शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
2
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
3
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 
4
भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
5
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
6
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
7
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
8
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान
9
कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं
10
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
11
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर
12
फक्त SIP च नाही, आता 'STP' नेही वाढवा म्युच्युअल फंडातला परतावा! जाणून घ्या ही खास योजना!
13
पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर
14
IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार
15
शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 
16
प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा
17
फक्त २५० रुपयांनी सुरुवात, ७० लाखांपर्यंतचा जमेल निधी! मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता कायमची मिटेल
18
मोठा अपघात टळला! रुळांवर होते सिमेंट, लोखंडाचे पाईप, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने वाचले हजारो प्रवाशांचे प्राण 
19
पावसाचा कहर! अरुणाचलमध्ये भूस्खलनात १४ ठार; मिझोराममध्ये घरे कोसळून अनेक जण ठार
20
विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न

देवळा तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 18:42 IST

चणकापूर धरणाचे पाणी झाडी-एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता करीत असून, सद्यस्थितीत या भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कशातरी पेरण्या पूर्ण केल्या आहेत; परंतु पेरणीनंतर पाऊसच झाला नसल्याने खरीप पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी भटकंती चणकापूरचे पूरपाणी कधी मिळणार? जनतेचा सवाल

उमराणे : जिव्हाळ्याचा परंतु गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला चणकापूर झाडी एरंडगाव कालवा कधी पूर्ण होईल व चणकापूर धरणाचे पाणी झाडी-एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता करीत असून, सद्यस्थितीत या भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कशातरी पेरण्या पूर्ण केल्या आहेत; परंतु पेरणीनंतर पाऊसच झाला नसल्याने खरीप पिकांचे नुकसान होत आहे.चणकापूर ते झाडी एरंडगाव उजवा कालवा गेल्या अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने पंचवार्षिक निवडणुकींच्या माध्यमातून हळूहळू पुढे सरकत आला आहे. खडतर प्रवासातून हळूहळू मार्गक्र मण करणाऱ्या पुनद प्रकल्पांतर्गत चणकापूर ते झाडी एरंडगाव या ३६ कि.मी.अंतराच्या कालव्याचा इतिहासात बघता जिल्ह्यातील कळवण, देवळा, मालेगाव आदी दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वप्रथम या उजव्या कालव्याला मंजुरी मिळाली होती. या कालव्यांतर्गत दुष्काळी भागात दोन लघु पाटबंधारे, २३ पाझर तलाव, ११ को.पा. बंधारे त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के भरण्यासाठी चणकापूर धरणातून पूरपाणी देणे नियोजित आहे. त्या अनुषंगाने २००८ साली या धरणातून पूरपाणी प्रवाहित करून रामेश्वर धरणापर्यंत पाणी पोहोचले होते. तेथून पुढील चारीचे काम पुढे सरकत असताना दहीवड जवळील १३ ते १५ कि.मी.अंतरात भुयारी बोगदा असल्याने व त्यातच ही जमीन वनविभागाची असल्याने त्याची रितसर परवानगी व शासकीय निधीअभावी हा कालवा बरीच वर्ष रखडून पडला होता. आजमितीस हा कालवा दहिवडपर्यंत येऊन पाहोेचला असून, तेथून पुढील १६ ते २८ कि.मी. मधील काम वेगवेगळ्या ठेकेदारांकडून केले गेले असल्याने काही ठेकेदारांनी काम पूर्ण केले तर काहींचे काम अपूर्णच आहे. कालव्याचे काम पूर्ण होऊन पाणी मिळावे यासाठी मागील वर्षी देवळा तालुका पूर्वभाग कृती समितीतर्फे देवळा येथे रास्ता रोको आंदोलन छेडून पिंपळगाव (वा.), खुंटेवाडी, वाखारी, मेशी, दहीवड, खडकतळे, खारीपाडा, डोंगरगाव, उमराणे, चिंचवे, सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, झाडी, तिसगाव, वºहाळे, सावकारवाडी, एरंडगाव आदी गावातील जनतेकडून तहसील कार्यालयासमोर चक्र ी पद्धतीने साखळी उपोषण करण्यात आले होते; परंतु शासनाने याची फारशी दखल न घेता या उपोषणाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे सध्यातरी या कालवा पूर्णत्वाचे स्वप्न अंधारातच आहे. 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक