शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील अर्थकारण ठप्प

By admin | Updated: November 12, 2016 22:47 IST

बाजारपेठा थंडावल्या : ५००, १००० च्या नोटा बंद झाल्याचा परिणाम

 कळवण : ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा परिणाम शहरातील बुधवारच्या आठवडे बाजारात दिसून आला. त्यानंतर गुरुवार , शुक्र वार व शनिवारीदेखील कळवण, अभोणा व कनाशी येथील बाजारपेठेतही स्थिती जैसे थी होती. व्यापारी व व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार यांनी दर्शनी भागावरच ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असे फलक लावल्याने ग्राहकांची मोठी कोंडी झाली होती. सुट्टे पैसे घेऊन या असे फर्मान दुकानदारांकडून सोडले जात असल्याने सर्वसामान्य ग्राहक व दुकानदार असलेला व्यापारी मोदी सरकारच्या निर्णयामुळे चांगलाच मेटाकुटीस आला आहे.उधारीत घेऊन जा, पण ५०० व १००० रु पयांची नोट नको. भले पैसे देऊ नका उधारीत घेऊन जा, अशी सामाजिक बांधिलकी ग्रामीण व आदिवासी भागात यातून दिसून येत आहे. कळवण शहरात काही टक्केवारीच्या अपेक्षेने व्यावसायिक छोट्या व्यावसायिकांना आमिष दाखवून उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कळवण शहरातील मेनरोड व व्यापारी पेठेत नेहमी वर्दळ असते. मात्र आज या उलट चित्र मेनरोड व बाजारपेठेत दिसून आले. मेनरोड व बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत असल्याने त्याचा व्यवहारावर परिणाम झाला आहे. गेल्या मंगळवारी हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्याने याचा सर्वाधिक फटका ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला सोसावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शुक्रवारपासून नवीन नोटा चलनात आल्या असून, एटीएम सुरू होणार असल्याने शुक्र वारी व शनिवारी मोठ्या अपेक्षेने ग्रामीण भागातील नागरिक कळवण शहरात आले होते. मात्र शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकेच्या दरवाजाला आतील गर्दीमुळे कुलूप, त्याच्यासमोर लांबच लांब लागलेल्या रांगा दिसून आल्या. शिवाय पॅनकार्ड नसल्याने अनेकांना माघारी फिरावे लागले. एकंदरीत जुन्या नोटा बंद झाल्याने तसेच नव्या नोटा चलनात आल्याने ग्रामीण भागातील अर्थकारण ठप्प झाल्याचे दिसून आले.पतसंस्थाचा नकार रिझर्व्ह बँकेकडून दिल्या जाणाऱ्या निर्देशानुसार भारतीय स्टेट बँक, बॅँक आॅफ महाराष्ट्र, बॅँक आॅफ इंडिया, दी कळवण मर्चण्ट बॅँक, नामको बॅँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक शाखांचे कळवण शहरात दैनंदिन कामकाज चालू असून, बॅँक व शाखांमध्ये ५०० व १००० रु पयांच्या नोटांचा स्वीकार करण्यात येत आहे. राष्ट्रीयीकृत बॅँकानी पतसंस्थाबाबत असहकाराची भूमिका घेतल्याने ५०० व १००० रुपयांच्या नोटा न स्वीकारण्याचा पवित्रा शहरातील नागरी व ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांची व पतसंस्थेच्या खातेदार व ग्राहकांची मोठी कोंडी झाली आहे.राष्ट्रीयीकृत बँकांनी नागरी व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थाशी असहकार पुकारल्याने त्याचा परिणाम पतसंस्थेच्या कारभारावर व व्यवहारावर होत असून खातेदार व ग्राहकांची अडवणूक होत असल्याने शासनाने यासंदर्भात पतसंस्थाना सहकार्य होईल असे निर्देश राष्ट्रीयीकृत बॅँकाना द्यावे, अशी मागणी डॉ. दौलतराव अहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार खैरनार यांनी केली आहे. याबाबत कळवण तालुक्यातील पतसंस्थाना राष्ट्रीयीकृत बॅँकानी चलन उपलब्ध करून द्यावे तसे न झाल्यास शहरातील नागरी व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कारभारावर परिणाम होणार असल्याने पतसंस्था बंद ठेवण्याचा इशारा स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे. (वार्ताहर)