शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

ग्रामीण भागातील दवंडी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 23:58 IST

चांदोरी : पूर्वी शासकीय असो की निमशासकीय, कुठलाही कार्यक्रम असल्यास दवंडी देऊन ग्रामस्थांना निमंत्रण देण्याची परंपरा होती. काळानुसार दवंडीची प्रथा आता हद्दपार झाली आहे. दवंडीच्या जागी आता मोबाइलवरील ग्रुपवर मेसेज पाठवून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे गटातील दवंडीचा आवाज ऐकावयास मिळत नाही.

ठळक मुद्देग्रामपंचायतमधील कुठलाही व गावातील शासकीय कार्यक्रमाची सूचना दवंडी देऊनच कळवली जायची.

चांदोरी : पूर्वी शासकीय असो की निमशासकीय, कुठलाही कार्यक्रम असल्यास दवंडी देऊन ग्रामस्थांना निमंत्रण देण्याची परंपरा होती. काळानुसार दवंडीची प्रथा आता हद्दपार झाली आहे. दवंडीच्या जागी आता मोबाइलवरील ग्रुपवर मेसेज पाठवून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे गटातील दवंडीचा आवाज ऐकावयास मिळत नाही.निफाड तालुक्यातील भरपूर गावात पूर्वीच्या काळात शासनाच्या योजनांची माहिती असो की ग्रामसभा, त्याचे जगजाहीरपणे दवंडी देऊन सूचना दिल्या जात असत. ग्रामपंचायतमधील कुठलाही व गावातील शासकीय कार्यक्रमाची सूचना दवंडी देऊनच कळवली जायची. त्यामुळे लोकांना घरपोच माहिती मिळायची. दवंडीचा आवाज आला की काहीतरी कार्यक्रम आहे हे निश्चित व्हायचे. तसेच योजनेची माहिती फॉर्म, भरण्याची सूचना, ग्रामसभा असल्याचेही समजत असे. परंतु या आधुनिक काळात हा प्रकार ग्रामीण भागात बंद पडल्यात जमा झाला आहे. दवंडीमुळे वाचासारखी गोष्ट प्रसारित होत होती. दवंडीच्या जागी आता कुठलाही कार्यक्रम असो शासकीय योजनांची माहिती, ग्रामसभेची सूचनाही सोशल मीडियाद्वारे ग्रुपवर टाकल्या जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घुमणारा आवाज लुप्त झाला आहे.गावातील ग्रामसभेची सूचना दवंडीतून पूर्वी कळायची. त्यामुळे मोठी गर्दी असायची. वादळी चर्चा व्हायची तसेच जे नागरिक ग्रामसभेला हजर नसल्यास संबंधित व्यक्ती उपस्थित ग्रामसभेत काय झाले याची कुतूहलाने माहिती घ्यायचा. परंतु आता सोशल मीडियावर किंवा फलकावर ग्रामसभेच्या सूचना देऊ लागल्याने अनेकांना ग्रामसभेची माहिती पोहोचताना दिसत नाही. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसभा होताना पाहावयास मिळत आहे. ग्रामसभेला महत्त्वप्राप्त झाले तरी लोकांच्या अनुउपस्थितीमुळे चर्चेविना ग्रामीण भागात ग्रामसभा होत आहे.ग्रामीण भागातील दवंडीचा प्रकार हद्दपार झालेला दिसतो.दवंडीतून प्रसारित होणारी माहिती वेगाने लोकांना समजायची; परंतु सोशल मीडियातून मोजक्या लोकांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. विशेष म्हणजे या दवंडीची चर्चा गावभर व्हायची. त्यामुळेच कोणी दवंडी नाही ऐकली तरी संदेश मात्र मिळायचा आता प्रत्येकाकडे मोबाइल असला तरीही त्यातील संदेश वाचण्याइतकीही फुरसत कोणाला नसल्याचे चित्र हाहे.ऐका हो ऐका ...ग्रामीण भागातील दवंड्या ऐका हो ऐका असे म्हणत शासकीय योजनांची असो की, जनजागृती मोहीम त्याची दवंडी द्यायचा. त्यामुळे लोक थेट माहिती मिळत असल्याने लक्षपूर्वक ऐकायचे. काही प्रश्न असल्यास उपस्थित करायचे; परंतु आता दवंडीही ग्रामीण भागातून हद्दपार झाली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRural Developmentग्रामीण विकास