनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. रोटरीचे अध्यक्ष मधुकर फटांगरे यांनी स्वागत केले. रतन भंडारी यांनी नाशिकभूषण पुरस्कारामागची भूमिका विशद केली. यानंतर उद्योजक राम भोगले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गोविलकर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रेखा पटवर्धन, बाळासाहेब जोशी, दत्तात्रेय माळोदे, विजय दिनानी, रतन भंडारी, आप्पासाहेब पवार, नीलिमाताई पवार आदि उपस्थित होते. रंजना पाटील आणि रवींद्र शिवदे यांनी सूत्रसंचालन, तर दत्तात्रेय माळोदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)