शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

सप्तश्रृंग गडावरील अर्थचक्र मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:17 IST

कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तश्रृंग निवासनीच्या गडावरील अर्थचक्र कोरोनामुळे मंदावले असून, व्यावसायिकांचे जगणे ’लॉक’ झाल्याची भावना व्यक्त होत अहे. कोरोनाचे संम्कट केव्हा दूर होईल आणि देवी भक्तांना दर्शनासाठी मंदिर कधी कुले होईल याची आस लागली आहे.

कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तश्रृंग निवासनीच्या गडावरील अर्थचक्र कोरोनामुळे मंदावले असून, व्यावसायिकांचे जगणे ’लॉक’ झाल्याची भावना व्यक्त होत अहे. कोरोनाचे संम्कट केव्हा दूर होईल आणि देवी भक्तांना दर्शनासाठी मंदिर कधी कुले होईल याची आस लागली आहे.सप्तश्रंग गडावर कोणतेही इतर उपजीविकेचे साधन नसल्याने अर्थचक्र पूर्णत: थांबले आहे. वर्षभरात दोन यात्रोत्सव व दैनंदिन येणार्या भाविकांमुळे अनेकांच्या हाताला येथे काम मिळते. फुल, प्रसाद, खण-नारळ विक्र ेता, पार्किंग, हॉटेल व्यवसाय करणार्या अनेकांसाठी सप्तशृंग गड म्हणजे पोटापाण्याची सोय आहे. मात्र, कोरोनाचा कहर सुरू झाला व गडावरील व्यावसायिकांचे जगणेच लॉक झाले आहे. भाविक, पर्यटकांसाठी देवीदर्शन खुले करावे, नियमांचे पालन करीत गडावर दर्शन सुविधा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.कळवण हा आदिवासी व ग्रामीण तालुका आहे. तालुक्यातील साडेनऊ हेक्टरवर पसरलेल्या सप्तशृंगी गडावर राहणार्या प्रत्येक घटकाची दिनचर्या मंदिर व भविकांवरच अवलंबून आहे. इथे ना शेती ना अन्य दुसरा व्यवसाय करण्यास वाव. मात्र कोरोनामुळे सध्या गडावर शुकशुकाट पसरला आहे. बंद दुकाने, सुनासुना परिसर पाहून येथली रहिवाशी रडकुंडीला आले आहेत. दररोज पहाटे धुक्याच्या मखमली दुलईतून गड जागा होतो. चोहीकडे निसर्ग खुललेला असतो. धबधबे खळाळत असतात. पानफुलं, पक्षी साद घालत असतात. मात्र काही क्षणात वास्तवाचे सूर्यकिरण गडावर येतात आणि येथील रहिवाशांसाठी पुढचा संपूर्ण दिवस भाकरीचा चंद्र शोधण्यातच जातो. बहरलेला निसर्ग आता येथील रहिवाशांना खायला उठत आहे. कधी एकदाचे आई भगवतीचे दर्शन सुरू होते, मंदिर सर्वांसाठी खुले होते आणि भाविकांची वर्दळ सुरू होते, याकडे येथील व्यावसायिकांचे डोळे लागले आहेत.ग्रामपंचायतीचा कारभार ठप्पसप्तशृंग गड ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची एक महत्त्वाची बाजू ठरणारा विषय म्हणजे प्रवेशशुल्क. गावात प्रवेश करणार्या भाविक, पर्यटक यांच्या वाहनांकडून प्रवेशशुल्क रु पात ग्रामपंचायतीला उत्पन्न सुरू झाले होते. मात्र, आता हे उत्पन्नही बंद झाले. गड ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीची मुदत संपली आहे. मात्र कोरोनामुळे निवडणूक लांबली आहे. ग्रामपंचायतीकडे निधीही नसल्याने विकासकामेही मंदावली गेली आहेत.

लॉकडाउन काळात देवस्थान ट्रस्टकडून स्थानिक गरजूंना अन्नदान सुरू होते. त्याच कालावधीत गडावर कोरोना रु ग्ण सापडल्याने हे भोजनालय बंद करण्यात आले. त्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे. मात्र, आता गडावर एकही रु ग्ण नाही. ट्रस्टने भोजनालय पुन्हा सुरू करावे.- बबलू गायकवाड, व्यावसायिक, सप्तशृंग गडसप्तश्रृंग गडावर 700 हून अधिक छोटे-मोठे दुकानदार आहेत. गेल्या पाच महिन्यांत प्रत्येक दुकानदाराचे 2 ते 3 लाखांचे उत्पन्न बुडाले. आता फार अंत न पाहता शासनाने मंदिर भाविकांसाठी खुले करुन दिलासा द्यावा. अन्यथा स्थानिकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.- रामप्रसाद बत्तासे, व्यावसायिक, सप्तश्रृंग गडकरोनाकाळात ट्रस्टने 1 मार्चपासून करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य जनजागृती अभियान सुरू केले आहे. लॉकडाउन कालावधीत 1500 ग्रामस्थांना दोन वेळचे मोफत भोजन दिले. कोणत्याही कर्मचार्याला कमी न करता त्यांच्याकडून इमारती व प्रकल्पनाची उभारणी, नूतनीकरण, देखभाल-दुरु स्ती, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, शिवालाय स्वच्छता, इतर प्रलंबित कामे करून घेतली. भक्तांनाही संस्थेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन दर्शन तसेच सोशल मीडियावर दररोज दर्शन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.- सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, देवस्थान ट्रस्ट(फोटो :12गड)

 

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या