शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कळवण तालुक्यात जाणवले भूकंपाचे धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:45 IST

भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवट परिसरातील बिलवाडी, देवळीवणी, चिंचपाडा, बोरदैवत, जामलेवणी आदी भागात शनिवारी (दि.२८) पहाटे ४ व रविवारी (दि.२९) रात्री ३ वाजेला लहान व मोठे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहे.

ठळक मुद्देआदिवासी बांधवांनी घराबाहेर रात्र जागून काढली

कळवण : भूकंपप्रवण क्षेत्र असलेल्या दळवट परिसरातील बिलवाडी, देवळीवणी, चिंचपाडा, बोरदैवत, जामलेवणी आदी भागात शनिवारी (दि.२८) पहाटे ४ व रविवारी (दि.२९) रात्री ३ वाजेला लहान व मोठे धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले आहे.

शनिवारी रात्री तहसीलदार बी. ए. कापसे व अभोण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला. या धक्क्यांमुळे या भागातील आदिवासी बांधवांनी शनिवारची रात्र घराबाहेर जागून काढली.

भूकंपाचे धक्के जाणवू लागताच पंचायत समितीचे माजी सभापती जगन साबळ, बिलवाडीचे सरपंच लक्ष्मण गायकवाड, जामलेवणीचे मनोहर ठाकरे, देवळीवणीचे माजी सरपंच कृष्णा चव्हाण यांनी आमदार नितीन पवार यांना माहिती दिली.

भूकंपप्रवण क्षेत्रात शासनस्तरावरून उपाययोजना करून दिलासा द्यावा अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी केली असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली.

शासनाने भूकंपप्रवण क्षेत्र भागात उपाययोजना करणे गरजेचे असून, परिसर आदिवासी असल्याने शासनाचे लक्ष केंद्रित करून विविध सुविधा पुरवाव्यात अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य जगन साबळे व बिलवाडी, वळीवणी, खिराड, मोहपाडा, पळसदर येथील आदीवासी महिला व बांधवांनी यावेळी आमदार नितीन पवार यांच्याकडे केली. याप्रश्नी शासन दुर्लक्ष करीत असल्याने या परिसरात कायमस्वरुपी भूकंपमापन यंत्र बसून तत्काळ आणि प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी या भागातील आदिवासी बांधवांची आहे.

 

भूकंपाचे धक्के, त्यात वाढलेल्या थंडीमुळे शेकोट्यांचा आसरा घेऊन ग्रामस्थांनी रात्र घराबाहेर काढली. शनिवारी रात्री ८.२४, ८.३५, ९.१२, १० वाजता, तर रविवारी सकाळी ७.४७, १०.१०, १०.३०, १०.४५ यावेळेला परिसरात भूकंपाचे धक्के बसले.

 

आता तरी लक्ष द्या...

बिलवाडी, बोरदैवत, देवळीवणी, चिंचपाडा, खिराड आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या भागात भ्रमणध्वनी कंपनीची सेवा सुरळीत मिळत नाही त्यामुळे येथून कुठेही संपर्क होत नाही. काही माहिती द्यायची तर बाहेर जाऊन भ्रमणध्वनी करावा लागतो. अशा परिस्थितीत काही अघटीत घडले तर आम्ही करायचे काय असा सवाल या भागातील आदिवासी बांधवांनी केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकEarthquakeभूकंप